शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
2
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
3
'कॉन्फिगरेशन एरर'मुळे २४१ लोकांचा मृत्यू ?; अहमदाबाद विमान अपघातामागील हे मोठे कारण असू शकते
4
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
5
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
6
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
7
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
8
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
9
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
10
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
11
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
12
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
13
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार
14
WTC मध्ये राडा! हाताने चेंडूने जमिनीवर टाकला तरीही फलंदाज नाबाद; ऑस्ट्रेलिया टीम हैराण, नियम काय?
15
Air India Flight Emergency Landing : Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
16
पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले; सिंहगड रोडवरील नाल्यात ज्येष्ठ महिला वाहून गेली
17
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
18
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
19
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
20
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?

विष्णूपुरीतील पाणीचोरी रोखण्यासाठी ‘संयुक्त पथके स्थापन करा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2018 01:09 IST

विष्णूपुरी प्रकल्पातील होणारी पाणीचोरी रोखण्यासाठी संयुक्त पथक स्थापन करण्याची सूचना महापालिकेचे आयुक्त लहुराज माळी यांनी पाणीपुरवठा विभागाला दिल्या आहेत. लोअर दुधना प्रकल्पातून प्राप्त झालेले पाणी जुलैपर्यंत राखून ठेवण्याची मोठी कसरत महापालिकेला करावी लागणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : विष्णूपुरी प्रकल्पातील होणारी पाणीचोरी रोखण्यासाठी संयुक्त पथक स्थापन करण्याची सूचना महापालिकेचे आयुक्त लहुराज माळी यांनी पाणीपुरवठा विभागाला दिल्या आहेत. लोअर दुधना प्रकल्पातून प्राप्त झालेले पाणी जुलैपर्यंत राखून ठेवण्याची मोठी कसरत महापालिकेला करावी लागणार आहे.शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या विष्णूपुरी प्रकल्पात पाणीसाठा अत्यल्प उरल्यानंतर महापालिकेने लोअर दुधना प्रकल्पातून तब्बल १६६ कि.मी. अंतराहून पाणी घेतले. २५ दलघमी पैकी महापालिकेला अपेक्षित १५ दलघमी पाणी शनिवारी सकाळी १० वाजेपर्यंत विष्णूपुरीत पोहोचले होते. दुपारनंतर पाण्याचा येवा मंदावला. परिणामी आता उपलब्ध झालेल्या पाण्याचे रक्षण करण्यासाठी महापालिकेने तातडीने उपाययोजना सुरू केल्या आहेत.आयुक्त माळी यांनी पाणीपुरवठा विभागाला विष्णूपुरीतील पाणीचोरी रोखण्यासाठी संयुक्त पथके स्थापन करण्याची सूचना केली आहे. या पथकाद्वारे विष्णूपुरीतील पाणी चोरी रोखण्यात येणार आहे. याबाबत पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुग्रीव अंधारे यांनी जिल्हा प्रशासनाला याबाबत कळवले आहे. आता जिल्हाधिकारी सदर पथक स्थापनेचे आदेश निर्गमित करतील. या पथकात महसूल, सिंचन, पोलीस, महावितरण तसेच महापालिकेच्या कर्मचाºयांचा समावेश राहणार आहे.विष्णूपुरी प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात अवैधरीत्या पाणी उपसा सुरू आहे. हजारो विद्युतपंपाच्या सहाय्याने पाणीपुरवठा उपसा २४ तास सुरू आहे. त्यामुळे मोठ्या परिश्रमातून घेतलेले पाणी जुलैपर्यंत राहील की नाही, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे या संयुक्त पथक स्थापनेची गरज निर्माण झाली होती.संयुक्त पथकालाही प्रत्यक्ष प्रकल्पातून होणारी पाणीचोरी रोखण्याची मोठी जबाबदारी पार पाडावी लागणार आहे. या पाण्याची चोरी न रोखल्यास आणि पावसाळा लांबल्यास पाण्याचा मोठा प्रश्न शहरापुढे उद्भवणार आहे. हीच बाब लक्षात घेवून मनपाने पावले उचलली आहेत.---पाणीपुरवठ्यात महावितरणचा खोडाशहरात अनियमित पाणी पुरवठ्यासंदर्भात मोठी ओरड सुरू आहे. महापालिकेच्या १६ मे रोजी झालेल्या सभेतही याबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले. त्याबाबत आयुक्तांनी पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक तात्काळ नगरसेवकांना पुरवले. मात्र या वेळापत्रकाची अंमलबजावणी करण्यात महावितरणचा मोठा अडथळा महापालिकेला सहन करावा लागत आहे. वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने शहरातील जलकुंभ भरण्यात विलंब होत आहे. परिणामी पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक पूर्णत: कोलमडत आहे. याबाबत महापालिकेने महावितरणला कळवले आहे.

 

टॅग्स :vishnupuri damविष्णुपुरी धरणWaterपाणीwater scarcityपाणी टंचाई