शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

विष्णूपुरीतील पाणीचोरी रोखण्यासाठी ‘संयुक्त पथके स्थापन करा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2018 01:09 IST

विष्णूपुरी प्रकल्पातील होणारी पाणीचोरी रोखण्यासाठी संयुक्त पथक स्थापन करण्याची सूचना महापालिकेचे आयुक्त लहुराज माळी यांनी पाणीपुरवठा विभागाला दिल्या आहेत. लोअर दुधना प्रकल्पातून प्राप्त झालेले पाणी जुलैपर्यंत राखून ठेवण्याची मोठी कसरत महापालिकेला करावी लागणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : विष्णूपुरी प्रकल्पातील होणारी पाणीचोरी रोखण्यासाठी संयुक्त पथक स्थापन करण्याची सूचना महापालिकेचे आयुक्त लहुराज माळी यांनी पाणीपुरवठा विभागाला दिल्या आहेत. लोअर दुधना प्रकल्पातून प्राप्त झालेले पाणी जुलैपर्यंत राखून ठेवण्याची मोठी कसरत महापालिकेला करावी लागणार आहे.शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या विष्णूपुरी प्रकल्पात पाणीसाठा अत्यल्प उरल्यानंतर महापालिकेने लोअर दुधना प्रकल्पातून तब्बल १६६ कि.मी. अंतराहून पाणी घेतले. २५ दलघमी पैकी महापालिकेला अपेक्षित १५ दलघमी पाणी शनिवारी सकाळी १० वाजेपर्यंत विष्णूपुरीत पोहोचले होते. दुपारनंतर पाण्याचा येवा मंदावला. परिणामी आता उपलब्ध झालेल्या पाण्याचे रक्षण करण्यासाठी महापालिकेने तातडीने उपाययोजना सुरू केल्या आहेत.आयुक्त माळी यांनी पाणीपुरवठा विभागाला विष्णूपुरीतील पाणीचोरी रोखण्यासाठी संयुक्त पथके स्थापन करण्याची सूचना केली आहे. या पथकाद्वारे विष्णूपुरीतील पाणी चोरी रोखण्यात येणार आहे. याबाबत पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुग्रीव अंधारे यांनी जिल्हा प्रशासनाला याबाबत कळवले आहे. आता जिल्हाधिकारी सदर पथक स्थापनेचे आदेश निर्गमित करतील. या पथकात महसूल, सिंचन, पोलीस, महावितरण तसेच महापालिकेच्या कर्मचाºयांचा समावेश राहणार आहे.विष्णूपुरी प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात अवैधरीत्या पाणी उपसा सुरू आहे. हजारो विद्युतपंपाच्या सहाय्याने पाणीपुरवठा उपसा २४ तास सुरू आहे. त्यामुळे मोठ्या परिश्रमातून घेतलेले पाणी जुलैपर्यंत राहील की नाही, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे या संयुक्त पथक स्थापनेची गरज निर्माण झाली होती.संयुक्त पथकालाही प्रत्यक्ष प्रकल्पातून होणारी पाणीचोरी रोखण्याची मोठी जबाबदारी पार पाडावी लागणार आहे. या पाण्याची चोरी न रोखल्यास आणि पावसाळा लांबल्यास पाण्याचा मोठा प्रश्न शहरापुढे उद्भवणार आहे. हीच बाब लक्षात घेवून मनपाने पावले उचलली आहेत.---पाणीपुरवठ्यात महावितरणचा खोडाशहरात अनियमित पाणी पुरवठ्यासंदर्भात मोठी ओरड सुरू आहे. महापालिकेच्या १६ मे रोजी झालेल्या सभेतही याबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले. त्याबाबत आयुक्तांनी पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक तात्काळ नगरसेवकांना पुरवले. मात्र या वेळापत्रकाची अंमलबजावणी करण्यात महावितरणचा मोठा अडथळा महापालिकेला सहन करावा लागत आहे. वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने शहरातील जलकुंभ भरण्यात विलंब होत आहे. परिणामी पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक पूर्णत: कोलमडत आहे. याबाबत महापालिकेने महावितरणला कळवले आहे.

 

टॅग्स :vishnupuri damविष्णुपुरी धरणWaterपाणीwater scarcityपाणी टंचाई