शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
3
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
4
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
5
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
6
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
7
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
8
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
9
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
10
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
11
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
12
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
13
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
14
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
15
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
16
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
17
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
18
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
19
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
20
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?

सातबाऱ्यासाठी तब्बल ४५ वर्षांचा लढा; जिद्दी शेतकऱ्यास यंदा सरकारी यंत्रणेची सकारात्मक साथ

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2024 18:57 IST

जिद्दी शेतकऱ्याची कहाणी; तब्बल ४५ वर्षानंतर मिळाला हक्काचा सातबारा

मुदखेड (नांदेड) : सरकारी काम कार्यालयात अनेक खेटे मारल्याशिवाय होत नाही असा अनेकांना अनुभव आला असेल. असाच अनुभव मुदखेड तालुक्यातील मौजे डोणगाव येथील शेतकऱ्यांना आला आहे. शेतकरी कनिराम गोमा पवार व सोमा धनजी पवार या शेतकऱ्यांना शेत जमिनीचा ७/१२ एक-दोन वर्ष नाही तर तब्बल ४५ वर्षांनंतर मिळाला आहे.

तालुक्यातील मौजे डोणगाव येथील शेतकरी कनिराम गोमा पवार व सोमा धनजी पवार यांनी १९७९ मध्ये गावातीलच सर्वे क्र. ७३ मधील १ हेक्टर २१ आर जमीन विठ्ठल मरिबा यांचेकडून विकत घेतली. त्यानंतर एकत्रिकरण योजनेमध्‍ये याचा गट क्रमांक बदलून १९६ झाला. यानुसार कनिराम गोमा पवार व सोमा धनजी पवार यांचा अंमल ७/१२ होणे गरजेचे होते. परंतु त्‍याठिकाणी तत्‍कालीन तलाठी यांनी दुसऱ्याच व्‍यक्‍तीच्या नावे अंमल केला. त्या व्‍यक्‍तीची जमीन जुना सर्वे क्र. ६८ व गट क्र.१८४ मध्‍ये होती. सदर गट क्र.१८४ हा एकत्रिकरण योजनेनंतर झाला परंतु त्‍याची ७/१२ तयार केली नाही. यामुळे शेतकरी कनिराम गोमा पवार व सोमा धनजी पवार यांनी सातबारा नावे होण्यासाठी अर्ज केला. मात्र त्याचा अंमल झाला नाही. मात्र, हार न मानता अर्जदार शेतकऱ्यांनी वर्षानुवर्ष तहसिल कार्यालय आणि उपअधिक्षक, भूमि अभिलेख कार्यालयात ७/१२ मिळण्यासाठी चकरा मारल्या. दरम्यान, महसूलचे नायब तहसिलदार मारोतराव जगताप यांना या प्रकरणाची माहिती मिळाली. त्यांनी सखोल चौकशी करत जुने अभिलेख तपासणी केली. तसेच प्रत्‍यक्ष जागेवर उपअधिक्षक, भूमि अभिलेख कार्यालयातील प्रतिनिधीसह भेट देऊन शहानिशा केली. त्यानंतर महाराष्‍ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६ चे कलम १५५ खाली दिनांक ०८/०२/२०२४ रोजी प्रकरणात निकाल दिला. 

जिद्दी शेतकऱ्यास यंदा सरकारी यंत्रणेची सक्रिय साथत्यानंतर आज, मंगळवारी तहसिलदार आनंद देऊळगाकर यांच्या हस्‍ते शेतकऱ्यास त्‍यांचा ७/१२ देण्यात आला. शेतकऱ्याने तब्‍बल ४५ वर्षानंतर ७/१२ मिळाल्‍याबद्दल तहसिलदार व नायब तहसिलदार यांचे आभार व्‍यक्‍त केले. महसूलचे उल्‍हास जवळेकर, शाम चौधरी, तलाठी गड्डमवार, बोधमवाड, गोपाल माने, मंडळ अधिकारी हायुन पठाण, विकास कदम आदि कर्मचारी अधिकाऱ्यांनी तांत्रिक बाबी दूर केल्या. जिद्दी शेतकऱ्यांना सरकारी यंत्रणेची यंदा सकारात्मक साथ लाभल्याने तब्बल ४५ वर्षांनी न्याय मिळाल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.

टॅग्स :FarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्रNandedनांदेडRevenue Departmentमहसूल विभाग