शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

नांदेड जिल्ह्यात शालेय विद्यार्थ्यांनीना आंदोलनाचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2018 19:50 IST

जिल्ह्यात सुरु असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनाचा मोठा फटका शालेय विद्यार्थ्यांनीना बसला आह़े़ जिल्हयातील नऊ तालुक्यात मानव विकास कार्यक्रमांतर्गत मुलींच्या शालेय वाहतुकीसाठी बसची व्यवस्था सुरु आहे़ आजही उमरी तालुक्यातील बससेवा बंदच आहे़

नांदेड : जिल्ह्यात सुरु असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनाचा मोठा फटका शालेय विद्यार्थ्यांनीना बसला आह़े़ जिल्हयातील नऊ तालुक्यात मानव विकास कार्यक्रमांतर्गत मुलींच्या शालेय वाहतुकीसाठी बसची व्यवस्था सुरु आहे़ आजही उमरी तालुक्यातील बससेवा बंदच आहे़

उत्पन्नाचा निर्देशांक कमी असलेल्या नांदेड जिल्हयातील लोहा, देगलूर, बिलोली, धर्माबाद, उमरी, मुदखेड, भोकर, हिमायतनगर आणि किनवट तालुक्यात मानव विकास कार्यक्रमांतर्गत मुलींच्या शिक्षणासाठी बससेवा सुरु करण्यात आली आहे़ जिल्ह्यातील ३७५ गावातील ६ हजार ७८३ विद्यार्थ्यांनी या बससेवेचा लाभ घेतात़ जिल्ह्यात २३ जुलै पासून सुरु झालेल्या मराठा आरक्षण आंदोलनाचा राज्य परिवहन महामंडळाला मोठा फटका बसला आह़े  त्याचवेळी  या ३७५ गावातील साडेसहा हजाराहुन अधिक विद्यार्थ्यांनीही शाळेत जावू शकल्या नाहीत़ मागील तीन-चार दिवसांपासून बससेवा सुरु केली जात आहे़ त्यातही उमरी तालुक्यात मात्र अद्यापही बससेवा सुरु करण्यास पोलिस प्रशासनाने परवानगी दिली नाही़ त्यामुळे उमरी तालुक्यातील ३८ गावच्या साडेसातशे विद्यार्थ्यानी शाळेपासून वंचितच आहेत़

जिल्ह्यात सर्वाधिक भोकर तालुक्यातील १ हजार १४६ विद्यार्थींनी मानव विकास कार्यक्रमांतर्गत बससेवेचा लाभ घेतात़ त्या खालोखाल देगलूर तालुक्यात १ हजार ८५, मुदखेड तालुक्यात ८३४, किनवट तालुक्यात ८१५, लोहा तालुक्यात ६१५, हिमायतनगर तालुक्यात ५१५, बिलोली तालुक्यात ४०६, धर्माबाद तालुक्यात ६२० विद्यार्थींनी लाभ घेत आहेत़ २३४ शाळामध्ये या विद्यार्थींनी शिक्षण घेत आहेत़ 

जिल्ह्यात सुरु असलेल्या आंदोलनामुळे राज्य परिवहन महामंडळाच्या बससची जाळपोळ तसेच तोडफोडही करण्यात आली़ उमरी तालुक्याततर विद्यार्थींनी बसमध्ये असतांनाही दगडफेकीची घटना घडली़ या बाबीची तात्काळ दखल घेत विद्यार्थींनीना सुरक्षितपणे जाता यावे, याची खबरदारी संबंधीत आगार प्रमुखांनी प्राधान्यांने घ्यावी असे आदेश जिल्हाधिकारी अरुण डोंगर यांनी दिले आहेत़ त्याचवेळी मानव विकास कार्यक्रमांतर्गत विद्यार्थींनीसाठी असलेली निळी बस उपलब्ध नसेल तर इतर बस उपलब्ध करुन द्याव्यात अशा सूचनाही जिल्हाधिकारी डोंगर यांनी विभाग नियंत्रकांना दिल्या आहेत़

टॅग्स :Studentविद्यार्थीSchoolशाळाstate transportराज्य परीवहन महामंडळ