शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

फुले, आंबेडकर यांच्या यशामध्ये सयाजीरावांचा मोलाचा वाटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2019 12:55 AM

थोर समाजसुधारक महात्मा फुले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना बडोदा संस्थानचे राजे सयाजीराव गायकवाड यांची वेळोवेळी आर्थिक आणि इतर मदत केल्यामुळे ते यशाचे शिखर गाठू शकले.

ठळक मुद्देमहाराजा सयाजीराव गायकवाड विद्यापीठाचे करंदीकर यांचे मार्गदर्शन

नांदेड : थोर समाजसुधारक महात्मा फुले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना बडोदा संस्थानचे राजे सयाजीराव गायकवाड यांची वेळोवेळी आर्थिक आणि इतर मदत केल्यामुळे ते यशाचे शिखर गाठू शकले. त्यामुळे त्यांच्या यशामध्ये सयाजीराव गायकवाड यांचा मोलाचा वाटा आहे, असे मत बडोदा येथील महाराजा सयाजीराव गायकवाड विद्यापीठातील नामवंत अभ्यासक डॉ. संजयकुमार करंदीकर यांनी व्यक्त केले.स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन व अभ्यास केंद्राच्या वतीने आयोजित अध्यासन केंद्राच्या सभागृहात विशेष व्याख्यानात १७ जुलै रोजी डॉ. करंदीकर बोलत होते. यावेळी मंचावर कुलगुरू डॉ. उद्धव भोसले, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. रवि सरोदे, मराठीचे विभागप्रमुख डॉ. केशव देशमुख, अध्यासन केंद्राचे समन्वयक डॉ.पी.विठ्ठल यांची प्रमुख उपस्थिती होती.ते म्हणाले, सयाजीराव गायकवाड हे द्रष्टे राज्यकर्ते होते. वयाच्या १२ व्या वर्षांपर्यंत गुरांमागे धावणारा मुलगा पुढे एवढा मोठा राज्यकर्ता झाला. यामध्ये इंदोर येथील टी. माधवराव आणि इंग्रज अधिकारी इटोरीया यांनी त्यांना शिक्षणाचे धडे देऊन परिपूर्ण राज्यकर्ते बनविले. १९०५ मध्ये मदनमोहन मालवीय हे हिंदू विद्यापीठाचे पहिले कुलगुरू झाले होते. विद्यापीठाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी त्यांनी सयाजीरावांकडे दोन लक्ष रुपयांची मदत मागितली. सयाजीरावांनी दोन लक्ष रुपयांच्या ऐवजी पाच लक्ष रुपये देऊन शिक्षण किती महत्त्वाचे आहे आणि विद्यापीठाद्वारे ते सर्वांना मिळाले पाहिजे, याची जाणीव त्यांना होती. कुणीही गरीब, होतकरू शिक्षण घेण्यासाठी त्यांच्याकडे मदत मागितली तर तो कधीच रिकाम्या हातांनी परतला नाही. एकदा एक मातवेकर नावाच्या विद्यार्थ्यार्ला उच्च शिक्षणासाठी पॅरिसला जावयाचे होते. त्याला जाण्या-येण्याच्या खर्चासह रहाणे-खाणे यासाठी शिष्यवृत्ती दिली.मग एकदा महाराज स्वत: पॅरिसला गेले असता मातेकरांना बोलावून त्यांच्या शिक्षणाची विचारपूस केली. म्हणजेच, दिलेल्या शिष्यवृत्तीचा वापर योग्यरित्या होतो का नाही, याकडेही ते काळजीपूर्वक पाहत असत. शेवटी ते म्हणाले, महाराष्ट्रामध्ये फुले, आंबेडकर, शाहू यांचा गौरव होतो; पण त्याचबरोबर सयाजीराव गायकवाड यांचाही उल्लेख महत्त्वाचा ठरतो. सूत्रसंचालन अध्यासन केंद्राचे समन्वयक डॉ.पी.विठ्ठल यांनी केले तर सुनील ढाले यांनी आभार मानले.बाबासाहेबांना नियमात बदल करुन अखंडपणे मदतडॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्यात विशेष अनुबंध होते. बाबासाहेब पहिल्यांदा ज्यावेळी शिक्षणासाठी आर्थिक मदत मागण्यासाठी गेले असता त्यांना तात्काळ शिष्यवृत्ती मान्य करण्यात आली होती. संस्थानच्या नियमावलीमध्ये एका विद्यार्थ्याला एकदाच आर्थिक मदत करणे, असा नियम होता. पण बाबासाहेबांसाठी त्यांनी नियमात बदल करून पुढे अखंडपणे त्यांना मदत करीत राहिले. ज्यामध्ये बाबासाहेबांनी पीएच.डी. पूर्ण करून उच्चशिक्षणासाठी अनेकवेळा बाहेर देशात जाणे-येणे केले.

टॅग्स :Nandedनांदेडswami ramanand tirth marathawada univercity, nandedस्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड