शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
3
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
4
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
5
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
6
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
7
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
8
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
9
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
10
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
11
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
12
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
13
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
14
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
15
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
16
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
17
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
18
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
19
अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती
20
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."

फुले, आंबेडकर यांच्या यशामध्ये सयाजीरावांचा मोलाचा वाटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2019 00:55 IST

थोर समाजसुधारक महात्मा फुले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना बडोदा संस्थानचे राजे सयाजीराव गायकवाड यांची वेळोवेळी आर्थिक आणि इतर मदत केल्यामुळे ते यशाचे शिखर गाठू शकले.

ठळक मुद्देमहाराजा सयाजीराव गायकवाड विद्यापीठाचे करंदीकर यांचे मार्गदर्शन

नांदेड : थोर समाजसुधारक महात्मा फुले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना बडोदा संस्थानचे राजे सयाजीराव गायकवाड यांची वेळोवेळी आर्थिक आणि इतर मदत केल्यामुळे ते यशाचे शिखर गाठू शकले. त्यामुळे त्यांच्या यशामध्ये सयाजीराव गायकवाड यांचा मोलाचा वाटा आहे, असे मत बडोदा येथील महाराजा सयाजीराव गायकवाड विद्यापीठातील नामवंत अभ्यासक डॉ. संजयकुमार करंदीकर यांनी व्यक्त केले.स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन व अभ्यास केंद्राच्या वतीने आयोजित अध्यासन केंद्राच्या सभागृहात विशेष व्याख्यानात १७ जुलै रोजी डॉ. करंदीकर बोलत होते. यावेळी मंचावर कुलगुरू डॉ. उद्धव भोसले, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. रवि सरोदे, मराठीचे विभागप्रमुख डॉ. केशव देशमुख, अध्यासन केंद्राचे समन्वयक डॉ.पी.विठ्ठल यांची प्रमुख उपस्थिती होती.ते म्हणाले, सयाजीराव गायकवाड हे द्रष्टे राज्यकर्ते होते. वयाच्या १२ व्या वर्षांपर्यंत गुरांमागे धावणारा मुलगा पुढे एवढा मोठा राज्यकर्ता झाला. यामध्ये इंदोर येथील टी. माधवराव आणि इंग्रज अधिकारी इटोरीया यांनी त्यांना शिक्षणाचे धडे देऊन परिपूर्ण राज्यकर्ते बनविले. १९०५ मध्ये मदनमोहन मालवीय हे हिंदू विद्यापीठाचे पहिले कुलगुरू झाले होते. विद्यापीठाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी त्यांनी सयाजीरावांकडे दोन लक्ष रुपयांची मदत मागितली. सयाजीरावांनी दोन लक्ष रुपयांच्या ऐवजी पाच लक्ष रुपये देऊन शिक्षण किती महत्त्वाचे आहे आणि विद्यापीठाद्वारे ते सर्वांना मिळाले पाहिजे, याची जाणीव त्यांना होती. कुणीही गरीब, होतकरू शिक्षण घेण्यासाठी त्यांच्याकडे मदत मागितली तर तो कधीच रिकाम्या हातांनी परतला नाही. एकदा एक मातवेकर नावाच्या विद्यार्थ्यार्ला उच्च शिक्षणासाठी पॅरिसला जावयाचे होते. त्याला जाण्या-येण्याच्या खर्चासह रहाणे-खाणे यासाठी शिष्यवृत्ती दिली.मग एकदा महाराज स्वत: पॅरिसला गेले असता मातेकरांना बोलावून त्यांच्या शिक्षणाची विचारपूस केली. म्हणजेच, दिलेल्या शिष्यवृत्तीचा वापर योग्यरित्या होतो का नाही, याकडेही ते काळजीपूर्वक पाहत असत. शेवटी ते म्हणाले, महाराष्ट्रामध्ये फुले, आंबेडकर, शाहू यांचा गौरव होतो; पण त्याचबरोबर सयाजीराव गायकवाड यांचाही उल्लेख महत्त्वाचा ठरतो. सूत्रसंचालन अध्यासन केंद्राचे समन्वयक डॉ.पी.विठ्ठल यांनी केले तर सुनील ढाले यांनी आभार मानले.बाबासाहेबांना नियमात बदल करुन अखंडपणे मदतडॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्यात विशेष अनुबंध होते. बाबासाहेब पहिल्यांदा ज्यावेळी शिक्षणासाठी आर्थिक मदत मागण्यासाठी गेले असता त्यांना तात्काळ शिष्यवृत्ती मान्य करण्यात आली होती. संस्थानच्या नियमावलीमध्ये एका विद्यार्थ्याला एकदाच आर्थिक मदत करणे, असा नियम होता. पण बाबासाहेबांसाठी त्यांनी नियमात बदल करून पुढे अखंडपणे त्यांना मदत करीत राहिले. ज्यामध्ये बाबासाहेबांनी पीएच.डी. पूर्ण करून उच्चशिक्षणासाठी अनेकवेळा बाहेर देशात जाणे-येणे केले.

टॅग्स :Nandedनांदेडswami ramanand tirth marathawada univercity, nandedस्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड