शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

सरपंच संघटना पुन्हा तेलंगणा मुद्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2019 00:52 IST

तालुक्यासाठी मंजूर झालेल्या निधीला जिल्हा परिषद विभाग एनओसी देत नसल्याने संतप्त झालेल्या सरपंच संघटनेने धर्माबाद पंचायत समितीसमोर ३ जानेवारी रोजी उपोषण सुरू केले़

धर्माबाद : तालुक्यासाठी मंजूर झालेल्या निधीला जिल्हा परिषद विभाग एनओसी देत नसल्याने संतप्त झालेल्या सरपंच संघटनेने धर्माबाद पंचायत समितीसमोर ३ जानेवारी रोजी उपोषण सुरू केले़ उपोषणास तालुक्यातील सरपंच व नागरिकांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली़ दरम्यान, संघटनेने पुन्हा तेलंगणा राज्यात धर्माबाद तालुक्याचा समावेश करण्याची मागणी सुरू झाली आहे़धर्माबाद तालुक्याचा विकास करा अन्यथा चाळीस गावे तेलगंणात समाविष्ट करा, ही मागणी सरपंच संघटनेने केल्यानंतर शासनाची झोप उडाली होती़ त्यावरून शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी या मागणीची दखल घेऊन पालकमंत्री रामदास कदम यांना निधी उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या होत्या.पालकमंत्री रामदास कदम यांनी धर्माबाद तालुक्याच्या विकासासाठी ४० कोटी रूपयांची निधी मंजूर करून त्यातील १४ कोटी रूपये विविध कामाच्या विकासकामासाठी जिल्हा प्रशासनाकडे पाठविले आहे. परंतु सदरील विकासकामे जि. प. अंतर्गत असल्यामुळे विकासकामे सुरू करण्यासाठी जि. प. ची नाहरकत घेणे बंधनकारक आहे.सदरील कामासाठी आलेला निधी जि. प. मार्फत कामे व्हावे, यासाठी जि.प. सदस्यांनी अडचणी निर्माण करून नाहरकत देण्यासाठी विरोध करीत असल्यामुळे जनतेत तीव्र असंतोष पसरला आहे.तालुक्यातील दोन जि. प. सदस्य उपोषणाकडे फिरकलेच नाहीत. विकासकामांच्या निधीतून आपला विकास कसा करता येईल याकडे दोन्ही जि.प.सदस्य विचार करीत असल्याचा आरोप करण्यात आला़ सदरील कामासाठी ना हरकत तात्काळ देण्यात यावे, अन्यथा यापुढील आंदोलन उग्र करण्यात येणार असल्याचे सरपंच संघटनेचे तालुकाध्यक्ष बाबूराव कदम यांनी सांगितले़यावेळी सरपंच विनोद जोगंदड, गोविंद मोकलीकर, शिवदर्शन दाणेकर, राम रोनटेवार, कुशलराव गुंडाळे, अनिल कोलेवाड, संतोष कावडे, बानाबाई जिंकलोर, राधिका राजूरे, मौलाना पठाण, आसिफअल्ली सय्यद अल्ली, बाबूराव जगदंबे, सुरेखा उमरे, साईनाथ ताकलोड, विजय गिरी, लक्ष्मण धनूरे, माजी उपनगराध्यक्ष रमेशचंद्र तिवारी, माजी नगरसेवक रवींद्र शेट्टी, मतीनभाई, शंकर पाटील होट्टे, संजय गांधी निराधार योजनेचे तालुकाध्यक्ष रामचंद्र रेड्डी, शिवसेना संघटक गणेश गिरी, शहर प्रमुख राजू सिरामणे, बालाजी बनसोडे, मनोज मनूरकर, आनंदा गायकवाड यांच्यासह शेकडोंच्या संख्येने तालुक्यातील शेतकरी बांधव उपस्थित होते.१४ कोटी विकासासाठी प्रशासनाला पाठविलेपालकमंत्री रामदास कदम यांनी धर्माबाद तालुक्याच्या विकासासाठी ४० कोटी रूपयांची निधी मंजूर करून त्यातील १४ कोटी रूपये विविध कामाच्या विकासकामासाठी जिल्हा प्रशासनाकडे पाठविले आहेत. परंतु सदरील विकासकामे जि.प.अंतर्गत असल्यामुळे विकासकामे सुरू करण्यासाठी जि.प.ची ना हरकत घेणे बंधनकारक आहे.

टॅग्स :Nandedनांदेडagitationआंदोलनsarpanchसरपंच