शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar Naresh Arora: नरेश अरोरा यांच्या कार्यालयात क्राइम ब्रँचचे अधिकारी; अजित पवार म्हणाले, "तथ्यांच्या आधारेच..."
2
'मदत येत आहे, संस्था ताब्यात घ्या...'; इराणशी चर्चा रद्द करून ट्रम्प यांनी निदर्शनांना भडकावले
3
भाजपा मुख्यालयात BJP नेते आणि चीनच्या CPC शिष्टमंडळाची बैठक; काँग्रेसचा खळबळजनक दावा
4
ZP Election in Maharashtra 2026: ९ लाख ते ६ लाख, झेडपी निवडणुकीत कोणत्या उमेदवाराला किती खर्च करता येणार?
5
कतारमधील अमेरिकन हवाई तळावर हालचाली वाढल्या! डोनाल्ड ट्रम्प इराणविरुद्ध कारवाई करण्याच्या तयारीत?
6
इराणमध्ये अराजकता! २००० हून अधिक लोकांचा मृत्यू, सरकारने पहिल्यांदाच सत्य केले मान्य
7
थंडीची लाट! हृदय आणि फुफ्फुसांवर परिणाम, एम्सच्या डॉक्टरांनी दिला सतर्कतेचा इशारा
8
अजित पवारांच्या राजकीय सल्लागारावर पोलीस कारवाई; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी पुण्यात मोठी घडामोड
9
Maharashtra ZP Election 2026 Date: मोठी बातमी! राज्यातील १२ जिल्हा परिषदा, १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकीची घोषणा, ५ फेब्रुवारीला मतदान
10
पुन्हा निवडणूक! महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यातील किती पंचायत समित्यांसाठी रंगणार 'रणसंग्राम'?
11
महापालिका निवडणुकीत नेत्यांची प्रतिष्ठा लागणार पणाला! भाजप विरुद्ध काँग्रेस, शिंदेसेना, उद्धवसेना, एमआयएम
12
'निवडणूक आयोग BJP च्या AI टूल्सचा वापर करतोय', SIR वर ममता बॅनर्जींचा संताप
13
Viral Video: लेकीच्या मॉइश्चरायझरची किंमत ऐकून वडिलांची उडाली झोप, व्हिडीओ शेवटपर्यंत पाहा!
14
अबब! फक्त ४ जणांच्या टीमला Open AI नं ९०० कोटींना खरेदी केले; आता ChatGPT देणार हेल्थ रिपोर्ट
15
राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचं एकत्रिकरण होणार का? प्रचार संपत असताना अजित पवारांचं मोठं विधान
16
चांदीपासून सावधान...! येणार मोठी घसरण...? रॉबर्ट कियोसाकी यांचा मोठा इशारा
17
केरळ राज्याचे नाव बदलले जाणार? राजीव चंद्रशेखर यांचे पीएम मोदी व सीएम पिनराई विजयन यांना पत्र
18
अबू सालेम मोठा गुन्हेगार, फक्त २ दिवसांचा पॅरोल शक्य; राज्य सरकारची कोर्टात स्पष्ट भूमिका
19
‘...ती एक मनपा वगळता २९ पैकी २८ महानगरपालिका महायुती जिंकणार’, चंद्रकांत पाटील यांचा मोठा दावा 
20
सामान्यांचे घराचे स्वप्न स्वस्त होणार? अर्थसंकल्पात रिअल इस्टेट क्षेत्राचे सरकारकडे साकडे!
Daily Top 2Weekly Top 5

Sanjay Biyani Murder: अद्याप तपासाची ठोस दिशाच निश्चित नाही;प्रत्येक कारणांची खातरजमा सुरु

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2022 11:57 IST

Sanjay Biyani Murder तपासात फारशी प्रगती नसली तरी विविध स्वरूपाची माहिती गाेळा केली जात आहे. त्याच्या विश्लेषणाअंती पुढील दाेन-चार दिवसांत सर्वकाही स्पष्ट हाेईल, असा दावा पाेलीस प्रशासनाकडून केला जात आहे.

नांदेड : येथील बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी (Sanjay Biyani Murder) यांची मंगळवारी भरदिवसा सकाळी ११ वाजता त्यांच्या राहत्या घरासमाेर दुचाकीवरून आलेल्या दाेन अज्ञात मारेकऱ्यांनी गाेळ्या झाडून निर्घृण हत्या केली. या घटनेवरून दाेन दिवस लाेटल्यानंतरही नांदेड पाेलिसांची झाेळी रिकामीच आहे. अद्याप तपासाची ठाेस दिशाच निश्चित झाली नसल्याची माहिती आहे.

संजय बियाणी यांच्या खुनाच्या तपासासाठी एसआयटी (विशेष तपास पथक) स्थापन करण्यात आले आहे. ही हत्या नेमकी काेणत्या कारणावरून झाली असावी, याचा शाेध पाेलीस घेत आहेत. पुढे येणाऱ्या प्रत्येक कारणांची खातरजमा केली जात आहे. रेकाॅर्डवरील ५२ गुन्हेगारांना ताब्यात घेऊन घटनेच्या २४ तास आधी ते नेमके काेठे हाेते, याची चाैकशी केली जात आहे. मात्र, पाेलिसांना अद्याप खुनाचे कारण व मारेकरी काेण याचा सुगावा लागू शकलेला नाही. तपासात फारशी प्रगती नसली तरी विविध स्वरूपाची माहिती गाेळा केली जात आहे. त्याच्या विश्लेषणाअंती पुढील दाेन-चार दिवसांत सर्वकाही स्पष्ट हाेईल, असा दावा पाेलीस प्रशासनाकडून केला जात आहे. एसआयटीची पाच पथके वेगवेगळ्या मुद्द्यावर तपास करीत आहेत. सध्या सीसीटीव्ही, माेबाईल टाॅवर लाेकेशन याद्वारे माहिती मिळविली जात असून तपासाची दिशा निश्चित करण्यासाठी त्याचे विश्लेषण शुक्रवारपासून केले जाणार आहे.

मारेकऱ्यांनी वापरले विनाक्रमांकाचे वाहनमारेकरी काेठून आले, काेणत्या मार्गाने गेले यासाठी सीसीटीव्हीची तपासणी केली गेली. त्यांनी विनाक्रमांकाची दुचाकी वापरल्याचेही आढळून आले. पाेलीस महानिरीक्षक निसार तांबाेळी, जिल्हा पाेलीस अधीक्षक प्रमाेदकुमार शेवाळे तपासातील प्रगतीचा सतत आढावा घेत आहेत. अप्पर पाेलीस अधीक्षक विजय कबाडे यांच्याकडे एसआयटीचे नेतृत्व साेपविले गेले असून परिक्षेत्रात डिटेक्शनमध्ये तज्ज्ञ मानले जाणाऱ्या पाेलीस अधिकाऱ्यांचा यात समावेश करण्यात आला आहे.

थेट महासंचालकांनी तपासावर लक्ष ठेवावेगुरुवारी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अशाेकराव चव्हाण यांनी मुंबईत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, राज्याचे पाेलीस महासंचालक रजनीश सेठ यांची भेट घेतली. संजय बियाणी यांच्या हत्येची घटना गंभीर आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या खुनामागील नेमका हेतू काय, हा खून करणारे व त्यांचे सूत्रधार काेण, ते तातडीने पकडले जावेत, महासंचालकांनी स्वत: या तपासावर लक्ष ठेवून सतत आढावा घ्यावा, अशी मागणी ना. चव्हाण यांनी केली आहे.

टॅग्स :NandedनांदेडCrime Newsगुन्हेगारीDeathमृत्यू