शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
2
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
3
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
4
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
5
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
6
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
7
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
8
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
9
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
10
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
11
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
12
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
13
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
14
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले
15
आयुष्य कसं वळणं घेईल? काहीच सांगता येत नाही; एक स्वप्न तुटलं, सोनम राजला भेटली अन्...! मग त्याच्यासाठी केलं एवढं मोठं कांड!
16
'...तर पाकिस्तानात घुसून हल्ला करू', परराष्ट्रमंत्री जयशंकर यांचा पाकिस्तानला थेट इशारा
17
Video - "हनिमूनवरुन जिवंत परतणं ही मोठी कामगिरी..."; सोनम-राजा प्रकरणावर मीम्स व्हायरल
18
राजा रघुवंशीची हत्या, सोनम झालेली बेपत्ता; एकाच वेळी १२० पोलीस करत होते 'ऑपरेशन हनिमून'!
19
सॉफ्टवेअर इंजिनिअर झटक्यात कोडिंग करायला गेले अन् चॅटजीपीटी बंद पडले! भारतीय युजर वैतागले 
20
CM फडणवीसांची नितेश राणेंना कठोर शब्दांत समज; म्हणाले, “तुमच्या मनात काही असले तरी...”

Sanjay Biyani Murder: अद्याप तपासाची ठोस दिशाच निश्चित नाही;प्रत्येक कारणांची खातरजमा सुरु

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2022 11:57 IST

Sanjay Biyani Murder तपासात फारशी प्रगती नसली तरी विविध स्वरूपाची माहिती गाेळा केली जात आहे. त्याच्या विश्लेषणाअंती पुढील दाेन-चार दिवसांत सर्वकाही स्पष्ट हाेईल, असा दावा पाेलीस प्रशासनाकडून केला जात आहे.

नांदेड : येथील बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी (Sanjay Biyani Murder) यांची मंगळवारी भरदिवसा सकाळी ११ वाजता त्यांच्या राहत्या घरासमाेर दुचाकीवरून आलेल्या दाेन अज्ञात मारेकऱ्यांनी गाेळ्या झाडून निर्घृण हत्या केली. या घटनेवरून दाेन दिवस लाेटल्यानंतरही नांदेड पाेलिसांची झाेळी रिकामीच आहे. अद्याप तपासाची ठाेस दिशाच निश्चित झाली नसल्याची माहिती आहे.

संजय बियाणी यांच्या खुनाच्या तपासासाठी एसआयटी (विशेष तपास पथक) स्थापन करण्यात आले आहे. ही हत्या नेमकी काेणत्या कारणावरून झाली असावी, याचा शाेध पाेलीस घेत आहेत. पुढे येणाऱ्या प्रत्येक कारणांची खातरजमा केली जात आहे. रेकाॅर्डवरील ५२ गुन्हेगारांना ताब्यात घेऊन घटनेच्या २४ तास आधी ते नेमके काेठे हाेते, याची चाैकशी केली जात आहे. मात्र, पाेलिसांना अद्याप खुनाचे कारण व मारेकरी काेण याचा सुगावा लागू शकलेला नाही. तपासात फारशी प्रगती नसली तरी विविध स्वरूपाची माहिती गाेळा केली जात आहे. त्याच्या विश्लेषणाअंती पुढील दाेन-चार दिवसांत सर्वकाही स्पष्ट हाेईल, असा दावा पाेलीस प्रशासनाकडून केला जात आहे. एसआयटीची पाच पथके वेगवेगळ्या मुद्द्यावर तपास करीत आहेत. सध्या सीसीटीव्ही, माेबाईल टाॅवर लाेकेशन याद्वारे माहिती मिळविली जात असून तपासाची दिशा निश्चित करण्यासाठी त्याचे विश्लेषण शुक्रवारपासून केले जाणार आहे.

मारेकऱ्यांनी वापरले विनाक्रमांकाचे वाहनमारेकरी काेठून आले, काेणत्या मार्गाने गेले यासाठी सीसीटीव्हीची तपासणी केली गेली. त्यांनी विनाक्रमांकाची दुचाकी वापरल्याचेही आढळून आले. पाेलीस महानिरीक्षक निसार तांबाेळी, जिल्हा पाेलीस अधीक्षक प्रमाेदकुमार शेवाळे तपासातील प्रगतीचा सतत आढावा घेत आहेत. अप्पर पाेलीस अधीक्षक विजय कबाडे यांच्याकडे एसआयटीचे नेतृत्व साेपविले गेले असून परिक्षेत्रात डिटेक्शनमध्ये तज्ज्ञ मानले जाणाऱ्या पाेलीस अधिकाऱ्यांचा यात समावेश करण्यात आला आहे.

थेट महासंचालकांनी तपासावर लक्ष ठेवावेगुरुवारी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अशाेकराव चव्हाण यांनी मुंबईत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, राज्याचे पाेलीस महासंचालक रजनीश सेठ यांची भेट घेतली. संजय बियाणी यांच्या हत्येची घटना गंभीर आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या खुनामागील नेमका हेतू काय, हा खून करणारे व त्यांचे सूत्रधार काेण, ते तातडीने पकडले जावेत, महासंचालकांनी स्वत: या तपासावर लक्ष ठेवून सतत आढावा घ्यावा, अशी मागणी ना. चव्हाण यांनी केली आहे.

टॅग्स :NandedनांदेडCrime Newsगुन्हेगारीDeathमृत्यू