कंधार तालुक्यातील गावपुढाऱ्यांची धावपळः
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:16 IST2020-12-29T04:16:20+5:302020-12-29T04:16:20+5:30
कंधार : तालुक्यातील ९७ ग्रामपंचायतीतील सदस्यांची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे.नामनिर्देशनपत्र दाखल करताना आवश्यक असलेली संभाव्य महिला उमेदवारांची कागदपत्रे ...

कंधार तालुक्यातील गावपुढाऱ्यांची धावपळः
कंधार : तालुक्यातील ९७ ग्रामपंचायतीतील सदस्यांची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे.नामनिर्देशनपत्र दाखल करताना आवश्यक असलेली संभाव्य महिला उमेदवारांची कागदपत्रे जमवाजमव करताना कसरत होत असल्याचे चित्र आहे.आपल्या पँनलमधील उमेदवाराची अचूक माहिती सादर करण्यासाठी गावपुढाऱ्यांची मोठी धावपळ होत आहे.
तालुक्यातील ९७ ग्रामपंचायतीची निवडणूक प्रक्रियेला गती आली आहे.परंतु आपले पँनल सक्षम असावे. कोणतीही त्रुटी नामनिर्देशन दाखल करताना असू नये .यासाठी गावपुढारी जागरूकपणे राजकीय हालचाली करत आहेत.त्यातच ग्रामपंचायतीत महिलेसाठी आरक्षित असलेल्या जागावर उमेदवारी देताना पँनलप्रमुखांचा कस लागत आहे.पुरूषांनी तयारी केलेल्या वॉर्डातील जागा महिलेला आरक्षित झाल्याने उमेदवारी दाखल करताना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
जात प्रमाणपत्र काढताना तारांबळ
अनुसूचित जाती ,अनुसूचित जमाती व नागारिकांचा मागास प्रवर्ग आदी जागेवर उमेदवारी दाखल करताना जात प्रमाणपत्र असणे व जातवैधता प्रमाणपत्रासाठी प्रस्ताव दाखल केलेली पावती महत्त्वाची आहे महिले करिता आरक्षित जागेवर तर उमेदवारी देत असताना दमछाक होत आहे. माहेरकडील पुरावे सादर करणे,माहेर ज्या उपविभागीय अधिकारी कार्यालयात आहे.येथून प्रमाणपत्र काढणे आव्हानात्मक झाले आहे.त्यासाठी पुरावे,वंशावळ आदीसाठी पुरूषांची धावपळ होत असल्याचे चित्र आहे.
नाममात्र उमेदवारी दाखल
२३ डिसेंबर पासून उमेदवारी दाखल करण्यास प्रारंभ होऊनही नाममात्र उमेदवारी दाखल झाली आहे.दि.२३ रोजी एकही अर्ज दाखल झाला नव्हता. २४ डिसेंबर रोजी १२ जणांनी उमेदवारी दाखल केली.त्यात फुलवळ- १, हाळदा -२ व लाडका -९ येथील उमेदवारांचा समावेश आहे.अशी माहिती नायब तहसीलदार नयना कुलकर्णी ,उत्तम जोशी, मन्मथ थोटे यांनी दिली.
सलग ३ दिवस सुट्टी असल्याने ऑनलाईन माहिती भरण्यासाठी इच्छुक उमेदवारांची धावपळ चालू होती.३ दिवस ऑनलाईन माहिती भरताना ग्रामीण भागात नेटवर्क लपाछपी करत असल्याने अनेकांना मोठा त्रास सहन करावा लागला. मोजकेच दिवस नामनिर्देशन दाखल करायला शिल्लक असल्याने मोठी गर्दी होण्याचे संकेत आहेत.त्यात अचूक माहिती भरून उमेदवारी कायम राहण्यासाठी गावपुढाऱ्यांचा राजकीय कस लागणार आहे.