शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

धनंजय मुंडेंना मंत्रीमंडळाबाहेर काढून मस्साजोग प्रकरणाची चौकशी करा: नाना पटोले

By शिवराज बिचेवार | Updated: December 23, 2024 15:48 IST

मुख्यमंत्री आणि अजित पवारांनी धनंजय मुंडेंना मंत्री मंडळातून बाहेर काढून चौकशी केल्यास मयत संतोष देशमुखांना न्याय मिळेल.

नांदेड: वाल्मिक कराड हा माफीया आहे. मस्साजोग प्रकरणात सत्ताधारी पक्षातील आमदारांनी देखील सत्य परिस्थिती सांगितली होती. पण मुख्यमंत्र्यांनी टाईमपास केला. माफीयाला ताकद देण्याचे काम केले. त्यामुळे धनंजय मुंडे यांना मंत्रीमंडळातून बाहेर काढून या प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली.

नाना पटोले हे सोमवारी नांदेड विमानतळावर आले होते. यावेळी पटोले म्हणाले, अजित पवारांवर ज्यावेळी आरोप झाले. त्यावेळी त्यांनाही मंत्री मंडळातून बाहेर काढण्यात आले होते. आता मुख्यमंत्री आणि अजित पवारांनी धनंजय मुंडेंना मंत्री मंडळातून बाहेर काढून चौकशी केल्यास मयत संतोष देशमुखांना न्याय मिळेल. असे पटोले म्हणाले. तसेच छगन भूजबळ हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला जाऊ शकतात. त्यावर मी काय बोलणार? त्यांच्या नाराजीबद्दल मला माहिती नाही. मंत्री पदाचे वाटप झाल्यानंतर आता पालकमंत्री पदासाठी रस्सीखेच आहे. कारण हे लोकातून निवडून आलेले सरकार नाही. निवडणुक आयोग आणि भाजपाच्या सिंडीकेट मधून आलेले सरकार आहे. त्यामुळे लोकांना त्यांना काही देणे-घेणे नाही. लोकांना कसे लुटता येईल, मलाईदार खाते, मालदार जिल्हे कसे मिळतील यावर सगळा जोर सुरु आहे. 

... तर नरेंद्र मोदी यांचे अपयशधारावी अदानीच्या घशात घातले. दोन दिवसापूर्वी तसा जीआर निघाला. अदानी, भाजपाचे नेते आणि निवडणुक आयोग हे ठरलेलं आहे. उद्योगपतींच्या माध्यमातून हे राज्य चालविलं जात आहे. फडणवीसांनी भारत जोडो यात्रेत नक्षल संघटना होत्या असा आरोप केला होता. तेव्हा मी त्यांना पत्र पाठवून कुठल्या नक्षल यंत्रणा त्यात सहभागी होत्या याची यादी मागितली होती. तुम्ही गृहमंत्री होता, केंद्रात तुमचे सरकार आहे. मग हे नरेंद्र मोदी यांचे अपयश आहे असे त्यांना सांगायचे आहे काय? असा सवालही पटोले यांनी केला.

टॅग्स :Dhananjay Mundeधनंजय मुंडेNana Patoleनाना पटोलेBeedबीडbeed sarpanch murder caseबीड सरपंच हत्या प्रकरण