शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
3
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
4
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
5
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
6
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
7
...तर तलवारीचा डौलही राहील आणि शानही !
8
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
9
मेडिकल कॉलेजमधील खर्डेघाशी थांबवा ! ‘एचएमआयएस’च्या इंटरनेट सुविधेसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडून ३२ कोटी २१ लाख रुपये
10
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
11
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
12
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
14
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
15
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
16
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
17
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
18
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
19
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
20
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...

कंधार तालुक्यात ६१ हजार शेतकऱ्यांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2018 00:41 IST

गतवर्षी खरीप हंगामात तालुक्यात करण्यात आलेल्या पीक कापणी प्रयोगातून अंतिम पैसेवारी ४५़५ (४६) आली़ त्या अनुषंगाने दुष्काळसृदश्य स्थितीचे चित्र ‘लोकमत’ने नजरी आणेवारीपासून सातत्याने मांडले़ त्यानंतर अंतिम आणेवारीपर्यंत सतत पाठपुरावा केला गेला़ दरम्यान, दुष्काळसदृश्य परिस्थिती जिल्हाधिकारी अरूण डोंगरे यांनी जाहीर केली़ त्यात विविध स्वरूपाच्या सवलती लागू केल्या असून याचा फायदा तालुक्यातील ६१ हजार शेतक-यांना मिळणार आहे़

ठळक मुद्देदुष्काळसदृश परिस्थितीमुळे सवलतींचा मिळणार लाभ

लोकमत न्यूज नेटवर्ककंधार : गतवर्षी खरीप हंगामात तालुक्यात करण्यात आलेल्या पीक कापणी प्रयोगातून अंतिम पैसेवारी ४५़५ (४६) आली़ त्या अनुषंगाने दुष्काळसृदश्य स्थितीचे चित्र ‘लोकमत’ने नजरी आणेवारीपासून सातत्याने मांडले़ त्यानंतर अंतिम आणेवारीपर्यंत सतत पाठपुरावा केला गेला़ दरम्यान, दुष्काळसदृश्य परिस्थिती जिल्हाधिकारी अरूण डोंगरे यांनी जाहीर केली़ त्यात विविध स्वरूपाच्या सवलती लागू केल्या असून याचा फायदा तालुक्यातील ६१ हजार शेतक-यांना मिळणार आहे़मागील दोन ते तीन वर्षांपासून शेतकºयांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. दरम्यान, सद्य:स्थितीत निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकºयांचे आर्थिक गणित पूर्णपणे विस्कटले आहे. गतवर्षीच्या खरीप हंगामात अत्यल्प पर्जन्यवृष्टी झाली. तालुक्याचे सरासरी पर्जन्यमान ८३३ मि़मी़ असताना यंदा ५९८़३३ मि़मी़ झाले. परिणामी, कमी पावसासमुळे हंगामातील पिकांची योग्य वाढ झाली नाही़ दरम्यान, पेरणीपूर्व मशागत, पेरणी बियाणे-खते, निंदणी, खुरपणी, रोगप्रतिबंधक फवारणी, काढणी आदी कामांसाठी शेतकºयांना मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागला. परंतु, केलेल्या खर्चाच्या तुलनेत उतारा घटला असून शेतमालाला बाजारात योग्य भाव मिळाला नसल्याने बळीराजा आर्थिक विंवचनेत सापडला. त्यानंतर शेतकºयांच्या व्यथेचे वास्तव चित्र ‘लोकमत’ने सातत्याने मांडले़ तसेच लोकप्रतिनिधी, विविध राजकीय पक्षाने दुष्काळी चित्र प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले. दरम्यान, तालुका प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेल्या पीककापणी प्रयोगानंतर तालुक्यातील दुष्काळी चित्र समोर आले. डिसेंबर २०१७ मध्ये वरिष्ठ पातळीवर अहवाल पाठविण्यात आला. त्यानंतर शासनाने अहवालाची दखल घेतल्यानंतर शासनाच्या विविध सवलती लागू केल्याचे जाहीर केले़दुष्काळसदृश्य परिस्थिती असलेल्या तालुक्यातील १२६ महसुली गावांना शासनाच्या सवलतींचा लाभ मिळणार आहे़ ६१ हजारांपेक्षा जास्त शेतकºयांना याचा फायदा होणार आहे़ यामध्ये जमीन महसुलात सवलत, कृषिपंपाच्या चालू वीजबिलात ३३़५ टक्के सवलत, सहकारी कर्जाची पुनर्रचना यासह शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफ, शेतीशी निगडित कर्जवसुलीस स्थगिती, नरेगांं अंतर्गत कामाच्या निकषात काहीअंशी शिथिलता, आवश्यक तेथे पाणीपुरवठ्यासाठी टँकर आदी सवलतींचा समावेश असून दुष्काळी अनुदान देवून शेतकºयांना धीर देण्याची मागणी केली जात आहे़खरीप हंगामाची अशी स्थिती, शेतीवरील दिवसेंदिवस वाढत चाललेला खर्च आणि बाजारात शेतीमालाला मिळणारा निराशाजनक भाव याचा ताळमेळ बसत नसल्याने शासनाने दुष्काळी अनुदान देण्याची मागणी केली जात आहे.दुष्काळी अनुदान देण्याची मागणीमागील दोन ते तीन वर्षांपासून निसर्गाच्या लहरीपणाचा फटका शेतकºयांना बसत आहे. परिणामी, बळीराजा मेटाकुटीला आला असून शेतकºयांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. दरम्यान, खरीप हंगामाची पाण्याअभावीची स्थिती, शेतीवरील दिवसेंदिवस वाढत चाललेला खर्च आणि बाजारात शेतीमालाला मिळणारा निराशाजनक भाव याचा ताळमेळ बसत नसल्याने शासनाच्या वतीने आता तत्काळ दुष्काळी अनुदान देण्याची मागणी शेतकºयांतून केली जात आहे.

टॅग्स :WaterपाणीFarmerशेतकरीagricultureशेतीNandedनांदेड