शहरं
Join us  
Trending Stories
1
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
2
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
3
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
4
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
5
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
6
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
7
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
8
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
9
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
10
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर
11
'निराधार आणि बेजबाबदार'; राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाने सोडले मौन, काय दिले उत्तर?
12
IND vs ENG 5th Test: Gus Atkinson चा 'पंजा'! टीम इंडियानं २० धावांत गमावल्या ४ विकेट्स! अन्...
13
सेबीच्या नियमांना फाटा देऊन शेअर्सची खरेदी-विक्री, पण धोकाही मोठा! 'ग्रे मार्केट'ची Inside Story
14
Shravan Shanivar 2025: शनिवारी कसे करावे अश्वत्थ मारुती पूजन? पिंपळाच्या झाडाचीही पूजा महत्त्वाची!
15
नागरिकांची झोप उडवणाऱ्या चड्डी- बनियान टोळीला पकडण्यात पोलिसांना यश!
16
आशा भोसलेंनी पुण्यातील आलिशान फ्लॅट विकला! एकाच झटक्यात कमावले इतके कोटी, तब्बल ४२ टक्के वाढ
17
कुठल्याही देवावर विश्वास नाही, कुठलाही धर्म मानत नाही, या १० देशांमधील बहुतांश लोक आहेत नास्तिक
18
Viral Video: भल्यामोठ्या अजगराला दुचाकीला बांधून फरफटत नेलं, संतापजनक प्रकार कॅमेऱ्यात रेकॉर्ड!
19
वानखेडे स्टेडियममध्ये सुनील गावसकर, शरद पवार यांचा होणार गौरव, MCA उभारणार पुतळा
20
जुहूच्या समुद्रात दोन अल्पवयीन मुले बुडाली; एकाला वाचवलं, दुसऱ्याचा शोध सुरू!

आता एमपीएससीच्या धर्तीवर होणार राज्यात पोलीस भरती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2019 13:20 IST

यामुळे महिनाभर चालणारी भरती प्रक्रिया जलदगतीने पूर्ण होणार आहे.

ठळक मुद्देगुणवंत तरुणांची निवड करणे होईल सोपे भरती प्रक्रियाही जलदगतीने पार पडेल

औरंगाबाद : राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार राज्य लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर पोलीस शिपाई पदांची भरती केली जाणार आहे.  पोलीस भरतीकरिता अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवारांची प्रथम लेखी परीक्षा घेतली जाईल. लेखी परीक्षेत सर्वाधिक गुण घेऊन उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांचीच रिक्त पदानुसार शारीरिक  क्षमता चाचणीसाठी निवड केली जाणार आहे. नव्या भरती पद्धतीमुळे पोलीस दलाला गुणवंत उमेदवार मिळतील, शिवाय महिनाभर चालणारी भरती प्रक्रिया जलदगतीने पूर्ण होणार आहे.

याविषयी पोलीस उपायुक्त डॉ. दीपाली धाटे- घाडगे म्हणाल्या की, राज्य पोलीस दलातील शिपाई पदासाठी गतवर्षीपर्यंत झालेल्या भरती प्रक्रियेंतर्गत उमेदवारांची प्रथम मैदानी चाचणी होते. जे उमेदवार मैदानी चाचणीत सर्वाधिक गुण घेऊन उत्तीर्ण होत त्यांची लेखी परीक्षेसाठी निवड केली जात असे आणि शेवटी लेखी आणि मैदानी चाचणीतील गुणांची बेरीज करून उमेदवारांची अंतिम निवड होत असे. या प्रक्रियेनुसार अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवारांची शारीरिक क्षमता चाचणी घेण्यासाठी पंधरा दिवस ते एक महिन्याचा कालावधी लागत होता. त्यामुळे भरती प्रक्रियेत पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांचा वेळ जात असे. 

काही वर्षांपासून  महाराष्ट्र पोलीस दलातील कर्मचाऱ्यांच्या कामाच्या स्वरुपात आता बदल झाला आहे. गुन्ह्यांचे स्वरूपही बदलले आहे. सायबर गुन्हे, आर्थिक गुन्ह्यांची संख्याही वाढत आहे. अशा गुन्ह्यांची जलदगतीने आणि अचूक उकल करण्यासाठी पोलीस दलात आता सक्षम उमेदवारांची निवड होणे गरजेचे आहे. ही बाब लक्षात घेऊन राज्य शासनाने पोलीस भरती प्रक्रियेत अंशत: बदल केला. आता अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवारांची एमपीएससीच्या धर्तीवर लेखी परीक्षा होईल. लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची शारीरिक क्षमता चाचणीसाठी निवड होईल. त्यात सर्वाधिक गुण घेणाऱ्या उमेदवारांची उपलब्ध जागेनुसार पोलीस दलात निवड होईल. 

टॅग्स :PoliceपोलिसMPSC examएमपीएससी परीक्षाStudentविद्यार्थी