शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
2
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
3
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
4
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
5
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
6
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
7
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
8
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
9
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
10
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
11
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
12
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
13
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
14
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
15
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
16
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
17
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
18
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
19
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
20
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 

आता एमपीएससीच्या धर्तीवर होणार राज्यात पोलीस भरती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2019 13:20 IST

यामुळे महिनाभर चालणारी भरती प्रक्रिया जलदगतीने पूर्ण होणार आहे.

ठळक मुद्देगुणवंत तरुणांची निवड करणे होईल सोपे भरती प्रक्रियाही जलदगतीने पार पडेल

औरंगाबाद : राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार राज्य लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर पोलीस शिपाई पदांची भरती केली जाणार आहे.  पोलीस भरतीकरिता अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवारांची प्रथम लेखी परीक्षा घेतली जाईल. लेखी परीक्षेत सर्वाधिक गुण घेऊन उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांचीच रिक्त पदानुसार शारीरिक  क्षमता चाचणीसाठी निवड केली जाणार आहे. नव्या भरती पद्धतीमुळे पोलीस दलाला गुणवंत उमेदवार मिळतील, शिवाय महिनाभर चालणारी भरती प्रक्रिया जलदगतीने पूर्ण होणार आहे.

याविषयी पोलीस उपायुक्त डॉ. दीपाली धाटे- घाडगे म्हणाल्या की, राज्य पोलीस दलातील शिपाई पदासाठी गतवर्षीपर्यंत झालेल्या भरती प्रक्रियेंतर्गत उमेदवारांची प्रथम मैदानी चाचणी होते. जे उमेदवार मैदानी चाचणीत सर्वाधिक गुण घेऊन उत्तीर्ण होत त्यांची लेखी परीक्षेसाठी निवड केली जात असे आणि शेवटी लेखी आणि मैदानी चाचणीतील गुणांची बेरीज करून उमेदवारांची अंतिम निवड होत असे. या प्रक्रियेनुसार अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवारांची शारीरिक क्षमता चाचणी घेण्यासाठी पंधरा दिवस ते एक महिन्याचा कालावधी लागत होता. त्यामुळे भरती प्रक्रियेत पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांचा वेळ जात असे. 

काही वर्षांपासून  महाराष्ट्र पोलीस दलातील कर्मचाऱ्यांच्या कामाच्या स्वरुपात आता बदल झाला आहे. गुन्ह्यांचे स्वरूपही बदलले आहे. सायबर गुन्हे, आर्थिक गुन्ह्यांची संख्याही वाढत आहे. अशा गुन्ह्यांची जलदगतीने आणि अचूक उकल करण्यासाठी पोलीस दलात आता सक्षम उमेदवारांची निवड होणे गरजेचे आहे. ही बाब लक्षात घेऊन राज्य शासनाने पोलीस भरती प्रक्रियेत अंशत: बदल केला. आता अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवारांची एमपीएससीच्या धर्तीवर लेखी परीक्षा होईल. लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची शारीरिक क्षमता चाचणीसाठी निवड होईल. त्यात सर्वाधिक गुण घेणाऱ्या उमेदवारांची उपलब्ध जागेनुसार पोलीस दलात निवड होईल. 

टॅग्स :PoliceपोलिसMPSC examएमपीएससी परीक्षाStudentविद्यार्थी