शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

बोरगडी, सिबदरा, खैरगाव, धानोऱ्यात तीव्र पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2019 00:52 IST

तालुक्यातील बोरगडी, सिबदरा, खैरगाव, धानोरा आदी गावांत विहिरी, बोअरचे पाणी संपल्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे़ वरील गावांना टँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे़

हिमायतनगर : तालुक्यातील बोरगडी, सिबदरा, खैरगाव, धानोरा आदी गावांत विहिरी, बोअरचे पाणी संपल्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे़ वरील गावांना टँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे़बोरगडी गावातील नागरिक गावाच्या बाहेरील बोअरवरून डोक्यावर, बैलगाडीने पाणी रात्रंदिवस भरत आहेत़ दरवर्षीप्रमाणे हनुमान मंदिराजवळच्या विहिरीत टँकरने पाणी टाकावे व गावकऱ्यांची तहान भागवावी, अशी मागणी माजी सरपंच दगडू काईतवाड, के़बी़ शेन्नेवाड, देवन्ना शेन्नेवाड, लक्ष्मण भैरेवाड आदींनी केली़ सिबदरा येथेही पाणीटंचाई असल्याचे प्रभाकर बाचकलवाड, मारोती भद्देवाड आदींनी सांगितले़ गावात एकाही विहिरीला व बोअरला पाणी नाही़ खैरगाव ज़ व लाईनतांडा येथे तीव्र पाणीटंचाई असून अधिग्रहण केलेल्या विहिरीचे पाणी संपल्याचे विठ्ठल गुंफलवाड यांनी सांगितले़गावात पाणीटंचाई तीव्र आहे़ टँकरची मागणी केली आहे़ महिला, बालके पाण्यासाठी भटकंती करीत आहेत़ हिमायतनगरातील ४०० ते ५०० फुटांचे बोअर कोरडे पडत आहेत़ नगरपंचायतीने १५० बोअरद्वारा शहराला पाणीपुरवठा चालू होता़ आता ७० च्या आसपास बोअरला पाणी आहे़ परंतु, शहराला कायम पाणीपुरवठा व्यवस्था करावी, अशी मागणी असून ज्या वॉर्डात तीव्र पाणीटंचाई आहे तेथे टँकरची व्यवस्था करावी, अशी मागणी होत आहे़

टॅग्स :NandedनांदेडWaterपाणीElectionनिवडणूकwater shortageपाणीटंचाईwater transportजलवाहतूक