शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

रेल्वेची कोट्यावधीची जमीन हडपली; तलाठी, मंडळ अधिकाऱ्यासह एकाविरुद्ध गुन्हा दाखल

By प्रसाद आर्वीकर | Updated: December 18, 2023 16:49 IST

मुदखेड रेल्वे जंक्शन रेल्वे पट्टीच्या आजूबाजूची जमीन निजाम काळात रेल्वेने अधिग्रहित केली होती.

नांदेड : दक्षिण मध्य रेल्वेच्या मालकीची मुदखेड शिवारातील ३ हेक्टर ७५ आर जमीन हडपल्या प्रकरणी भिमलाल भागुराम कोतवाल यांच्यासह तत्कालीन तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्याविरुद्ध मुदखेड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला आहे.

दक्षिण मध्य रेल्वेचे वरिष्ठ अभियंता गोपाल प्रसाद सिंग यांनी या प्रकरणात तक्रार दिली आहे. दक्षिण मध्य रेल्वे सिकंदराबाद अंतर्गत मुदखेड तालुक्यातील मुदखेड रेल्वे जंक्शन रेल्वे पट्टीच्या आजूबाजूची जमीन निजाम काळात रेल्वेने अधिग्रहित केली होती. ती आजपर्यंत रेल्वेच्या ताब्यात आहे. मुदखेड शिवारातील गट नंबर १६७ गट क्रमांक ४६८ मधील ३ हेक्टर ७५ आर जमिनीवर १९८२-८३ पासून १९९४-९५ पर्यंत रेल्वे लाईन अशी नोंद आहे. १९९५-९६ पासून ते २०१२-१३ पर्यंत या नोंदीमध्ये खाडाखोड करून तत्कालीन तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांनी फेर क्रमांक २७२६ अन्वये रेल्वे लाईन हे नाव कमी करून भागूराम गंगाराम कोतवाल यांचे नाव मालकी हक्कात लावले. तसेच फेर क्रमांक २७३१ अन्वये वारसाने भीमलाल भागुराम कोतवाल यांचे नाव मालकी हक्कात घेण्यात आले.

नाव परिवर्तन करताना कोणत्याही प्रकारची नोटीस रेल्वे प्रशासनाला मिळाली नाही. ही जमीन तत्कालीन तलाठी, मंडळ अधिकारी आणि भीमलाल भागुराम कोतवाल यांनी संगणमत करून हडप केली आहे, असे या तक्रारीत म्हटले आहे. त्यावरून मुदखेड पोलीस ठाण्यात तिन्ही आरोपींविरुद्ध १६ डिसेंबर रोजी रात्री पावणे बारा वाजण्याच्या सुमारास फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस निरिक्षक वसंत सरपे करीत आहेत.

चौकशी समितीच्या अहवालानंतर कारवाईया प्रकरणात जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी समिती नियुक्त केली होती. सात सदस्यांचा त्यात समावेश होता. चौकशी समितीने १४ डिसेंबर २०२० रोजी अहवाल दिला. त्याचे अवलोकन केले असता, मुदखेड येथील सर्वे नंबर १६७ मधील १२ एकर, एक गुंठे जमिनीचे १९६०-६१ पासून १९६८-६९ तसेच १९७०-७१ ते १९८१-८२ पर्यंत मूळ सातबारा उताऱ्यात भागुराम गंगाराम ही नोंद खडाखोड करून घेतली असल्याचे दिसून येत आहे. हस्ताक्षरात सुद्धा तफावत असल्याचा अहवाल दिला आहे.

सामाजिक कार्यकर्त्याने फोडले बिंगअधिकारी आणि कर्मचारी यांना हाताशी धरून रेल्वेची कोट्यवधी रुपयांची जमीन हडप करण्यात आली होती. परंतु याबाबत रेल्वेचे अधिकारी अनभिज्ञ होते. सामाजिक कार्यकर्ते मोहम्मद रफिक उर्फ मुशी अब्दुल शकुर यांनी या प्रकरणाचे बिंग फोडले. पुराव्यासह त्यांनी रेल्वे अधिकाऱ्यांची भेट घेऊन माहिती दिली. त्यानंतर रेल्वेच्या अधिकाऱ्यांना ही बाब लक्षात आली असून, त्यांनी तातडीने कार्यवाही करीत ठाण्यात तक्रार दिली. त्यामुळे शासनची कोट्यवधी रुपयांची जमीन माफियांच्या घशात जाण्यापासून वाचली आहे.

टॅग्स :Nandedनांदेडrailwayरेल्वेCrime Newsगुन्हेगारी