शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
4
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
5
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
6
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
7
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
8
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
9
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
10
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
11
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
12
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
13
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
14
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
15
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
16
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
17
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
18
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
19
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
20
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर

शिवाजी महाराजांच्या जयघोषाने भाषणाची सुरुवात, यात्रेला कोणीही रोखू शकत नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2022 23:43 IST

७ नोव्हेंबर रोजी रात्री ९.३६ वाजता खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो पदयात्रा देगलूरमध्ये दाखल झाली

देगलूर (जि. नांदेड) : छत्रपती शिवाजी महाराज की जय, असा जयघोष करत खासदार राहुल गांधी यांनी आपल्या भाषणाची सुरुवात केली. एवढ्या उशिरापर्यंत आपण माझे स्वागत करण्यासाठी एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात, त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. कन्याकुमारीपासून सुरू झालेली ही यात्रा सरळ ठरल्याप्रमाणे श्रीनगर येथे जाऊनच थांबेल. त्याला कोणतीही शक्ती अथवा आंधी, तुफान रोखू शकत नाही, असे खासदार राहुल गांधी यांनी देगलूरमध्ये उपस्थितांना मागदर्शन करताना केले.

७ नोव्हेंबर रोजी रात्री ९.३६ वाजता खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो पदयात्रा देगलूरमध्ये दाखल झाली. माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, राज्याचे प्रभारी एच. के. पाटील, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आदींनी राहुल गांधी यांचे स्वागत केले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून खासदार राहुल गांधी यांनी उपस्थितांशी संवाद साधला. ते म्हणाले, देशातील जनतेविषयी, सामान्यांविषयी असलेली नफरत, क्रोध संपवायचा आहे, बंधुभाव वाढवायचा आहे. यात्रेत आम्ही कुठल्याही प्रकारची भाषणबाजी करीत नाहीत. सकाळी ६ वाजता सुरू झालेल्या पदयात्रेत व्यापारी, शेतकरी, विद्यार्थी, मजूर, गोरगरीब, कष्टकरी आम्हाला भेटून संवाद साधतात. त्या सर्वांसाठी आमच्या मनाचे दरवाजे आणि दिल खुले आहे. संवादातून लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत.

जीएसटी आणि नोटाबंदीमध्ये छोटे व्यापारी संपुष्टात आले. बेरोजगारी वाढली. सामान्यांसह व्यापारी परेशान आहेत. आता कोणीही रोजगार उपलब्ध करून देऊ शकत नाही. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बेरोजगारी आणि महागाईवर आज बोलायला तयार नाहीत. गॅसचे दर वाढले, पेट्रोल आणि डिझेलचे भाव कुठे गेले, यावर मोदी काहीच बोलत नाहीत. हा आवाज बुलंद करण्यासाठी आणि सर्वसामान्य कष्टकऱ्यांचे सुख-दुःख, प्रश्न जाणून घेण्यासाठी आम्ही पदयात्रेत सर्वांशी संवाद साधतोय. मला अभिमान वाटतो की, महाराष्ट्रातील यात्रा ही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अभिवादनाने सुरू झाली आहे. शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या महाराष्ट्राच्या पदयात्रेला सुरुवात होत असल्याचा अभिमान असल्याचे राहुल गांधी म्हणाले. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीNandedनांदेडdeglur-acदेगलूरBharat Jodo Yatraभारत जोडो यात्राShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराज