शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
3
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
4
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
5
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
6
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
7
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
8
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
9
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
10
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
11
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
12
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
13
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
14
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
15
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
16
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
17
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
18
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
19
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या

शिवाजी महाराजांच्या जयघोषाने भाषणाची सुरुवात, यात्रेला कोणीही रोखू शकत नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2022 23:43 IST

७ नोव्हेंबर रोजी रात्री ९.३६ वाजता खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो पदयात्रा देगलूरमध्ये दाखल झाली

देगलूर (जि. नांदेड) : छत्रपती शिवाजी महाराज की जय, असा जयघोष करत खासदार राहुल गांधी यांनी आपल्या भाषणाची सुरुवात केली. एवढ्या उशिरापर्यंत आपण माझे स्वागत करण्यासाठी एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात, त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. कन्याकुमारीपासून सुरू झालेली ही यात्रा सरळ ठरल्याप्रमाणे श्रीनगर येथे जाऊनच थांबेल. त्याला कोणतीही शक्ती अथवा आंधी, तुफान रोखू शकत नाही, असे खासदार राहुल गांधी यांनी देगलूरमध्ये उपस्थितांना मागदर्शन करताना केले.

७ नोव्हेंबर रोजी रात्री ९.३६ वाजता खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो पदयात्रा देगलूरमध्ये दाखल झाली. माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, राज्याचे प्रभारी एच. के. पाटील, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आदींनी राहुल गांधी यांचे स्वागत केले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून खासदार राहुल गांधी यांनी उपस्थितांशी संवाद साधला. ते म्हणाले, देशातील जनतेविषयी, सामान्यांविषयी असलेली नफरत, क्रोध संपवायचा आहे, बंधुभाव वाढवायचा आहे. यात्रेत आम्ही कुठल्याही प्रकारची भाषणबाजी करीत नाहीत. सकाळी ६ वाजता सुरू झालेल्या पदयात्रेत व्यापारी, शेतकरी, विद्यार्थी, मजूर, गोरगरीब, कष्टकरी आम्हाला भेटून संवाद साधतात. त्या सर्वांसाठी आमच्या मनाचे दरवाजे आणि दिल खुले आहे. संवादातून लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत.

जीएसटी आणि नोटाबंदीमध्ये छोटे व्यापारी संपुष्टात आले. बेरोजगारी वाढली. सामान्यांसह व्यापारी परेशान आहेत. आता कोणीही रोजगार उपलब्ध करून देऊ शकत नाही. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बेरोजगारी आणि महागाईवर आज बोलायला तयार नाहीत. गॅसचे दर वाढले, पेट्रोल आणि डिझेलचे भाव कुठे गेले, यावर मोदी काहीच बोलत नाहीत. हा आवाज बुलंद करण्यासाठी आणि सर्वसामान्य कष्टकऱ्यांचे सुख-दुःख, प्रश्न जाणून घेण्यासाठी आम्ही पदयात्रेत सर्वांशी संवाद साधतोय. मला अभिमान वाटतो की, महाराष्ट्रातील यात्रा ही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अभिवादनाने सुरू झाली आहे. शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या महाराष्ट्राच्या पदयात्रेला सुरुवात होत असल्याचा अभिमान असल्याचे राहुल गांधी म्हणाले. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीNandedनांदेडdeglur-acदेगलूरBharat Jodo Yatraभारत जोडो यात्राShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराज