शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
3
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
4
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
5
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
6
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
7
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
8
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
9
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
10
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
11
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
12
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
13
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
14
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
15
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
16
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
17
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
19
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
20
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या

राफेलच्या आरोपामुळे भाजपा बेजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2018 00:07 IST

मागील निवडणुकीच्या वेळी भाजपाकडून काँग्रेसवर भ्रष्टाचाराचे घणाघाती आरोप होत होते़ या आरोपांची उत्तरे देताना काँग्रेसची दमछाक झाल्याचे दिसून आले होते़ नेमकी तशीच परिस्थिती आता भाजपाची झाली आहे़

ठळक मुद्देप्रदेश प्रवक्ते नांदेडमध्ये : सोमवारच्या काँग्रेसच्या आंदोलनानंतर भाजपाची पत्रकार परिषद

नांदेड : मागील निवडणुकीच्या वेळी भाजपाकडूनकाँग्रेसवर भ्रष्टाचाराचे घणाघाती आरोप होत होते़ या आरोपांची उत्तरे देताना काँग्रेसची दमछाक झाल्याचे दिसून आले होते़ नेमकी तशीच परिस्थिती आता भाजपाची झाली आहे़ राफेल विमान खरेदीचा मुद्दा अगदी संसदेपासून गावखेड्यापर्यंत चर्चेत आहे़ त्यातच सोमवारी जिल्हा काँग्रेसच्या वतीने याच मुद्यावरुन निदर्शने केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी मंगळवारी भाजपाच्या प्रदेश प्रवक्त्यांना नांदेडमध्ये येऊन या विषयावर सारवासारव करावी लागली़ काँग्रेसकडे मुद्देच नसल्याने ते विनाकारण राफेलचा मुद्दा चर्चेत आणत असल्याचे भाजपाचे म्हणणे होते़राफेलबाबत काँग्रेसकडून वस्तुस्थितीपेक्षा वेगळ्या पद्धतीने मांडणी करण्यात येत आहे़ काँग्रेसजवळ मोदी सरकारच्या विरोधात मुद्दाच नसल्यामुळे राजकीय स्वार्थासाठी राफेलबाबत लोकांच्या मनात संशय निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचा आरोप भाजपाचे प्रवक्ते गणेश हाके यांनी केला़पत्रपरिषदेत हाके म्हणाले, संरक्षण क्षेत्रातील साहित्य खरेदीबाबत यापूर्वी कधीही एवढ्या जाहीरपणे चर्चा करण्यात आली नव्हती़ युपीएच्या दहा वर्षांच्या काळात राफेल खरेदीबाबत केवळ चर्चाच करण्यात आल्या़ संरक्षण साहित्यासाठी एकतर समोरील देशाशी करार करण्यात येतो किंवा दलालामार्फत ती खरेदी करण्यात येते़ युपीएने दहा वर्षे दलालासोबत चर्चा करुनही त्याची खरेदी केली नाही़ मात्र मोदी सरकारने संरक्षणाला प्राधान्य देत राफेलसाठी त्या देशाशी करार केला़कारगिलच्या युद्धानंतरच उच्च क्षमतेची लढाऊ विमाने खरेदी करण्याची गरज संरक्षण दलांनी व्यक्त केली होती़ त्यामुळे या विषयाला मोदी सरकारने गंभीरतेने घेतले़ सर्व प्रक्रिया करुनच राफेलची खरेदी करण्यात आली आहे़ त्यासाठी अंबानीच्या रिलायन्स कंपनीची दसॉल्टने निवड केली आहे़ त्याचबरोबर अन्य ३० कंपन्यांसोबतही दसॉल्टने करार केला आहे़ त्यामुळे अंबानीला फायदा पोहोचविला हे म्हणणे चूक आहे़या विषयात न्यायालयाने काँग्रेसला चपराक लगावल्यानंतरही काँग्रेसकडून या विषयाचे भांडवल करण्यात येत आहे़ असा आरोपही हाके यांनी केला़ यावेळी हाके यांनी इतर विषयांवर बोलण्यास नकार देत फक्त राफेलच्या मुद्यावर बोलण्याची विनंती केली़ यावेळी आ़ राम पाटील रातोळीकर, महानगराध्यक्ष संतुकराव हंबर्डे, प्रवीण साले, व्यंकटेश साठे यांची उपस्थिती होती़ग्रामपंचायत पातळीवर पत्रपरिषद घेण्याची गरजराफेलसारख्या राष्ट्रीय विषयावर जिल्हा पातळीवर पत्रपरिषद घेण्याची काय गरज ? असा प्रश्न हाके यांच्यासमोर उपस्थित केला असताना ते म्हणाले, काँग्रेसने या विषयावरुन लोकांची दिशाभूल सुरु केली आहे़ त्यामुळे जिल्हापातळीवर नाहीतर प्रत्येक ग्रामपंचायत पातळीवर पत्रपरिषद घेवून जनतेला हा विषय समजावून सांगण्याची गरज आहे़ कोणतीही गोष्ट वारंवार सांगितल्यास ती खरी वाटू लागते़ असेही हाके म्हणाले़काँग्रेसविरोधात तक्रार करणारकाँग्रेसने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयापुढे आंदोलन केले़ या आंदोलनात काँग्रेस कार्यकर्त्यांनी संविधानिक पदावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल अर्वाच्च भाषेत टीका केली़ या विरोधात पोलिसांत तक्रार देणार असल्याचे महानगराध्यक्ष संतुक हंबर्डे म्हणाले़सेनेची संस्कृती वेगळीपंढरपूर येथील मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ‘चौकीदार ही चोर है’ असे वक्तव्य केले़ त्यावर हाके म्हणाले, शिवसेनेची संस्कृती भिन्न आहे़ तो स्वतंत्र पक्ष आहे़ त्यांना जे वाटते ते मत त्यांनी मांडलं़ त्यामुळे शिवसेनेचं काय करायचं हे आम्ही पाहून घेवू़ त्यांच्या विधानाला एवढे महत्त्व देण्याची गरजही नसल्याचे हाके म्हणाले़

टॅग्स :NandedनांदेडRafale Dealराफेल डीलcongressकाँग्रेसBJPभाजपा