शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
2
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
3
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
4
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
5
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
6
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
7
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
8
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
9
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
10
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
11
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
12
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
13
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
14
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
15
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
16
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
17
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हणाल्या...
18
रेल्वे प्रवासासाठी आता मोजावे लागणार जादा पैसे! जास्त सामान नेण्यावरही अतिरिक्त शुल्क लागू होणार
19
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
20
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
Daily Top 2Weekly Top 5

बेरोजगारी दूर झाली तरच प्रश्न सुटतील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2019 00:29 IST

गावातील नागरिकांसाठी शासनाची कोणतीही योजना राबविली गेली नाही़

ठळक मुद्देतालुक्यातील बंद पडलेले उद्योग सुरू करावेत

नरसी- धर्माबाद40 किमीशेख इलियास।बिलोली : तालुक्याच्या जनतेने अनेक खासदार, आमदार, मातब्बर पुढारी घडविले़ मात्र त्यांना जनतेच्या रोजगाराविषयी लक्ष न देता केवळ आपला स्वार्थ साधल्याने बेरोजगारांच्या संख्येत अफाट वाढ झाली आहे. स्थानिक नेत्यांनी सरकारला उद्योग उपलब्ध करुन देण्यासाठी भाग पाडले पाहिजे, असे मत आरळी येथील बजरंग संगेवार यांनी व्यक्त केले़बिलोली तालुक्याला लाल रेतीची नैसर्गिक देण आहे. रेती उपसा चालू झाला की रोजगार मिळतो़ मात्र यंदा रेती उपसा बंद झाल्याने रोजगार मिळत नाही. त्यामुळे पोटाची खळगी भरण्यासाठी तालुक्यातील असंख्य मजूर हे तेलंगणा राज्यात धानपीक काढणीसाठी जात आहेत़ तर काही पुणे-मुंबईला काम करण्यासाठी गेले असल्याने याचा परिणाम लोकसभा निवडणुकीवर होणार असल्याचे बोळेगाव येथील माधव कांबळे यांनी सांगितल़ेतालुक्यातील शंकरनगर येथे साखर कारखाना होता़ त्यातून मिळणाऱ्या रोजंदारीतून हजारो कुटुंबाचा उदरनिर्वाह होत होता ; पण स्थानिक पुढाऱ्यांच्या निष्काळजीमुळे सदर कारखाना बंद पडल्याने अनेक कुटुंबांना रोजगाराच्या शोधात गावे सोडावी लागली. स्थानिक आमदार-खासदारांनी लक्ष दिल्यास मजुरांच्या हाताला काम मिळू शकते, असे मत जिगळा येथील शिवाजी पा.जिगळेकर यांनी व्यक्त केले आहे.अर्धापूर बसस्थानक18 किमीयुनूस नदाफ।अर्धापूर : हदगाव तालुक्यातील द्वारकवाडी हे बेचिराख झालेले गाव असून या गावात ८ कुटुंब २२ वर्षांपासून वास्तव करून आहेत़ परंतु या गावातील नागरिकांसाठी शासनाची कोणतीही योजना राबविली गेली नाही़ गावातील लोकांना आधारकार्ड, मतदानकार्ड, रेशनकार्ड नाहीत़ या गावातील लोकांनी कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी जमिनी काढल्या आहेत ; पण त्या जमिनी नावावर करून दिल्या गेल्या नाहीत. या गावाला २२ वर्षांपासून शासनाची कोणतीही योजना मिळाली नसल्याचे द्वारकावाडी ता़ हदगाव येथील रामचंद्र गंगाराम पवार यांनी सांगितले़अर्धापूर येथील बसस्थानकात सोमवारी प्रवाशांसोबत आमच्या प्रतिनिधीने संवाद साधला़शासनाकडून शेतीमालाला योग्य भाव मिळत नसल्याने आमची दुसरी पिढी शेतीपासून दूर जात आहे़ शेती करणे त्यांना परवडत नाही़ शेती मालाला योग्य भाव दिल्यास आमची मुले मन लावून शेती करतील़ शेतकऱ्यांच्या मुलांचे स्थलांतर थांबविण्यासाठी शासनाने शेती मालाला योग्य भाव द्यावा़ तसेच बी- बियाणे शासनामार्फत विक्रीस ठेवले पाहिजेत, अशी अपेक्षा प्रवासी गणपूर ता़ अर्धापूर येथील बाबूराव मारोतराव बंडाळे यांनी व्यक्त केली़ 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकnanded-pcनांदेडcongressकाँग्रेसBJPभाजपा