शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या मुस्लीम देशाच्या राष्ट्रपतीनं UN महासभेत म्हटलं, "ॐ  शांति ओम..." 
2
Video: बँकाँकमध्ये भूमिगत रेल्वे स्टेशनचे काम सुरु होते; अचानक रस्त्यावर भगदाड पडले, सगळे...
3
मुख्यमंत्र्यांचं उद्योगपती अजीम प्रेमजी यांना पत्र; उधारीत का मागितला एक रस्ता?
4
'कोल्हापूरकरांनो आता आपली जबाबदारी...'; मराठवाड्यातील मदतीसाठी सतेज पाटलांचे आवाहन
5
Asia Cup 2025: तिलक वर्मा नवा विक्रम रचण्याच्या उंबरठ्यावर; शिखर धवनला मागे टाकण्याची संधी
6
लाडकी बहीण, गॅस सबसिडी सारख्या योजनांचे पैसे अडकणार? १ ऑक्टोबरपूर्वी 'हे' काम करा पूर्ण
7
'दादा, ओला दुष्काळ जाहीर करा'; अजित पवार शेतकऱ्यांना म्हणाले, "आता आम्हाला पाहणी तर..."
8
'द बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये समीर वानखेडेंची नक्कल; क्रांती रेडकरने Video शेअर करत दिलं सडेतोड उत्तर
9
Beed: लक्ष्मण हाकेंच्या जवळच्या सहकाऱ्यावर प्राणघातक हल्ला; जेवण करत असतानाच तुटून पडले, लाठ्या-काठ्यांनी मारहाण
10
Viral Video : अरे बापरे हे काय बघितलं! महिलेने कॅमेरा सुरू केला अन् पुढे जे काही घडलं... ; व्हिडीओ बघून तुम्हीही हैराण व्हाल!
11
सरकारी बँकांमध्ये वाढणार परदेशी गुंतवणूकदारांचा हिस्सा! सरकार करतंय मोठी तयारी
12
२० टक्के इथेनॉलचा डंख कसा शमवायचा? पेट्रोल भरताना ही ट्रिक वापरा...
13
GST कपातीचा फायदा ग्राहकांना नाही? कंपन्यांची 'ही' चलाखी पाहून ग्राहक संतापले
14
ECINET: मतदार यादीतून नाव काढणं आता सोपं नाही; निवडणूक आयोगानं सुरू केली नवी 'ई-साइन' प्रणाली
15
Mumbai: उद्योगपती नुस्ली वाडिया यांच्यासह कुटुंबावर गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?
16
'माझ्या बायकोला तू पळवून लावलंस!'; रागाच्या भरात भावाने बहिणीची केली निर्घृण हत्या
17
"लग्न नाही, फॅमिली नाही विचार करा...", फुकटचा सल्ला देणाऱ्या चाहत्याला जुईचं सडेतोड उत्तर, म्हणाली- "अशा माणसांची..."
18
नवरात्रीतील विनायक चतुर्थी २०२५: 'या' ८ राशींसाठी जुळून आले ३ महाशुभ योग; मिळेल विशेष धनलाभ!
19
मुलाला तुरुंगवास, धक्का बसलेल्या वडिलांनी संपवलं जीवन, अंत्यसंस्कारावेळी घडलं असं काही, ७ पोलीस निलंबित
20
"भारतासोबतचे संबंध महत्त्वाचे, आशा आहे की..."; अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री रुबियोंनी दिले टॅरिफ कमी करण्याचे संकेत

हदगाव तालुक्यातील सात गावांचा प्रश्न कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2019 00:32 IST

हदगाव तालुक्यातील चाभरा, निमगाव, चोरंबा, खैरगाव, रोडगी, सोनाळा व चाभरातांडा या सात गावांचा अर्धापूर तालुक्यात समावेश करण्याची प्रक्रिया रेंगाळली आहे़

पार्डी : हदगाव तालुक्यातील चाभरा, निमगाव, चोरंबा, खैरगाव, रोडगी, सोनाळा व चाभरातांडा या सात गावांचा अर्धापूर तालुक्यात समावेश करण्याची प्रक्रिया रेंगाळली आहे़ १ जानेवारीपासून या गावांचा समावेश होणार होता़ मात्र, हा प्रश्न पुन्हा लांबणीवर पडला आहे़‘त्या’ सात गावांचा अर्धापूर तालुक्यात समावेश करावा, अशी मागणी गेल्या १९ वर्षांपासून होती. त्यासाठी ‘सात गाव संघर्ष समिती’ स्थापन करून शासनस्तरावर लढा देवून ही गावे अर्धापूर तालुक्यात समावेश करण्याचा लढा यशस्वी झाला होता. तसेच शासनाकडून त्या गावांचा समावेश करण्याची अधिसूचनाही जारी केली होती.हदगाव तालुक्यातील ही सात गावे तालुका पातळीपासून ५५ ते ६० किलोमीटर अंतरावर होती. यामुळे शेतकरी, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक व निराधारांचे कोणतेही काम वेळेवर होत नव्हते. यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता तर अर्धापूर तालुका या सात गावांपासून केवळ ६ ते ८ किलोमीटर अंतरावर असल्याने व सर्वच व्यवहार अधार्पूरलाच होत आहेत. यामुळे अधार्पूर तालुका निर्मितीपासून ही 'सात' गावे अर्धापूूर तालुक्यात समावेश करण्यासाठी सातत्याने संघर्ष समितीने लढा दिला. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण केले़ गावागावांत ग्रामपंचायत समोरही उपोषणे झाली़ संघर्ष समितीने लढा अधिक तीव्र केल्याने तत्कालीन आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी दखल घेऊन माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या माध्यमातून तत्कालीन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात १२ फेब्रुवारी २०१४ ला संघर्ष समितीची बैठक घेण्यात येऊन सदर मागणी केली होती. बैठकीस पालकमंत्री डी़ पी़ सावंत, माजी आ़ माधवराव पाटील जवळगावकर, तत्कालीन जिल्हाधिकारी धीरजकुमार व संघर्ष समितीचे सदस्य उपस्थित होते. ही लढाई पुन्हा सातत्याने चालूच ठेवत विद्यमान आ़ नागेश पाटील आष्टीकर यांच्या माध्यमातून महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालय, मुंबई येथे ९ आॅगस्ट २०१६ रोजी बैठक घेण्यात आली.हदगाव तालुक्यातील सात गावे अर्धापूर तालुक्यात समावेश करण्याबाबत शासनाने ३१ जुलै २०१८ ला अधिसूचना जारी केली़ १ जानेवारी २०१९ पासून हदगाव तालुक्यातील चाभरा, निमगाव, चोरंबा, खैरगाव, रोडगी, सोनाळा, चाभरातांडा या गावांचा अर्धापूर तालुक्यात समावेश होणार होता. पण प्रशासकीय तांत्रिक अडचणी आल्यामुळे हा समावेश पुन्हा लांबणीवर पडल्याचे दिसत आहे.हदगाव ६० कि़मी. वर तर अर्धापूर ६ कि़ मी़ अंतरावरहदगाव तालुक्यातील सात गावांना तालुक्याच्या ठिकाणी जाण्याकरिता ५५ ते ६० किलोमीटर अंतर पार करून जावे लागत होत़ यामुळे या सात गावांतील शेतकरी , विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, व निराधार यांचे कोणतेही काम वेळेवर होत नव्हत़े़ यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता़ तर अर्धापूूर तालुका या सात गावांपासून केवळ ६ ते ८ किलोमीटर अंतरावर असल्याने नागरिकांचे सर्वच व्यवहार अर्धापूूरलाच होतात़हदगाव तालुक्यातील निमगाव, चाभरा, चोरंबा, सोनाळा, खैरगाव, रोडगी, चाभरातांडा ही सात गावे १ जानेवारी २०१९ ला अर्धापूर तालुक्यात समाविष्ट होणार होती. परंतु, मंत्रालयात महसूल विभागातील सचिवांकडे उशिरा फाईल पोहोचल्यामुळे चार आठ दिवसांचा अवधी लागणार असल्याने सात गाव संघर्ष समिती मंत्रालयात जाऊन भेट घेणार आहे, अशी माहिती संघर्ष समितीचे अध्यक्ष पंजाबराव चव्हाण व सचिव दिगंबर मोळके यांनी दिली.

टॅग्स :NandedनांदेडWaterपाणीwater scarcityपाणी टंचाई