शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
3
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
4
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
5
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
6
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
7
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
8
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
9
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
10
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
11
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
12
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
13
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
14
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
15
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
16
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
17
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
18
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
19
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
20
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?

हदगाव तालुक्यातील सात गावांचा प्रश्न कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2019 00:32 IST

हदगाव तालुक्यातील चाभरा, निमगाव, चोरंबा, खैरगाव, रोडगी, सोनाळा व चाभरातांडा या सात गावांचा अर्धापूर तालुक्यात समावेश करण्याची प्रक्रिया रेंगाळली आहे़

पार्डी : हदगाव तालुक्यातील चाभरा, निमगाव, चोरंबा, खैरगाव, रोडगी, सोनाळा व चाभरातांडा या सात गावांचा अर्धापूर तालुक्यात समावेश करण्याची प्रक्रिया रेंगाळली आहे़ १ जानेवारीपासून या गावांचा समावेश होणार होता़ मात्र, हा प्रश्न पुन्हा लांबणीवर पडला आहे़‘त्या’ सात गावांचा अर्धापूर तालुक्यात समावेश करावा, अशी मागणी गेल्या १९ वर्षांपासून होती. त्यासाठी ‘सात गाव संघर्ष समिती’ स्थापन करून शासनस्तरावर लढा देवून ही गावे अर्धापूर तालुक्यात समावेश करण्याचा लढा यशस्वी झाला होता. तसेच शासनाकडून त्या गावांचा समावेश करण्याची अधिसूचनाही जारी केली होती.हदगाव तालुक्यातील ही सात गावे तालुका पातळीपासून ५५ ते ६० किलोमीटर अंतरावर होती. यामुळे शेतकरी, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक व निराधारांचे कोणतेही काम वेळेवर होत नव्हते. यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता तर अर्धापूर तालुका या सात गावांपासून केवळ ६ ते ८ किलोमीटर अंतरावर असल्याने व सर्वच व्यवहार अधार्पूरलाच होत आहेत. यामुळे अधार्पूर तालुका निर्मितीपासून ही 'सात' गावे अर्धापूूर तालुक्यात समावेश करण्यासाठी सातत्याने संघर्ष समितीने लढा दिला. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण केले़ गावागावांत ग्रामपंचायत समोरही उपोषणे झाली़ संघर्ष समितीने लढा अधिक तीव्र केल्याने तत्कालीन आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी दखल घेऊन माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या माध्यमातून तत्कालीन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात १२ फेब्रुवारी २०१४ ला संघर्ष समितीची बैठक घेण्यात येऊन सदर मागणी केली होती. बैठकीस पालकमंत्री डी़ पी़ सावंत, माजी आ़ माधवराव पाटील जवळगावकर, तत्कालीन जिल्हाधिकारी धीरजकुमार व संघर्ष समितीचे सदस्य उपस्थित होते. ही लढाई पुन्हा सातत्याने चालूच ठेवत विद्यमान आ़ नागेश पाटील आष्टीकर यांच्या माध्यमातून महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालय, मुंबई येथे ९ आॅगस्ट २०१६ रोजी बैठक घेण्यात आली.हदगाव तालुक्यातील सात गावे अर्धापूर तालुक्यात समावेश करण्याबाबत शासनाने ३१ जुलै २०१८ ला अधिसूचना जारी केली़ १ जानेवारी २०१९ पासून हदगाव तालुक्यातील चाभरा, निमगाव, चोरंबा, खैरगाव, रोडगी, सोनाळा, चाभरातांडा या गावांचा अर्धापूर तालुक्यात समावेश होणार होता. पण प्रशासकीय तांत्रिक अडचणी आल्यामुळे हा समावेश पुन्हा लांबणीवर पडल्याचे दिसत आहे.हदगाव ६० कि़मी. वर तर अर्धापूर ६ कि़ मी़ अंतरावरहदगाव तालुक्यातील सात गावांना तालुक्याच्या ठिकाणी जाण्याकरिता ५५ ते ६० किलोमीटर अंतर पार करून जावे लागत होत़ यामुळे या सात गावांतील शेतकरी , विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, व निराधार यांचे कोणतेही काम वेळेवर होत नव्हत़े़ यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता़ तर अर्धापूूर तालुका या सात गावांपासून केवळ ६ ते ८ किलोमीटर अंतरावर असल्याने नागरिकांचे सर्वच व्यवहार अर्धापूूरलाच होतात़हदगाव तालुक्यातील निमगाव, चाभरा, चोरंबा, सोनाळा, खैरगाव, रोडगी, चाभरातांडा ही सात गावे १ जानेवारी २०१९ ला अर्धापूर तालुक्यात समाविष्ट होणार होती. परंतु, मंत्रालयात महसूल विभागातील सचिवांकडे उशिरा फाईल पोहोचल्यामुळे चार आठ दिवसांचा अवधी लागणार असल्याने सात गाव संघर्ष समिती मंत्रालयात जाऊन भेट घेणार आहे, अशी माहिती संघर्ष समितीचे अध्यक्ष पंजाबराव चव्हाण व सचिव दिगंबर मोळके यांनी दिली.

टॅग्स :NandedनांदेडWaterपाणीwater scarcityपाणी टंचाई