शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही दिसणार नाही"; एकनाथ शिंदे यांचे सडेतोड वक्तव्य
2
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
3
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
4
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
5
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
6
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
7
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या निवासस्थानाजवळ मोठा स्फोट
8
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
9
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
10
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
11
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
12
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
13
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
14
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
15
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
16
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले
17
भारत-पाकिस्तान तणाव: BCCI ची मोठी कारवाई; खेळाडूंना धर्मशालामधून बाहेर काढण्यासाठी विशेष ट्रेन
18
भारताकडून पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्यास सुरुवात, लाहोरवर केला ड्रोन हल्ला, तणाव वाढला!
19
India Pakistan War: पाकिस्तानचा रडीचा डाव, अंधार पडताच केला हल्ला; काय काय घडलं, पहा व्हिडीओ
20
युद्धाची घोषणा होणार? राजनाथ सिंह सीडीएस, तिन्ही आर्मी प्रमुखांच्या भेटीला; मोदी डोवाल एकत्र...

अठरा दिवसात १३ हजार ५२० क्विंटल कापूस खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 04:31 IST

एन एच ४४ आखूड धाग्याचा कापूस या सदराखाली सीसीआयने ५ हजार ७२५ रुपये प्रति क्विंटल दराने खरेदी केला जात ...

एन एच ४४ आखूड धाग्याचा कापूस या सदराखाली सीसीआयने ५ हजार ७२५ रुपये प्रति क्विंटल दराने खरेदी केला जात आहे. २१ नोव्हेंबरला खरेदीचा शुभारंभ झाला सुट्टीचे दिवस वगळता आजपर्यंत १८ दिवस कापूस खरेदी झाली आहे. कापसाचे उत्पन्न खूपच घटले आहे. अशाही परिस्थितीत सात हजार कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी केली आहे. एसएमएसच्या तुलनेत शेतकरी आपला उत्पादित कापूस आणत नसल्याचे दिसून येत आहे.

९३४ शेतकऱ्यांना एसएमएस पाठवण्यात आले त्यापैकी ४८३ शेतकऱ्यांनी १३ हजार ५२० क्विंटल ६० किलो कापूस अठरा दिवसांत सीसीआयच्या खरेदी केंद्रावर विकला आहे. पाठवलेले एसएमएस व खरेदी केंद्रावर आलेल्या शेतकऱ्यांचा कापूस पहाता पन्नास टक्के शेतकऱ्यांनी आपला उत्पादित कापूस खासगी व्यापाऱ्यांना विकून मोकळे झाले म्हटल्यास वावगे ठरू नये.

आजही काही खासगी व्यापारी शेतकऱ्यांचा सातबारा, आधारकार्ड व बँकेचे पासबुक मिळवून त्यांच्या नांवाने कापूस टाकत असल्याचे बोलले जात आहे.

खासगी व्यापाऱ्यांचा कापूस खरेदी केंद्रावर येण्याची शक्यता पहाता शेतकऱ्यांनी कुण्याही खासगी व्यापाऱ्यांना आधारकार्ड, सातबारा, बँकेचे पासबुक देऊ नये असे आवाहन कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव रवि तिरमनवार यांनी यापूर्वीच केले आहे. जर शेतकऱ्यांनी खासगी व्यापाऱ्यांना सातबारा व इतर कागदपत्रे दिल्यास येत्या काळात शासनाच्या सबसिडी व इतर योजनांना मुकावे लागेल असा इशाराही दिला होता.

बऱ्याच कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या घरात कापूसच नसल्याने एसएमएस येऊनही कापूस नेत नसल्याचे चित्र आहे. २०२० च्या पावसाळ्यात पाऊस दिवस जास्त असल्याने व परतीच्या पावसानेही कहर केल्याने शेतकऱ्यांच्या हातून खरीप हंगाम गेला आहे नव्हे कापूस, सोयाबीन व इतर खरीप हंगामातील पीक निसर्गाच्या लहरी प्रकोपाने गिळले आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.