शहरं
Join us  
Trending Stories
1
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
2
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
3
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
4
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
5
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
6
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
7
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
8
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
9
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
10
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
11
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
12
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
13
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
14
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
15
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
16
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
17
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
18
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
19
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
20
"परेश रावल यांच्याशिवाय...", 'हेरा फेरी ३'च्या वादावर सोनाक्षी सिन्हा म्हणाली असं काही...

अठरा दिवसात १३ हजार ५२० क्विंटल कापूस खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 04:31 IST

एन एच ४४ आखूड धाग्याचा कापूस या सदराखाली सीसीआयने ५ हजार ७२५ रुपये प्रति क्विंटल दराने खरेदी केला जात ...

एन एच ४४ आखूड धाग्याचा कापूस या सदराखाली सीसीआयने ५ हजार ७२५ रुपये प्रति क्विंटल दराने खरेदी केला जात आहे. २१ नोव्हेंबरला खरेदीचा शुभारंभ झाला सुट्टीचे दिवस वगळता आजपर्यंत १८ दिवस कापूस खरेदी झाली आहे. कापसाचे उत्पन्न खूपच घटले आहे. अशाही परिस्थितीत सात हजार कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी केली आहे. एसएमएसच्या तुलनेत शेतकरी आपला उत्पादित कापूस आणत नसल्याचे दिसून येत आहे.

९३४ शेतकऱ्यांना एसएमएस पाठवण्यात आले त्यापैकी ४८३ शेतकऱ्यांनी १३ हजार ५२० क्विंटल ६० किलो कापूस अठरा दिवसांत सीसीआयच्या खरेदी केंद्रावर विकला आहे. पाठवलेले एसएमएस व खरेदी केंद्रावर आलेल्या शेतकऱ्यांचा कापूस पहाता पन्नास टक्के शेतकऱ्यांनी आपला उत्पादित कापूस खासगी व्यापाऱ्यांना विकून मोकळे झाले म्हटल्यास वावगे ठरू नये.

आजही काही खासगी व्यापारी शेतकऱ्यांचा सातबारा, आधारकार्ड व बँकेचे पासबुक मिळवून त्यांच्या नांवाने कापूस टाकत असल्याचे बोलले जात आहे.

खासगी व्यापाऱ्यांचा कापूस खरेदी केंद्रावर येण्याची शक्यता पहाता शेतकऱ्यांनी कुण्याही खासगी व्यापाऱ्यांना आधारकार्ड, सातबारा, बँकेचे पासबुक देऊ नये असे आवाहन कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव रवि तिरमनवार यांनी यापूर्वीच केले आहे. जर शेतकऱ्यांनी खासगी व्यापाऱ्यांना सातबारा व इतर कागदपत्रे दिल्यास येत्या काळात शासनाच्या सबसिडी व इतर योजनांना मुकावे लागेल असा इशाराही दिला होता.

बऱ्याच कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या घरात कापूसच नसल्याने एसएमएस येऊनही कापूस नेत नसल्याचे चित्र आहे. २०२० च्या पावसाळ्यात पाऊस दिवस जास्त असल्याने व परतीच्या पावसानेही कहर केल्याने शेतकऱ्यांच्या हातून खरीप हंगाम गेला आहे नव्हे कापूस, सोयाबीन व इतर खरीप हंगामातील पीक निसर्गाच्या लहरी प्रकोपाने गिळले आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.