शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

शेतमालाला आधारभूत किंमत द्यावी; आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांनी केली मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2019 13:30 IST

कुटुंबियांनी शेतकऱ्याच्या शेतमालास आधारभूत किंमत मिळवून देण्याची मागणी प्राधान्याने केली.

ठळक मुद्दे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यानंतर कर्जमाफी द्यायला हवी, असे मत नोंदविले.

- विशाल सोनटक्के

परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या प्राध्यापक आर. डी. अहिरे आणि पी. एस. कापसे यांनी मराठवाड्यातील या ३२० आत्महत्याग्रस्त कुटुंबांतील सदस्यांशी संवाद साधला. या संवादानंतर त्यांनी या शेतकरी कुटुंबानाच मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या टाळण्यासाठी काय करायला हवे, याबाबतच्या सूचना जाणून घेतल्या.

सिंचऩ, शेतीपूरक व्यवसायांच्या अभावामुळेच मराठवाड्यात शेतकरी आत्महत्या

१) ७०.९३ टक्के आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांनी शेतकऱ्याच्या शेतमालास आधारभूत किंमत मिळवून देण्याची मागणी प्राधान्याने केली.२) ५१.५६ टक्के शेतकऱ्यांच्या कुटुंबियांनी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यानंतर कर्जमाफी द्यायला हवी, असे मत नोंदविले. ३) ६४.३७ टक्के शेतकरी कुटुंबीयांना सरकारने मराठवाड्यात सिंचनाच्या सुविधा उपलब्ध करुन देण्याची आवश्यकता वाटते. ४) ५५.६२ टक्के आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांनी सरकारने शेतीपूरक व्यवसायासाठी शेतकऱ्यांना तांत्रिक सहाय्य पुरवावे तसेच हा व्यवसाय सुरु करण्यासाठी सवलतीच्या रुपात मदत करावी असे वाटते. 

खाजगी सावकारीमुळे शेतकरी अडकतो कर्जाच्या विळख्यात 

५) ५५ टक्के कुटुंबियांनी आर्थिकदृष्ट्या गरीब असणाऱ्या शेतकऱ्यांच्या पाल्यांना सरकारने विशेष शिष्यवृत्ती सुरु करावी, असे म्हटले आहे. ६) ५७.१८ टक्के शेतकरी कुटुंबियांनी सरकारने शेतकऱ्यांना खताबरोबरच             बी-बियाणे सवलतीच्या दरात द्यावे, असे सुचविले आहे.७) ६४.६ टक्के शेतकरी कुटुंबियांनी शेतकऱ्यांना अत्यल्प व्याज दरात तसेच कमी वेळेत शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करुन देण्याची आवश्यकता व्यक्त केली आहे. 

मराठवाडयात दुष्काळ, सिंचन सुविधांअभावी सर्वाधिक शेतकरी आत्महत्या

८) ५२.५० टक्के कुटुंबियांना शेतकऱ्यांच्या आरोग्याचा प्रश्नही सतावत असल्याचे दिसते. या कुटुंबियांनी शेतकऱ्यांसाठी आरोग्य विमा योजना आवश्यक असल्याचे नमूद केले आहे. ९) ४३.१२ टक्के शेतकरी कुटुंबियांनी अल्पभूधारक लहान शेतकऱ्यांसाठी शासनाने घरकुल योजना सुरु करण्याची आवश्यकता वाटते. १०) ५१.५६ टक्के शेतकरी कुटुंबियांनी शेतकऱ्यांच्या आत्महत्या टाळण्यासाठी सरकारने सामाजिक संस्थाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर सामूहिक विवाह सोहळे आयोजित करण्याची गरज व्यक्त केली आहे. 

एकच पीक ठरते आहे शेतकऱ्यांसाठी घातक 

११)  ५१.५६ टक्के शेतकरी कुटुंबियांनी ग्रामीण भागाशी संबंधित तसेच शेतीविषयक असलेल्या शासनाच्या योजना गरजू शेतकऱ्यापर्यंत पोहोचण्यासाठी पुढाकार घेण्याची गरजव्यक्त केली आहे. १२) ६०.३१ टक्के कुटुंबियांना शासनाने विविध योजनांतून जास्तीत जास्त सिंचन विहिरींना मंजुरी द्यावे असे वाटते. १३) ३४.०६ टक्के कुटुंबियांनी प्रत्येक गावात दारूबंदी लागू व्हावी, अशी सूचनाही या संवादावेळी केली.

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्याFarmerशेतकरीagricultureशेतीVasantrao Naik Marathwada Krishi Vidyapeethवसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ