शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

कॅन्सरमुक्तीचा संकल्प, तलाठी सज्जाच्या निर्मितीने कामांची गती वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2018 12:45 AM

ह्यात मावळत्या वर्षात प्रशासनाने केलेला कॅन्सरमुक्तीचा संकल्प, नवे महसूल मंडळे, तलाठी सज्जांची निर्मिती तसेच पाणी साठ्याची चिंता आणि कृष्णूर येथील धान्य घोटाळ्यातील चिंता यातच जिल्हा प्रशासनाची वर्षाअखेर झाली आहे.

नांदेड : जिल्ह्यात मावळत्या वर्षात प्रशासनाने केलेला कॅन्सरमुक्तीचा संकल्प, नवे महसूल मंडळे, तलाठी सज्जांची निर्मिती तसेच पाणी साठ्याची चिंता आणि कृष्णूर येथील धान्य घोटाळ्यातील चिंता यातच जिल्हा प्रशासनाची वर्षाअखेर झाली आहे.जिल्ह्यात कॅन्सरमुक्तीसाठी प्रशासनाने नवी सुरूवात केली आहे. उपजिल्हा रुग्णालय तसेच इतर तज्ज्ञांच्या मदतीने होत असलेल्या कॅन्सर शिबिरात मोठ्या संख्येने रुग्ण दाखल होत आहेत. या रुग्णांची तपासणी केल्यानंतर वेळेवर कॅन्सरचे निदान झाल्यानंतर उपचाराचा मोकळा होत आहे. कॅन्सर या रोगात निदान उशिरा झाल्याने दगावणाऱ्या रुग्णांची संख्या मोठी आहे.जिल्ह्यात यंदा ८० टक्के पाऊस झाला असला तरीही देगलूर, मुखेड, उमरी या तालुक्यात दुष्काळ घोषित करण्यात आला आहे. त्याचवेळी लोहा, नायगाव, कंधार या तालुक्यांत पाणीटंचाईचे मोठे सावट उद्भवले आहे. परतीचा पाऊस जिल्ह्यात यंदा झालाच नसल्याने रबीची पेरणीही कमी प्रमाणात झाली आहे.जिल्ह्यात जलयुक्त शिवार योजनेचे कामही सुरू असले तरी या योजनेसाठी मिळणारा लोकसहभाग मात्र अत्यल्पच आहे. त्यामुळे ही योजना प्रशासकीयच ठरली आहे.मावळत्या वर्षात सर्वाधिक चिंता महसूल विभागाला कृष्णूर येथील मेगा धान्य घोटाळ्याने सतावली. या प्रकरणाने महसूल विभागाची मोठी नाचक्की झाली. हे प्रकरण अद्यापही चौकशीवरच आहे.पुरवठा विभागाने केलेल्या आॅनलाईन प्रणालीच्या वापराची नोंद देशभरात घेण्यात आली आहे. जिल्ह्याची पथदर्शी जिल्हा म्हणूनही केंद्र पातळीवर निवड झाली आहे. आॅनलाईन प्रणालीद्वारे धान्य वाटप तसेच डाटा संगणकीकरणाचे प्रमाणही चांगले राहिले आहे.प्रशासनाने आत्महत्याग्रस्त शेतकºयांच्या कुटुंबियांसाठी उभारी योजनेअंतर्गत नव्या योजना सुरू केल्या आहेत. प्रशासनाने मावळत्या वर्षात थेट आत्महत्याग्रस्त कुटुंबियांच्या दारी जावून शासकीय योजनांचा लाभ त्यांना मिळाला की नाही? याची माहिती घेतली. पहिल्यांदाच हा उपक्रम राबविण्यात आला. आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी जून-जुलैपासूनच कामाला लागले आहे. मतदार यादी पुनरिक्षण कार्यक्रम, व्हीव्हीपॅट प्रशिक्षण यासह निवडणूक ओळखपत्रांच्या अद्ययावतीकरणाच्या कामानेही वेग घेतला आहे. यामध्ये रिक्त पदांची चिंता कायमच राहिली.पालकमंत्री म्हणून रामदास कदम यांनी पदभार घेतल्यानंतर जिल्हा प्रशासनाची स्थानिक सत्ताधारी आणि पालकमंत्री यांच्यात मोठी गोची झाली आहे. याचे मोठे उदाहरण महापालिकेचा दलित वस्ती निधी मंजुरी प्रकरण आणि जिल्हा नियोजन समितीच्या बैठका आहेत. या बैठकामध्ये प्रशासनाची मोठी कोंडी झाली आहे. इतकेच नव्हे, स्थानिक अधिकाºयांनी मनपाच्या दलित वस्ती योजनेच्या कामाची चौकशी करुन अहवाल सादर केल्यानंतर तो अहवाल असमाधानकारक असल्याचे सांगून पालकमंत्र्यांनी मंत्रालयस्तरावर या कामाची चौकशी लावली आहे. त्यातच जिल्हा परिषद पदाधिकाºयांनीही पालकमंत्र्यांच्या विरोधात शड्डू ठोकला आहे. यात कोंडी मात्र प्रशासनाचीच होणार आहे.

टॅग्स :NandedनांदेडNanded-Waghala Municipal Corporationनांदेड - वाघाळा महानगरपालिकाNanded zpनांदेड जिल्हा परिषदNanded policeनांदेड पोलीस