शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
2
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
3
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
4
माणुसकीचा जमानाच राहीला नाही! ओला रायडरची मदत केली अन् तो तरुणीसोबत 'असा' वागला
5
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा शिंदेंना धक्का, रायगडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेशी आघाडी
6
महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणातील मुख्य आरोपी दुबईतून बेपत्ता, भारताच्या प्रत्यार्पणाच्या आशेला धक्का
7
'या' योजनेत गुंतवणूक केल्यास मिळेल दुहेरी फायदा आणि तगडा परतावा, निवृत्तीनंतरचे टेन्शन होईल 'गायब'!
8
सप्तपदीनंतर दोन तासांत लग्न मोडलं, वधू पक्षाने वराला झोड झोड झोडलं, नेमकं काय घडलं?  
9
कॅनडाने भारतीय विद्यार्थ्यांना दिला मोठा धक्का, ७४% विद्यार्थी व्हिसा अर्ज नाकारले
10
उद्योग जगताला मोठा धक्का! हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन
11
चॅटजीपीटी आता तुम्हाला 'या' मुद्द्यांवर सल्ला देणार नाही! कंपनीने का बदलले नियम?
12
'एक गरिबांचा, तर दुसरा श्रीमंतांचा; दोन देश निर्माण केले', राहुल गांधींचा PM मोदींवर निशाणा
13
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किंमतीत मोठी घसरण, Silver ₹३५०० तर Gold किती रुपयांनी झालं स्वस्त?
14
DSP Rishikant Shukla: दहा वर्षांच्या सेवेतच जमवली १०० कोटींची माया; एक दोन नव्हे, तब्बल १२ भूखंड, ११ दुकाने अन्...
15
पत्नीने दिला जुळ्यां मुलांना जन्म, पती म्हणाला, ही माझी मुलंच नाहीत, जोरदार राडा, अखेरीस समोर आलं वेगळंच सत्य
16
बाजारात खळबळ! Hyundai ने ₹७.९० लाखात लाँच केली नवीन 'व्हेन्यू २०२५'; जबरदस्त फीचर्स आणि ADAS सह एंट्री
17
अरे व्वा! पांढरे केस हे वाढलेल्या वयाचं लक्षण नाही, ही तर आहे शरीरासाठी संरक्षण ढाल
18
दीड वर्षांपूर्वीच्या पल्लेदार कौशल हत्येचा पर्दाफाश! बायकोच्या 'डबल गेम'ने पोलीसही हादरले
19
मैदान गाजवले, आता ब्रँड व्हॅल्यूही वाढली! महिला क्रिकेटपटूंच्या कमाईत दुप्पट वाढ; सर्वाधिक फी कोणाची?
20
पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टात मोठा स्फोट! इस्लामाबादमध्ये खळबळ; बेसमेंटमध्ये झालेल्या ब्लास्टने इमारतीला हादरवले

खाजगी सावकारीमुळे शेतकरी अडकतो कर्जाच्या विळख्यात 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2019 13:06 IST

कर्जापोटीच्या व्याजामुळे शेतकऱ्याभोवती कर्जाचा विळखा वाढत जातो.

ठळक मुद्देविशेषत: खाजगी सावकारीमुळे शेतकरी अडचणी येत असल्याचे दिसून येते. 

- विशाल सोनटक्के

कोरडवाहू शेतीमुळे मराठवाड्यातील बहुसंख्य शेतकऱ्यांचे वार्षिक उत्पन्न जेमतेम आहे. त्यामुळे शेती उत्पादनातून मिळणाऱ्या मोजक्या उत्पन्नावरच कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवावा लागतो. मात्र, दुष्काळासारखी नैसर्गिक आपत्ती तसेच इतर वेळी नाईलाजाने या शेतकऱ्याला कर्ज घ्यावे लागते. या कर्जापोटीच्या व्याजामुळे शेतकऱ्याभोवती कर्जाचा विळखा वाढत जातो. विशेषत: खाजगी सावकारीमुळे शेतकरी अडचणी येत असल्याचे दिसून येते. 

सिंचऩ, शेतीपूरक व्यवसायांच्या अभावामुळेच मराठवाड्यात शेतकरी आत्महत्या

परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या प्राध्यापक आर. डी. अहिरे आणि पी. एस. कापसे यांनी मराठवाड्यातील या ३२० आत्महत्याग्रस्त कुटुंबांतील सदस्यांशी संवाद साधला. या संवादानंतर आणि अभ्यासातून त्यांनी शेतकरी आत्महत्या मागील काही निष्कर्ष मांडले आहेत. आत्महत्या केलेल्यांपैकी तब्बल ५.९४ टक्के शेतकरी हे दारिद्र्य रेषेखालील असल्याचे स्पष्ट झाले आहे. या शेतकऱ्यांचे वार्षिक उत्पन्न २७ हजारांपेक्षा कमी होते. २१.८७ टक्के शेतकरी हे वार्षिक २७ हजार ते ५० हजार इतके वार्षिक उत्पन्न मिळविणारे होते. तर ५० हजार ते दीड लाख वार्षिक उत्पन्न असतानाही ४९.०७ टक्के शेतकऱ्यांना आत्महत्या कराव्या लागल्या. १४.३७ टक्के शेतकरी हे वार्षिक दीड ते अडीच लाख उत्पन्न मिळविणारे होते. ७.५० टक्के शेतकरी हे वार्षिक अडीच ते सहा लाख उत्पन्न असलेले होते. १.२५ टक्के शेतकऱ्यांचे वार्षिक उत्पन्न हे सहा लाखांहून अधिक होते. मात्र, त्यानंतरही या शेतकऱ्यांना आत्महत्या करावी लागली. 

सिंचऩ, शेतीपूरक व्यवसायांच्या अभावामुळेच मराठवाड्यात शेतकरी आत्महत्या

शेतकऱ्यांच्या वार्षिक उत्पन्नाची वरील आकडेवारी पाहिल्यानंतर सुमारे ७५ टक्क्यांहून अधिक शेतकऱ्यांचे वार्षिक उत्पन्न हे दीड लाखांच्या आत असल्याचे दिसून येते. अत्यल्प उत्पन्नामुळे शेतीतील नैसर्गिक संकट तसेच कौटुंबिक आजारपण, विवाह सोहळा आणि अन्य इतर कारणांसाठी शेतकऱ्याला कर्जासाठी बँकेकडे जावे लागते. पाठपुरावा केल्यानंतर बँक तसेच इतर वित्तीय संस्थाकडून कर्ज मिळते. मात्र, त्यात पुन्हा एखादी आपत्ती आल्यास आर्थिक कोंडीत सापडलेला हा शेतकरी कर्ज फेडण्याच्या तणावातून आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलतो.

काही आकडेवारी २६.५६ टक्के शेतकऱ्यांकडे सहकारी बँकेचे दरडोई ६४ हजार ५६० इतके कर्ज होते. या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यानंतर त्यांच्यावर दरडोई ८४ हजार ८०४ म्हणजेच कर्ज घेतल्याच्या १३१ टक्के इतके कर्ज होते.

५४.०६ टक्के शेतकऱ्यांकडे राष्ट्रीयीकृत बँकांचे कर्ज होते. कर्ज घेतले त्यावेळी ते दरडोई एक लाख २० हजार १३२ इतके होते आत्महत्या केल्यावेळी हेच कर्ज दरडोई एक लाख ४९ हजार ३२ रुपये इतके होते. म्हणजेच, घेतलेल्या कर्जाच्या १२४ टक्के इतके कर्ज झाले होते.

११.५६ टक्के शेतकऱ्यांकडे ग्रामीण बँकांचे कर्ज होते. घेतेवेळी ते दरडोई ८९ हजार १६७ इतके होते. आत्महत्येनंतर हेच कर्ज दरडोई एक लाख १२ हजार ५७ रुपये म्हणजेच घेतल्याच्या १२६ टक्के इतके झाले होते. 

८.१२ टक्के शेतकऱ्यांनी स्वयंसहाय्यता व इतर गटाकडून कर्ज घेतले होते. घेतेवेळी ते दरडोई ४५ हजार ९३४ इतके होते ते आत्महत्येनंतर ६८ हजार ४५१ एवढे म्हणजेच कर्ज घेतल्याच्या १४९ टक्के इतके झाले होते.

३६.२५ टक्के शेतकऱ्यांनी खाजगी सावकाराकडून कर्ज घेतले होते. हे कर्ज दरडोई दोन लाख २१ हजार ७०३ एवढे होते. ते कालांतराने तीन लाख २४ हजार ३१ रुपये म्हणजेच कर्ज घेतल्याच्या १४६ टक्के इतके झाले होते. 

२८.४३ टक्के शेतकऱ्यांच्या आर्थिक मदतीला कर्जरुपाने मित्र आणि नातेवाईक धाऊन आले होते. हे कर्ज दरडोई दोन लाख २१ हजार ८१४ इतके होते. वाढत जावून हे कर्ज दरडोई दोन लाख ७० हजार १८१ म्हणजेच घेतल्याच्या १२५ टक्के इतके झाले होते.  

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्याagricultureशेतीFarmerशेतकरीVasantrao Naik Marathwada Krishi Vidyapeethवसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ