शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

खाजगी सावकारीमुळे शेतकरी अडकतो कर्जाच्या विळख्यात 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2019 13:06 IST

कर्जापोटीच्या व्याजामुळे शेतकऱ्याभोवती कर्जाचा विळखा वाढत जातो.

ठळक मुद्देविशेषत: खाजगी सावकारीमुळे शेतकरी अडचणी येत असल्याचे दिसून येते. 

- विशाल सोनटक्के

कोरडवाहू शेतीमुळे मराठवाड्यातील बहुसंख्य शेतकऱ्यांचे वार्षिक उत्पन्न जेमतेम आहे. त्यामुळे शेती उत्पादनातून मिळणाऱ्या मोजक्या उत्पन्नावरच कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवावा लागतो. मात्र, दुष्काळासारखी नैसर्गिक आपत्ती तसेच इतर वेळी नाईलाजाने या शेतकऱ्याला कर्ज घ्यावे लागते. या कर्जापोटीच्या व्याजामुळे शेतकऱ्याभोवती कर्जाचा विळखा वाढत जातो. विशेषत: खाजगी सावकारीमुळे शेतकरी अडचणी येत असल्याचे दिसून येते. 

सिंचऩ, शेतीपूरक व्यवसायांच्या अभावामुळेच मराठवाड्यात शेतकरी आत्महत्या

परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या प्राध्यापक आर. डी. अहिरे आणि पी. एस. कापसे यांनी मराठवाड्यातील या ३२० आत्महत्याग्रस्त कुटुंबांतील सदस्यांशी संवाद साधला. या संवादानंतर आणि अभ्यासातून त्यांनी शेतकरी आत्महत्या मागील काही निष्कर्ष मांडले आहेत. आत्महत्या केलेल्यांपैकी तब्बल ५.९४ टक्के शेतकरी हे दारिद्र्य रेषेखालील असल्याचे स्पष्ट झाले आहे. या शेतकऱ्यांचे वार्षिक उत्पन्न २७ हजारांपेक्षा कमी होते. २१.८७ टक्के शेतकरी हे वार्षिक २७ हजार ते ५० हजार इतके वार्षिक उत्पन्न मिळविणारे होते. तर ५० हजार ते दीड लाख वार्षिक उत्पन्न असतानाही ४९.०७ टक्के शेतकऱ्यांना आत्महत्या कराव्या लागल्या. १४.३७ टक्के शेतकरी हे वार्षिक दीड ते अडीच लाख उत्पन्न मिळविणारे होते. ७.५० टक्के शेतकरी हे वार्षिक अडीच ते सहा लाख उत्पन्न असलेले होते. १.२५ टक्के शेतकऱ्यांचे वार्षिक उत्पन्न हे सहा लाखांहून अधिक होते. मात्र, त्यानंतरही या शेतकऱ्यांना आत्महत्या करावी लागली. 

सिंचऩ, शेतीपूरक व्यवसायांच्या अभावामुळेच मराठवाड्यात शेतकरी आत्महत्या

शेतकऱ्यांच्या वार्षिक उत्पन्नाची वरील आकडेवारी पाहिल्यानंतर सुमारे ७५ टक्क्यांहून अधिक शेतकऱ्यांचे वार्षिक उत्पन्न हे दीड लाखांच्या आत असल्याचे दिसून येते. अत्यल्प उत्पन्नामुळे शेतीतील नैसर्गिक संकट तसेच कौटुंबिक आजारपण, विवाह सोहळा आणि अन्य इतर कारणांसाठी शेतकऱ्याला कर्जासाठी बँकेकडे जावे लागते. पाठपुरावा केल्यानंतर बँक तसेच इतर वित्तीय संस्थाकडून कर्ज मिळते. मात्र, त्यात पुन्हा एखादी आपत्ती आल्यास आर्थिक कोंडीत सापडलेला हा शेतकरी कर्ज फेडण्याच्या तणावातून आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलतो.

काही आकडेवारी २६.५६ टक्के शेतकऱ्यांकडे सहकारी बँकेचे दरडोई ६४ हजार ५६० इतके कर्ज होते. या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यानंतर त्यांच्यावर दरडोई ८४ हजार ८०४ म्हणजेच कर्ज घेतल्याच्या १३१ टक्के इतके कर्ज होते.

५४.०६ टक्के शेतकऱ्यांकडे राष्ट्रीयीकृत बँकांचे कर्ज होते. कर्ज घेतले त्यावेळी ते दरडोई एक लाख २० हजार १३२ इतके होते आत्महत्या केल्यावेळी हेच कर्ज दरडोई एक लाख ४९ हजार ३२ रुपये इतके होते. म्हणजेच, घेतलेल्या कर्जाच्या १२४ टक्के इतके कर्ज झाले होते.

११.५६ टक्के शेतकऱ्यांकडे ग्रामीण बँकांचे कर्ज होते. घेतेवेळी ते दरडोई ८९ हजार १६७ इतके होते. आत्महत्येनंतर हेच कर्ज दरडोई एक लाख १२ हजार ५७ रुपये म्हणजेच घेतल्याच्या १२६ टक्के इतके झाले होते. 

८.१२ टक्के शेतकऱ्यांनी स्वयंसहाय्यता व इतर गटाकडून कर्ज घेतले होते. घेतेवेळी ते दरडोई ४५ हजार ९३४ इतके होते ते आत्महत्येनंतर ६८ हजार ४५१ एवढे म्हणजेच कर्ज घेतल्याच्या १४९ टक्के इतके झाले होते.

३६.२५ टक्के शेतकऱ्यांनी खाजगी सावकाराकडून कर्ज घेतले होते. हे कर्ज दरडोई दोन लाख २१ हजार ७०३ एवढे होते. ते कालांतराने तीन लाख २४ हजार ३१ रुपये म्हणजेच कर्ज घेतल्याच्या १४६ टक्के इतके झाले होते. 

२८.४३ टक्के शेतकऱ्यांच्या आर्थिक मदतीला कर्जरुपाने मित्र आणि नातेवाईक धाऊन आले होते. हे कर्ज दरडोई दोन लाख २१ हजार ८१४ इतके होते. वाढत जावून हे कर्ज दरडोई दोन लाख ७० हजार १८१ म्हणजेच घेतल्याच्या १२५ टक्के इतके झाले होते.  

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्याagricultureशेतीFarmerशेतकरीVasantrao Naik Marathwada Krishi Vidyapeethवसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ