शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत घाणेरडा खेळ...! आसिम मुनीरच्या प्रेमात पडली अमेरिका, हे काय बोलले टॉप लष्करी कमांडर...?
2
महायुती अन् मविआच्याही एकसंधतेवर प्रश्नचिन्हच; पडघम वाजले, चित्र अस्पष्ट
3
RCB वर मोठी कारवाई होणार? BCCI बैठकीत काय निर्णय घेणार? समोर आली खास अपडेट
4
एक स्मार्ट डिसिजन EPFO कडून मिळवून देईल अधिक पेन्शन; वय आणि कमाईचं कनेक्शन बहुतेकांना माहीत नाही
5
हूल दिलेल्या मान्सूनची पुन्हा चाहूल; राज्यभर ऑरेंज अलर्ट, धो धो बरसणार
6
मराठा आरक्षणावरील सुनावणी १८ जुलैपासून, अंतिम निकालावरच भवितव्य अवलंबून
7
'महाभारत' सिनेमानंतर आमिर खान खरंच निवृत्ती घेणार? चर्चांवर म्हणाला, "आजकाल लोक..."
8
घटस्फोटानंतर दोन महिन्यातच एक्स पतीचं निधन, त्याच्या आठवणीत अभिनेत्री शुभांगी अत्रे भावुक
9
कोपरखैरणेत बेरोजगार पतीचं हादरवणारं कृत्य; पत्नीची मैत्रीण घरात शिरताच उडाला थरकाप
10
आजचे राशीभविष्य, १२ जून २०२५: आजचा दिवस यशदायी, पदोन्नती संभवते, मित्र भेटतील !
11
होमस्टेमध्ये सापडलेल्या 'त्या' गोष्टीमुळे पोलिसांना सोनमवर आला संशय; पुराव्याने हत्येचे गूढ उकले
12
अमेरिका आंदोलनाने पेटली, १२ राज्यांतील २५ शहरांत लोक उतरले रस्त्यावर; लॉस एंजिलिसमध्ये संचारबंदीनंतर आंदोलन चिरडून टाकण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा प्रयत्न
13
सोनमचा भाऊ म्हणाला, तिला फाशीच द्या, कुटुंबाने नातेसंबंध तोडले; मिळाली पोलिस कोठडी
14
आंतरधर्मीय विवाह; कुटुंबांच्या संमतीने विवाह, तुम्ही आक्षेप कशाला घेता? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
15
काश्मीरसाठी थेट रेल्वे सुरू अन् पर्यटनाची गाडी येतेय रुळावर; १० दिवसांचे बुकिंग फुल्ल
16
शू रॅकवर बसल्याने मांजराला नवव्या मजल्यावरून फेकले, आरोपी शेजाऱ्याविरोधात गुन्हा दाखल
17
‘भारतात मतदार यादी तयार करणे, हे जगात सर्वांत कठीण काम’
18
लोकल लेट का होते? ते शोधा, तरच अपघात कमी होतील, मुंब्रा दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रवासी संघटनांचे मत
19
लातूरमध्ये नागरिकाची सतर्कता; ११२ ला काॅल, अन् मुलगा सापडला !
20
नव्या स्थानकांच्या उभारणीत रेल्वेचा हात आखडताच, नवे ठाणे, चिखलोली, दातीवली, मानस मंदिरसह ३२ स्थानकांचा होता प्रस्ताव

नांदेड जिल्ह्यातील नदीकाठच्या गावांत साथरोग प्रतिबंधात्मक उपाययोजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2019 00:33 IST

जिल्ह्यात अनेक नद्यांचे जाळे पसरलेले असून, तब्बल १५६ गावे नदीकाठी असल्याने संभाव्य पूरपरिस्थितीच्या अनुषंगाने प्रशासकीय यंत्रणा सतर्क झाली आहे. नदीकाठच्या सर्व गावांमध्ये जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या वतीने साथरोग प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात येत असून २४ तास कार्यरत असणारा नियंत्रण कक्षही कार्यान्वित करण्यात आला आहे.

ठळक मुद्देनियंत्रण कक्ष कार्यरतसंभाव्य पूरस्थितीच्या अनुषंगाने प्रशासकीय यंत्रणा झाली सतर्क

नांदेड : जिल्ह्यात अनेक नद्यांचे जाळे पसरलेले असून, तब्बल १५६ गावे नदीकाठी असल्याने संभाव्य पूरपरिस्थितीच्या अनुषंगाने प्रशासकीय यंत्रणा सतर्क झाली आहे. नदीकाठच्या सर्व गावांमध्ये जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या वतीने साथरोग प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात येत असून २४ तास कार्यरत असणारा नियंत्रण कक्षही कार्यान्वित करण्यात आला आहे.नांदेड जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यांतून नद्या जातात. त्यामुळेच पावसाळ्यात नदीकाठच्या काही गावांना धोका होण्याची शक्यता असते. या अनुषंगाने प्रशासनाने उपाययोजना राबविण्यास सुरुवात केली आहे. नांदेड तालुक्यात गोदावरी, आसना आणि सरगावनाला या नदीकाठी आठ गावे आहेत. तर किनवट तालुक्यात पैनगंगा, किनवट-नाला, वझरा नाला, इस्लापूर नाला, मारेगाव नाला आणि कमठाळा नाला आहे. या तालुक्यातील १८ गावे नदीकाठी आहेत. माहूर तालुक्यातून पैनगंगा, गोंडवडसा नाला जातो. या तालुक्यातील ५ गावे नदीकाठावर आहेत. हदगाव तालुक्यातून पैनगंगा, कयाधूसह कारवाड नदी जाते. या तालुक्यातीलही ५ गावे नदीकाठावर आहेत. भोकर आणि उमरी तालुक्यातून गोदावरी वाहते. यात उमरी तालुक्यातील १३ गावे नदीकाठावर आहेत. देगलूर तालुक्यातून मांजरा आणि लेंडी वाहते. या तालुक्यातील १८ गावे नदीकाठावर आहेत. कंधार आणि लोहा तालुक्यातून गोदावरी आणि मन्याड या नद्या वाहतात. कंधार तालुक्यातील १५ तर लोहा तालुक्यातील १२ गावे नदी काठावर आहेत. मुखेड तालुक्यातूनही मन्याड जाते. या तालुक्यातील ८ गावे नदीकाठावर असून, बिलोली तालुक्यातून मन्याडसह मांजरा आणि गोदावरी वाहते.या तालुक्यातील तब्बल २८ गावे नदीकाठी आहेत. या बरोबरच नायगाव ११, धर्माबाद ६, अर्धापूर १, हिमायतनगर ४ तर मुदखेड तालुक्यातील ४ गावे नदीकाठी आहेत. प्रशासनाची पावसाळ्यात या सर्व १५६ गावांवर विशेष नजर असणार आहे. या सर्व १५६ गावांच्या परिसरात ४१ प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत.या आरोग्यकेंद्रांना नदीकाठच्या गावांची यादी देण्यात आली असून, या गावांना साथीबाबत जोखीमग्रस्त गावे समजून या गावांत साथरोग प्रतिबंधात्मक उपाययोजना अग्रक्रमाने राबविण्याचे निर्देश जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे देण्यात आले आहेत.नदीकाठच्या गावांमध्ये साथीच्या आजारांची शक्यता गृहीत धरुन साथ उद्रेकाची सूचना मिळताच त्वरित पथकासह भेट देवून योग्य ती वैद्यकीय सेवा व साथ प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरु करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. दरम्यान, साथरोग नियंत्रणासाठी मागील तीन वर्षांत साथ उद्रेक उद्भवलेली गावे तसेच मोठ्या यात्रा भरणारी गावे या बाबी विचारात घेऊन जोखीमग्रस्त गावांची यादी तयार करण्यात आली आहे. या १४ गावांत उपाययोजना करण्याबाबत तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना सूचित करण्यात आले आहे. या भागात आरोग्यसेवा तात्काळ उपलब्ध करुन देण्यासाठी जिल्हास्तरावर २ व जिल्ह्यातून १६ अशी १८ वैद्यकीय पथकांची स्थापना केली आहे.या गावांवर असणार आरोग्य विभागाचे विशेष लक्ष

  1. मागील तीन वर्र्षांत जलजन्य साथ उद्रेक उद्भवलेल्या गावांवर आरोग्य विभागाचे विशेष लक्ष असणार आहे. यात नायगाव तालुक्यातील कोलंबी, माहूर तालुक्यातील चोरड, मुखेड तालुक्यातील हिप्परगा, लोहा तालुक्यातील गौडगाव आणि माळेगाव अािण कंधारसह तालुक्यातील उमरातांडा या गावांत मागील तीन वर्षांत साथीचा उद्रेक झाला होता. त्यामुळे या गावांवर यंदा विशेष लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. याबरोबरच मोठी यात्रा भरणारी माहूर, माळेगाव, वडेपुरी, दाभड आणि शिकारघाट ही गावेही जोखमीग्रस्त गावांच्या यादीत टाकण्यात आली आहेत.
  2. जोखीमग्रस्त भागांत साथ प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी १५ दिवसांतून किमान एकदा गावभेट द्यायची असून प्राथमिक आरोग्य केंद्रात पुरेसा औषधीसाठा ठेवण्यात येत आहे.
टॅग्स :NandedनांदेडgodavariगोदावरीfloodपूरHealthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स