शहरं
Join us  
Trending Stories
1
Mantha Cyclone: मोंथा चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले! वेग प्रतितास 100 किमी, विदर्भाला ऑरेंज अलर्ट
2
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची खरंच चौकशी सुरू केली आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर
3
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान
4
पुण्यात भीषण अपघात! फरश्या घेऊन जाणाऱ्या ट्रकची तीन वाहनांना धडक,ट्रकचालकला पोलिसांच्या ताब्यात
5
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
6
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
7
जळगाव जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह 8 प्रवाशी जखमी
8
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
9
Mohammed Shami: "मी काही बोललो तर, वाद होईल!" संघ निवडीबाबत उपस्थित होणाऱ्या प्रश्नांवर शमीचं उत्तर
10
"त्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही"; डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात उदयनराजेंनी लोकांना काय केले आवाहन?
11
Viral Video: फलंदाजाला 'असं' आउट होताना कधीच पाहिलं नसेल; षटकार मारूनंही पंचांनी वर केलं बोट!
12
अजबच! गावठी कुत्रा बनला ज्वेलरी शॉपचा रखवालदार, गळ्यात घालतो ५० तोळ्यांची सोन्याची चेन
13
Inspiring Story: तरुणीला किडनीची गरज, तरुणाला कर्करोग...; गोष्ट एका अनोख्या प्रेमाची!
14
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
15
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
16
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
17
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
18
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
19
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
20
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?

बारा दिवस उलटूनही वीजपुरवठा ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2019 00:35 IST

तुफान वादळी वा-याने चिरली, पिंपळगाव (कु), डौरसह परिसरातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले असून बारा दिवस उलटून गेले तरी अजूनही वीजपुरवठा सुरळीत सुरु झालेला नाही.

ठळक मुद्देसोमवारच्या वादळी वाऱ्याचा फटका अनेक गावांत उच्च विद्युत पुरवठा बंद

आरळी : तुफान वादळी वा-याने चिरली, पिंपळगाव (कु), डौरसह परिसरातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले असून बारा दिवस उलटून गेले तरी अजूनही वीजपुरवठा सुरळीत सुरु झालेला नाही. वरील गावांसह परिसरातील बºयाच गावांत उच्चदाब विद्युत पुरवठा बंद आहे.चिरली, पिंपळगाव (कु), डौर, गुजरी, कौठा, हज्जापुर, का-हाळ आदी गावांत ३ जून रोजी रात्री झालेल्या वीजपुरवठ्याअभावी जनजीवन विस्कळीत झाले असून पाण्याविना लोकांचे बेहाल होत आहेत. मुक्या जनावरांसमोर चा-याचा प्रश्न असताना आता पिण्याच्या पाण्यासाठी भटकावे लागत आहे. महावितरणकडून अधूनमधून सिंगल फेज विद्युत पुरवठा होत असून तो पुरेसा नसल्याचे या भागातील नागरिकांचे म्हणणे आहे. जवळच असलेल्या कुंडलवाडी विद्युत उपकेंद्राने या बाबीकडे गांभीर्याने लक्ष देऊन उच्च दाब विद्युत पुरवठा पूर्ववत चालू करण्याची मागणी चिरलीचे सरपंच अशोक दगडे, गुजरीचे सरपंच कमळबाई नरवाडे, कौठा येथील सरपंच गोदावरी चेंडे, ग्रामपंचायत सदस्य नागनाथ चव्हाण, साहेबराव सोनकांबळे, नागरिक विजय नरवाडे, किशनराव ढगे, बसवेश्वर साखरे, संभाजी चेंडे, काशीनाथ साखरे आदींसह परिसरातील नागरिकांनी केली आहे. दरम्यान, कुंडलवाडीचे उपकार्यकारी अभियंता पांडवे म्हणाले, आमच्याकडे चोवीस गावे व कुंडलवाडी शहर आहे आणि कुंडलवाडी शहरामध्ये तीन पाळीमध्ये चार ते पाच कर्मचारी लागतात. चोवीस गावांसाठी तीनच कर्मचारी असल्यामुळे एकदाच सर्वच फिटरची कामे होत नाहीत.जवळपास ९० खांब वाकले तर १५ खांब तुटले आहेत़ सिमेंटचे १२० खांब तुटले असून जवळपास १५० खांब वाकले आहेत. कर्मचारी सकाळी आठपासून रात्री दहापर्यंत काम करत आहेत. तरीही आमच्याकडे मनुष्यबळ कमी पडत आहे. म्हणून देगलूर विद्युत विभागातील जास्तीचे कर्मचारी आम्ही बोलावले असून पुढच्या दोन ते तीन दिवसांत विद्युत पुरवठा पूर्ववत होईल, असे त्यांनी सांगितले.उप कार्यकारी अभियंता म्हणतात...उपकार्यकारी अभियंता पांडवे म्हणाले, आमच्याकडे चोवीस गावे व कुंडलवाडी शहर आहे आणि कुंडलवाडी शहरामध्ये तीन पाळीमध्ये चार ते पाच कर्मचारी लागतात. चोवीस गावांसाठी तीनच कर्मचारी असल्यामुळे एकदाच सर्वच फिटरचे काम होत नाहीत. जवळपास ११ के.व्ही.चे ९० खांब वाकलेले आहेत. आणि १५ खांब तुटलेले आहेत़

टॅग्स :NandedनांदेडelectricityवीजRainपाऊस