शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
2
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
3
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावांचा समावेश
4
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
5
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
6
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
7
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
8
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
9
Ahmedabad Plane Crash: विमान दुर्घटनेमुळे सलमान खानने घेतला मोठा निर्णय, म्हणाला-
10
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
11
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
12
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
13
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
14
मोठी अपडेट! एअर इंडियाचे विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले; पूर्ण इमारत जळून खाक
15
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
16
एअर इंडियाचं विमान कोसळलं! लंडनच्या प्रवासाचं तिकीट किती होतं? आकडा वाचून धक्का बसेल
17
अहमदाबाद विमान अपघात: प्रवाशांची यादी आली, गुजरातचे माजी CM विजय रुपाणी यांचेही नाव
18
Sonam Raghuvanshi : "मी थकले आहे, राजाला मार, नाहीतर मी मरेन..."; बॉयफ्रेंड राजनेच केली सोनमची पोलखोल
19
Aeroplane Black Box : विमान अपघातानंतर सर्वात आधी शोधला जातो 'ब्लॅक बॉक्स'; नेमकं काय असतं याचं काम?
20
Plane Crash: टेकऑफनंतर अवघ्या २ मिनिटांनी Air India चं विमान क्रॅश; नेमका कसा झाला अपघात?

बारा दिवस उलटूनही वीजपुरवठा ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2019 00:35 IST

तुफान वादळी वा-याने चिरली, पिंपळगाव (कु), डौरसह परिसरातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले असून बारा दिवस उलटून गेले तरी अजूनही वीजपुरवठा सुरळीत सुरु झालेला नाही.

ठळक मुद्देसोमवारच्या वादळी वाऱ्याचा फटका अनेक गावांत उच्च विद्युत पुरवठा बंद

आरळी : तुफान वादळी वा-याने चिरली, पिंपळगाव (कु), डौरसह परिसरातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले असून बारा दिवस उलटून गेले तरी अजूनही वीजपुरवठा सुरळीत सुरु झालेला नाही. वरील गावांसह परिसरातील बºयाच गावांत उच्चदाब विद्युत पुरवठा बंद आहे.चिरली, पिंपळगाव (कु), डौर, गुजरी, कौठा, हज्जापुर, का-हाळ आदी गावांत ३ जून रोजी रात्री झालेल्या वीजपुरवठ्याअभावी जनजीवन विस्कळीत झाले असून पाण्याविना लोकांचे बेहाल होत आहेत. मुक्या जनावरांसमोर चा-याचा प्रश्न असताना आता पिण्याच्या पाण्यासाठी भटकावे लागत आहे. महावितरणकडून अधूनमधून सिंगल फेज विद्युत पुरवठा होत असून तो पुरेसा नसल्याचे या भागातील नागरिकांचे म्हणणे आहे. जवळच असलेल्या कुंडलवाडी विद्युत उपकेंद्राने या बाबीकडे गांभीर्याने लक्ष देऊन उच्च दाब विद्युत पुरवठा पूर्ववत चालू करण्याची मागणी चिरलीचे सरपंच अशोक दगडे, गुजरीचे सरपंच कमळबाई नरवाडे, कौठा येथील सरपंच गोदावरी चेंडे, ग्रामपंचायत सदस्य नागनाथ चव्हाण, साहेबराव सोनकांबळे, नागरिक विजय नरवाडे, किशनराव ढगे, बसवेश्वर साखरे, संभाजी चेंडे, काशीनाथ साखरे आदींसह परिसरातील नागरिकांनी केली आहे. दरम्यान, कुंडलवाडीचे उपकार्यकारी अभियंता पांडवे म्हणाले, आमच्याकडे चोवीस गावे व कुंडलवाडी शहर आहे आणि कुंडलवाडी शहरामध्ये तीन पाळीमध्ये चार ते पाच कर्मचारी लागतात. चोवीस गावांसाठी तीनच कर्मचारी असल्यामुळे एकदाच सर्वच फिटरची कामे होत नाहीत.जवळपास ९० खांब वाकले तर १५ खांब तुटले आहेत़ सिमेंटचे १२० खांब तुटले असून जवळपास १५० खांब वाकले आहेत. कर्मचारी सकाळी आठपासून रात्री दहापर्यंत काम करत आहेत. तरीही आमच्याकडे मनुष्यबळ कमी पडत आहे. म्हणून देगलूर विद्युत विभागातील जास्तीचे कर्मचारी आम्ही बोलावले असून पुढच्या दोन ते तीन दिवसांत विद्युत पुरवठा पूर्ववत होईल, असे त्यांनी सांगितले.उप कार्यकारी अभियंता म्हणतात...उपकार्यकारी अभियंता पांडवे म्हणाले, आमच्याकडे चोवीस गावे व कुंडलवाडी शहर आहे आणि कुंडलवाडी शहरामध्ये तीन पाळीमध्ये चार ते पाच कर्मचारी लागतात. चोवीस गावांसाठी तीनच कर्मचारी असल्यामुळे एकदाच सर्वच फिटरचे काम होत नाहीत. जवळपास ११ के.व्ही.चे ९० खांब वाकलेले आहेत. आणि १५ खांब तुटलेले आहेत़

टॅग्स :NandedनांदेडelectricityवीजRainपाऊस