शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
2
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
3
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
4
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
5
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
6
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
7
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
8
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
9
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
10
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?
11
तालिबानचे नवे फर्मान! इस्लामविरोधी असल्याचे सांगत अफगाण शाळांमधून काढून टाकले ५१ विषय
12
सणासुदीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
13
Shivaji Nagar Metro: 'शिवाजीनगर मेट्रो स्टेशनचे नाव सेंट मेरी करा'; आमदाराच्या मागणीला CM सिद्धरामय्यांचा होकार
14
Navratri 2025 Dates: नवरात्रीची सुरुवात कधीपासून? घटस्थापनेचे महत्त्व, नऊ रंग आणि उत्सवाची पार्श्वभूमी जाणून घ्या
15
Milk Rate: ४ रुपयांनी स्वस्त होणारे का अमूलचं दूध? कंपनीच्या एमडींनी सांगितला संपूर्ण प्लान
16
भारताच्या 'या' राज्यात राहतात सर्वाधिक नेपाळी लोक, सरकारी सोयीसुविधांचाही घेतात लाभ!
17
"तुमची मुलगी नक्षलवादी आहे, तिचे आधारकार्ड द्या !" पोलिसांना माओवाद आणि मार्क्सवाद यातील फरक समजत नाही का?
18
विश्रांतीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार 'अँक्शन मोड'मध्ये! प्रशासनाला दिले महत्त्वाचे आदेश
19
पत्नीचं अफेअर, घराच्या छतावर चाळे करताना पतीने बॉयफ्रेंडसह पकडलं, त्यानंतर दिली ऐकून थरकाप उडेल अशी शिक्षा
20
साखरेच्या डब्यात मुंग्याच मुंग्या; पाहून डोक्याचा होतो भुगा, 'या' घरगुती उपायाने होतील छूमंतर

बारा दिवस उलटूनही वीजपुरवठा ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2019 00:35 IST

तुफान वादळी वा-याने चिरली, पिंपळगाव (कु), डौरसह परिसरातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले असून बारा दिवस उलटून गेले तरी अजूनही वीजपुरवठा सुरळीत सुरु झालेला नाही.

ठळक मुद्देसोमवारच्या वादळी वाऱ्याचा फटका अनेक गावांत उच्च विद्युत पुरवठा बंद

आरळी : तुफान वादळी वा-याने चिरली, पिंपळगाव (कु), डौरसह परिसरातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले असून बारा दिवस उलटून गेले तरी अजूनही वीजपुरवठा सुरळीत सुरु झालेला नाही. वरील गावांसह परिसरातील बºयाच गावांत उच्चदाब विद्युत पुरवठा बंद आहे.चिरली, पिंपळगाव (कु), डौर, गुजरी, कौठा, हज्जापुर, का-हाळ आदी गावांत ३ जून रोजी रात्री झालेल्या वीजपुरवठ्याअभावी जनजीवन विस्कळीत झाले असून पाण्याविना लोकांचे बेहाल होत आहेत. मुक्या जनावरांसमोर चा-याचा प्रश्न असताना आता पिण्याच्या पाण्यासाठी भटकावे लागत आहे. महावितरणकडून अधूनमधून सिंगल फेज विद्युत पुरवठा होत असून तो पुरेसा नसल्याचे या भागातील नागरिकांचे म्हणणे आहे. जवळच असलेल्या कुंडलवाडी विद्युत उपकेंद्राने या बाबीकडे गांभीर्याने लक्ष देऊन उच्च दाब विद्युत पुरवठा पूर्ववत चालू करण्याची मागणी चिरलीचे सरपंच अशोक दगडे, गुजरीचे सरपंच कमळबाई नरवाडे, कौठा येथील सरपंच गोदावरी चेंडे, ग्रामपंचायत सदस्य नागनाथ चव्हाण, साहेबराव सोनकांबळे, नागरिक विजय नरवाडे, किशनराव ढगे, बसवेश्वर साखरे, संभाजी चेंडे, काशीनाथ साखरे आदींसह परिसरातील नागरिकांनी केली आहे. दरम्यान, कुंडलवाडीचे उपकार्यकारी अभियंता पांडवे म्हणाले, आमच्याकडे चोवीस गावे व कुंडलवाडी शहर आहे आणि कुंडलवाडी शहरामध्ये तीन पाळीमध्ये चार ते पाच कर्मचारी लागतात. चोवीस गावांसाठी तीनच कर्मचारी असल्यामुळे एकदाच सर्वच फिटरची कामे होत नाहीत.जवळपास ९० खांब वाकले तर १५ खांब तुटले आहेत़ सिमेंटचे १२० खांब तुटले असून जवळपास १५० खांब वाकले आहेत. कर्मचारी सकाळी आठपासून रात्री दहापर्यंत काम करत आहेत. तरीही आमच्याकडे मनुष्यबळ कमी पडत आहे. म्हणून देगलूर विद्युत विभागातील जास्तीचे कर्मचारी आम्ही बोलावले असून पुढच्या दोन ते तीन दिवसांत विद्युत पुरवठा पूर्ववत होईल, असे त्यांनी सांगितले.उप कार्यकारी अभियंता म्हणतात...उपकार्यकारी अभियंता पांडवे म्हणाले, आमच्याकडे चोवीस गावे व कुंडलवाडी शहर आहे आणि कुंडलवाडी शहरामध्ये तीन पाळीमध्ये चार ते पाच कर्मचारी लागतात. चोवीस गावांसाठी तीनच कर्मचारी असल्यामुळे एकदाच सर्वच फिटरचे काम होत नाहीत. जवळपास ११ के.व्ही.चे ९० खांब वाकलेले आहेत. आणि १५ खांब तुटलेले आहेत़

टॅग्स :NandedनांदेडelectricityवीजRainपाऊस