शहरं
Join us  
Trending Stories
1
"होय, छगन भुजबळांचा नावाचा प्रस्ताव होता पण तडजोडीत ही जागा शिवसेनेला गेली"
2
दिल्ली, नोएडात खळबळ! एकाचवेळी ५० शाळांना बॉम्ब ठेवल्याचे मेल; विद्यार्थ्यांना सोडले
3
ठाणे, कल्याणमध्ये शिंदेंचे उमेदवार जाहीर; नरेश म्हस्केंना उमेदवारी, नाशिक अद्याप गुलदस्त्यातच
4
'एकेकाळी मी शरद पवारांना दैवत मानायचो, आता मी वेगळा मार्ग स्वीकारला आहे', अजित पवार यांचं विधान
5
Fact Check : राहुल गांधींनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला?; जाणून घ्या 'त्या' व्हायरल Video मागचं 'सत्य'
6
'सगळं माहिती असताना मोदींनी प्रज्ज्वल रेवन्नासाठी मतं मागितली'; ओवेसींचा आरोप
7
AI च्या माध्यमातून लक्ष्मीकांत बेर्डे परत येणार? महेश कोठारे करणार हा भन्नाट प्रयोग
8
Akhilesh Yadav : "कोरोना लसीवरून वाद, लोकांना येतोय हार्ट अटॅक"; अखिलेश यादव यांचं भाजपावर टीकास्त्र
9
माझं सत्त्व, माझं तत्त्व आणि सर्वस्व 'महाराष्ट्रधर्म', महाराष्ट्र दिनानिमित्त राज ठाकरेंची पोस्ट!
10
Wipro च्या नव्या सीईओंना किती वेतन मिळणार माहितीये? त्यात येतील दोन प्रायव्हेट जेट!
11
नाशिकमध्ये ठाकरे गटात बंड होणार! एक नेता दीड वर्षापासून तयारी करतोय, अर्ज घेतला
12
किंग खान King Kohli ला म्हणाला 'जावई', अनुष्का-विराटच्या नात्याचा शाहरुख होता साक्षीदार
13
बॉलिवूडच्या या अभिनेत्याच्या होत्या ३०८ गर्लफ्रेंड्स, त्यांना घेऊन जायचा कब्रस्तानात, कारण वाचून व्हाल हैराण
14
काँग्रेसमध्ये राज्यात ऐक्याचे चित्र, एकमेकांच्या पाडापाडीला फाटा; आपापले सुभे सांभाळण्यावर भर
15
"विरोधकांकडे आरोपांशिवाय काही उरलेलं नाही"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी हुतात्म्यांना वाहिली आदरांजली
16
महाराष्ट्र दिनानिमित्त नरेंद्र मोदींचं मराठमोळं ट्विट; "परंपरा, प्रगती आणि एकता..."
17
वातावरण टाइट ! साखर पेरणी की जातीचा मुद्दा ? 'शेट्टी-सरुडकर-माने' यांच्यामध्येच फाइट
18
‘आधी बूथ कॅप्चर व्हायचं, आता उमेदवारच पळवले जाताहेत’, इंदूरमधील घटनेवरून काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया
19
Mutual Fund मधील इन्सायडर ट्रेडिंग काय आहे माहितीये? ज्यावर SEBIनं उचलली कठोर पावलं, जाणून घ्या
20
मुंबईत आगळा सामना! मुलाविरुद्ध प्रचार करणार वडील;रवींद्र वायकरांसाठी गजानन कीर्तिकर उतरणार मुलगा अमोलविरोधात प्रचारात

हगणदारीमुक्ती व प्लास्टिकबंदीचा फज्जा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2019 1:12 AM

हगणदारीमुक्त गाव स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून गावागावांत शौचालय बांधकाम करण्यात आली. या शौचालयाचा वापर करण्यासाठी जनजागृतीद्वारे महत्त्व सांगण्यात आले. या अभियानावर आजवर कोट्यवधी रुपये खर्च झाले. मात्र उन्हाळ्याचे दिवसांत पाणी मिळणे कठीण झाले

ठळक मुद्देबिलोली, माहूर तालुक्याचे चित्र नियोजनाचा अभाव, ग्रामीण भागात उघड्यावर सर्रास शौच

बिलोली : हगणदारीमुक्त गाव स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून गावागावांत शौचालय बांधकाम करण्यात आली. या शौचालयाचा वापर करण्यासाठी जनजागृतीद्वारे महत्त्व सांगण्यात आले. या अभियानावर आजवर कोट्यवधी रुपये खर्च झाले. मात्र उन्हाळ्याचे दिवसांत पाणी मिळणे कठीण झाले असताना शौचालयात टाकायला पाणी कोठून आणावे, असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत नाईलाजास्तव जुनीच परंपरा सुरु करीत उघड्यावर प्रातर्विधी उरकवित असल्याने हगणदारीमुक्त गाव स्वच्छता अभियानास ग्रहण लागले आहे.यंदा बिलोली तालुक्यात अत्यल्प पाऊस झाला. परिणामी जमिनीतील पाण्याची पातळी कमालीची खालावली. अशा भीषण परिस्थितीत ग्रामीण भागातील नागरिकांना पाणीपुरवठा करणाऱ्या शासकीय योजना एकप्रकारे पाण्याअभावी शोभेच्या वास्तू बनल्याचे दिसून येत आहे.शौचालय बांधकामासाठी सर्वसामान्य नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्याचा प्रयत्न करण्यात आला. यात बहुतांश अंशी शासनाला यश सुद्धा आले. परंतु नैसर्गिक आपत्तीमुळे पिण्याच्या घोटभर पाण्यासाठी नागरिकांना पाणी मिळणे दुरापस्त झाल्याने शौचालयात टाकायला कोठून पाणी आणावे, असा प्रश्न नागरिकांसमोर उभा राहत आहे. एकूणच हगणदारीमुक्तीची चर्चा तालुक्यात सर्वत्र जोर पकडत आहे़रोगराईचा झपाट्याने प्रसारग्रामीण भागात शौचालयाअभावी नैसर्गिक प्रात:विधी उघड्यावर उरकवली जात असल्याने रोगराईचा प्रसार झपाट्याने व्हायचा. शिवाय यात महिलांना मोठी कुचंबणा सहन करावी लागायची. ही परिस्थिती बदलण्यासाठी शासनाने अनुदानातून शौचालय बांधकाम व वापराकरीता प्रोत्साहन दिले. नैसर्गिक आपत्तीमुळे पिण्याच्या घोटभर पाण्यासाठी नागरिकांना पाणी मिळणे दुरापस्त झाल्याने शौचालयात टाकायला कोठून पाणी आणावे, असा प्रश्न नागरिकांसमोर उभा राहत आहे.माहुरात प्लास्टिक पिशव्यांचा खचश्रीक्षेत्र माहूर : प्लास्टिक बंदीचा गतवर्षी निर्णय घेतल्यानंतरही माहूर शहरासह ग्रामीण भागात सरास प्लास्टिक पिशव्यांची विक्री व वापर सुरू आहे. ५0 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्यांचे विघटन होत नसल्यामुळेच शहराच्या कानाकोपºयात प्लास्टिक पिशव्यांचा खच साचला आहे.सद्यस्थितीत सगळीकडे लगीनघाई दिसून येत आहे. यामध्ये प्लास्टिक पत्रावळी, पाणी ग्लास, थर्माकॉल द्रोणचा वापर होत आहे़ मात्र या उष्ट्या प्लास्टिक पत्रावळी, पाणी ग्लास, थर्माकोल, द्रोण नागरिक गावाच्या बाहेर आणून फेकून देतात. यामुळे जनावरांचे आरोग्य धोक्यात आले आहे. प्लास्टिक पत्रावळी, ग्लास, थर्माकॉल द्रोण, प्लास्टिक पिशव्यांचा वापर आढळून आल्यास संबंधित व्यावसायिकांना दंड लावण्यात येत नाही.

टॅग्स :NandedनांदेडPlastic banप्लॅस्टिक बंदीSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान