शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
2
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
3
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
4
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
5
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
6
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी कर्णधार सूर्याने टीम इंडियाला दिला असा सल्ला, म्हणाला फोन बंद करा आणि...  
7
Scuba Diving : १०, २० की ३० मीटर? पाण्यात नेमके किती खोलवर जातात स्कूबा डायव्हर्स?
8
Navratri 2025: नवरात्रीत का घ्यावा सात्त्विक आहार? त्यामुळे शरीराला कोणते लाभ होतात?
9
VIDEO: माकडाने अचानक महिलेच्या डोक्यावरून हिसकावला गॉगल.. पुढे जे झालं ते पाहून व्हाल थक्क
10
"मी पुन्हा सांगतो, भारताकडे एक कमकुवत पंतप्रधान", H-1B व्हिसा प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल
11
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
12
डोनाल्ड ट्रम्प यांचा H-1B व्हिसा बॉम्ब होणार बॅकफायर, अमेरिकेचंच होणार नुकसान, तर भारताचा...
13
सर्वपित्री अमावास्या २०२५: पूर्वज स्मरणासह ‘ही’ कामे अवश्य कराच; पुण्य-वरदान-कृपा लाभेल!
14
तुमचा पुण्यातील रोजचा प्रवास ३५ किमी आहे, तर तुम्ही कोणती स्कूटर, मोटरसायकल घ्यावी? 
15
Navratri 2025: नवरात्रीत घट बसवण्याआधी देवघरात 'हे' बदल केले का? नसेल तर आजच करा
16
परदेशात फिरायला जाणाऱ्या प्रवाशांनी शोधली 'ही' नवीन युक्ती; नेमका काय आहे 'फ्लाइंग नेकेड ट्रेंड'?
17
आयडियाची कल्पना! "मला १०० रुपये द्या ना...", गाडी खरेदी करण्यासाठी महिलेचा 'कारनामा'
18
ट्रम्प यांच्या एका निर्णयाने अमेरिकेतील भारतीयांची धाकधूक वाढली; मायक्रोसॉफ्टने कर्मचाऱ्यांना पाठवला तातडीचा ईमेल
19
सर्वार्थ सिद्धी योगात सर्वपित्री अमावास्या २०२५: श्राद्ध विधीचा शुभ मुहूर्त; महत्त्व-मान्यता
20
परदेशी पाहुण्यांशी असलं वागणं शोभतं का? 'टपोरी' मुलाच्या Viral Video वर नेटकरी संतापले

हगणदारीमुक्ती व प्लास्टिकबंदीचा फज्जा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2019 01:15 IST

हगणदारीमुक्त गाव स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून गावागावांत शौचालय बांधकाम करण्यात आली. या शौचालयाचा वापर करण्यासाठी जनजागृतीद्वारे महत्त्व सांगण्यात आले. या अभियानावर आजवर कोट्यवधी रुपये खर्च झाले. मात्र उन्हाळ्याचे दिवसांत पाणी मिळणे कठीण झाले

ठळक मुद्देबिलोली, माहूर तालुक्याचे चित्र नियोजनाचा अभाव, ग्रामीण भागात उघड्यावर सर्रास शौच

बिलोली : हगणदारीमुक्त गाव स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून गावागावांत शौचालय बांधकाम करण्यात आली. या शौचालयाचा वापर करण्यासाठी जनजागृतीद्वारे महत्त्व सांगण्यात आले. या अभियानावर आजवर कोट्यवधी रुपये खर्च झाले. मात्र उन्हाळ्याचे दिवसांत पाणी मिळणे कठीण झाले असताना शौचालयात टाकायला पाणी कोठून आणावे, असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत नाईलाजास्तव जुनीच परंपरा सुरु करीत उघड्यावर प्रातर्विधी उरकवित असल्याने हगणदारीमुक्त गाव स्वच्छता अभियानास ग्रहण लागले आहे.यंदा बिलोली तालुक्यात अत्यल्प पाऊस झाला. परिणामी जमिनीतील पाण्याची पातळी कमालीची खालावली. अशा भीषण परिस्थितीत ग्रामीण भागातील नागरिकांना पाणीपुरवठा करणाऱ्या शासकीय योजना एकप्रकारे पाण्याअभावी शोभेच्या वास्तू बनल्याचे दिसून येत आहे.शौचालय बांधकामासाठी सर्वसामान्य नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्याचा प्रयत्न करण्यात आला. यात बहुतांश अंशी शासनाला यश सुद्धा आले. परंतु नैसर्गिक आपत्तीमुळे पिण्याच्या घोटभर पाण्यासाठी नागरिकांना पाणी मिळणे दुरापस्त झाल्याने शौचालयात टाकायला कोठून पाणी आणावे, असा प्रश्न नागरिकांसमोर उभा राहत आहे. एकूणच हगणदारीमुक्तीची चर्चा तालुक्यात सर्वत्र जोर पकडत आहे़रोगराईचा झपाट्याने प्रसारग्रामीण भागात शौचालयाअभावी नैसर्गिक प्रात:विधी उघड्यावर उरकवली जात असल्याने रोगराईचा प्रसार झपाट्याने व्हायचा. शिवाय यात महिलांना मोठी कुचंबणा सहन करावी लागायची. ही परिस्थिती बदलण्यासाठी शासनाने अनुदानातून शौचालय बांधकाम व वापराकरीता प्रोत्साहन दिले. नैसर्गिक आपत्तीमुळे पिण्याच्या घोटभर पाण्यासाठी नागरिकांना पाणी मिळणे दुरापस्त झाल्याने शौचालयात टाकायला कोठून पाणी आणावे, असा प्रश्न नागरिकांसमोर उभा राहत आहे.माहुरात प्लास्टिक पिशव्यांचा खचश्रीक्षेत्र माहूर : प्लास्टिक बंदीचा गतवर्षी निर्णय घेतल्यानंतरही माहूर शहरासह ग्रामीण भागात सरास प्लास्टिक पिशव्यांची विक्री व वापर सुरू आहे. ५0 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्यांचे विघटन होत नसल्यामुळेच शहराच्या कानाकोपºयात प्लास्टिक पिशव्यांचा खच साचला आहे.सद्यस्थितीत सगळीकडे लगीनघाई दिसून येत आहे. यामध्ये प्लास्टिक पत्रावळी, पाणी ग्लास, थर्माकॉल द्रोणचा वापर होत आहे़ मात्र या उष्ट्या प्लास्टिक पत्रावळी, पाणी ग्लास, थर्माकोल, द्रोण नागरिक गावाच्या बाहेर आणून फेकून देतात. यामुळे जनावरांचे आरोग्य धोक्यात आले आहे. प्लास्टिक पत्रावळी, ग्लास, थर्माकॉल द्रोण, प्लास्टिक पिशव्यांचा वापर आढळून आल्यास संबंधित व्यावसायिकांना दंड लावण्यात येत नाही.

टॅग्स :NandedनांदेडPlastic banप्लॅस्टिक बंदीSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान