शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

प्लास्टिक बंदीमुळे पारंपारिक पत्रावळी व्यवसायाला जीवनदान

By नामदेव भोर | Updated: March 18, 2018 13:42 IST

लग्न समारंभ, बारसं, घरगुती कार्यक्रमांच्या जेवणावळीसाठी माहुली झाडांच्या पानांच्या पत्रावळी  वापरल्या जातात. मात्र, काळानुरूप प्लॅस्टिकच्या पत्रावळींमुळे पारंपरिक पत्रावळी व्यवसाय धोक्यात आला होता. गुढीपाडव्यापासून राज्य सरकारने प्लॅस्टिकवर बंदी घातल्यामुळे पारंपरिक व्यवसायाला जीवनदान मिळणार असून, पत्रावळी व्यावसायिकांनी प्लॅस्टिकवरील बंदीच्या निर्णयाचे स्वागत केले आहे.

ठळक मुद्देप्लास्टिक बंदीमुळे पारंपरिक पत्रावळी उद्योगाला नवसंजीवनीपारंपारिक व्यावसायिकांकडून प्लास्टिक बंदीच्या निर्णयाचे स्वागत प्लॅस्टिक आणि थर्माकॉलच्या पत्रावळ्यांमुळे होते प्रदूषण माहूलीच्या पानापासून तयार पत्रावळ्यांचे होते नैसर्गिक विघटन

नाशिक : गावाकडे लग्न समारंभ, बारसं, घरगुती कार्यक्रमांच्या जेवणावळीसाठी माहुली झाडांच्या पानांच्या पत्रावळी  वापरल्या जातात. मात्र, काळानुरूप प्लॅस्टिकच्या पत्रावळींमुळे पारंपरिक पत्रावळी व्यवसाय धोक्यात आला होता. गुढीपाडव्यापासून राज्य सरकारने प्लॅस्टिकवर बंदी घातल्यामुळे पारंपरिक व्यवसायाला जीवनदान मिळणार असून, पत्रावळी व्यावसायिकांनी प्लॅस्टिकवरील बंदीच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. पारंपरिक पत्रावळीची जागा प्लॅस्टिक पत्रावळींनी घेतल्याने ग्रामीण भागासह शहरातल्याही गृहोद्योगांमधील पत्रावळी बनविण्याचे प्रमाण कमी झाले होते. किमतीने कमी आणि वापरण्यास सोपी असलेली प्लॅस्टिक पत्रावळी बाजारपेठेत सहज उपलब्ध होऊ लागल्याने पारंपरिक व्यावसायिकांनाही या व्यवसायात उतरणे अपरिहार्य झाले होते. त्यामुळे अविघटनशील अशा प्लॅस्टिकचा वापर वाढल्याने प्रदूषणाची समस्याही वाढली असतानाच पारंपरिक व्यवसाय नामशेष होण्याच्या मार्गावर होता. अशास्थितीतच शासनाने पुन्हा एकदा राज्यात प्लॅस्टिकवर बंदीचा निर्णय जाहीर केल्याने गेल्या अनेक पिढय़ांपासून सुरू असलेल्या पारंपरिक पत्रवळीच्या व्यवसायाला पुनर्जीवन मिळाल्याची प्रतिक्रिया पत्रावळी विक्रेत्यांनी व्यक्त केली आहे.  ग्रामीण भागात पत्रावळीचा व्यवसायय करणारे विलास पवार म्हणाले,  पारंपरिक पत्रवळीसाठी सर्व कच्चा माल जवळच मिळत असल्याने खर्चाची गरज नसते. घरची कामे उरकून पत्रवळ्या बनविता येत असल्याने माणूस अडकत नाही. ज्यांना पत्रवळ्यांची गरज आहे, अशा व्यक्ती गावातच येऊन पत्रवळ्या विकत घेतात. त्यामुळे बाजारपेठेत जाण्याचाही खर्च नसतो. उर्वरित पत्रवळ्या शहरातील बाजारपेठेत विकल्या जात असल्याने शहरी नागरिकांनाही सहज पत्रावळी उपलब्ध होते. तर  10 ते 15 वर्षापूर्वी पारंपरिक पत्रवळी उद्योग तेजीत होता. शहरातील प्रमुख व्यावसायिकांसोबतच ग्रामीण भागातील शेकडो कुटुंब या व्यवसायावर उदरनिर्वाह करीत होते. त्यामुळे गेल्या 9-10 वर्षापूर्वी प्लॅस्टिकच्या पत्रावळीवर विक्रेत्यांनी बंदी घालण्याची मागणी केली होती, अशी प्रतिक्रिया शहरातील पत्रावळी विक्रेता विशाल व्यावहारे यांनी व्यक्त केली असून सरकारने त्याकडे दुर्लक्ष केल्याचेही म्हटले आहे. आता उशिरा का होईना सरकारला सुचलेले शहानपण या व्यवसायाला निश्चित जीवनदान देणारे ठरणार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे. 

पारंपरिक व्यवसायाला नवसंजीवनी

प्लॅस्टिक आणि थर्माकॉलपासून तयार केलेल्या  पत्रावळ्यांचे  नैसर्गिक विघटन होत नाही. यामुळे प्रदूषणामध्ये जास्त वाढ होते. प्लॅस्टिकचा वापर कमी करण्यासाठी शासनाकडून अटोकाट प्रयत्न केले जात असताना माहुलीच्या पानांपासून तयार केलेल्या पारंपरिक पत्रवळी उद्योगाकडे मात्र दुर्लक्ष होत होते. या उद्योगाला शासनाकडूनही पाठबळ मिळत नव्हते. परंतु, सरकारने प्लॅस्टिकबंदीचा निर्णय घेतल्याने या व्यवसायाला नवसंजीवनी मिळाली आहे. 

 

टॅग्स :Plastic banप्लॅस्टिक बंदीNashikनाशिकbusinessव्यवसाय