शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

अर्धापूर शहरासाठी कायमस्वरूपी पाणीपुरवठा योजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2018 00:42 IST

अर्धापूर शहराच्या पिण्याच्या पाण्याचा कायमस्वरूपी प्रश्न मिटविण्यासाठी पाणीपुरवठा योजनेला शासनाकडून मंजुरी मिळाली आहे. या योजनेसाठी शासनाने २५.६१ कोटी रुपये अनुदान मंजूर केले आहे.

ठळक मुद्देअशोकराव चव्हाण यांच्या प्रयत्नांना यश योजनेसाठी २५ कोटी ६१ लाखांचा निधी मंजूर; शहरवासियांना दिलासा

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : अर्धापूर शहराच्या पिण्याच्या पाण्याचा कायमस्वरूपी प्रश्न मिटविण्यासाठी पाणीपुरवठा योजनेला शासनाकडून मंजुरी मिळाली आहे. या योजनेसाठी शासनाने २५.६१ कोटी रुपये अनुदान मंजूर केले आहे. माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण व भोकरच्या आ.अमिता चव्हाण यांनी या योजनेसाठी सातत्याने शासनाकडे पाठपुरावा केला होता़अर्धापूर शहरास सध्या जुन्या पाणी पुरवठा योजनेतून पिण्याचे पाणी पुरविण्यात येते. परंतु पाण्याची असलेली उपलब्धता व शहराची वाढती लोकसंख्या यामुळे पाणीपुरवठ्यासाठी अडथळे येत होते. या पार्श्वभूमीवर खा. अशोकराव चव्हाण व आ़ अमिता चव्हाण यांनी कायमस्वरूपी पाणीपुरवठा योजनेसाठीचा प्रारुप आराखडा प्रशासनास तयार करण्याच्या सूचना दिल्या. नगरपंचायत प्रशासनाने तयार केलेला प्रारुप आराखडा शासन स्तरावर प्रलंबित होता. यासाठी खा. अशोकराव चव्हाण व आ. अमिता चव्हाण यांनी शासनाकडे पाठपुरावा करुन सुमारे २५.६१ कोटींची कायमस्वरूपी पाणीपुरवठा योजना मंजूर करुन घेतली आहे. या योजनेअंतर्गत उर्ध्व पैनगंगेच्या डाव्या कालव्यातून शहरापासून ६ कि.मी. अंतर असलेल्या निमगाव तलावामध्ये पाण्याची साठवणूक करण्यात येईल व गरजेनुसार या पाण्याचा उपसा करण्यात येईल. कायमस्वरूपी पाणीपुरवठा योजना मंजूर झाली असली तरीही यावर्षी अर्धापूर शहरास पिण्याच्या पाण्याची टंचाई भासू नये म्हणून खा़ चव्हाण यांनी १ एप्रिल रोजी एक बैठक घेतली. या बैठकीमध्ये २० टँकरद्वारे उन्हाळ्यात पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला़ बैठकीस भाऊराव साखर उद्योग समूहाचे चेअरमन गणपतराव तिडके, नगराध्यक्ष प्रतिनिधी सोनाजी सरोदे, उपनगराध्यक्ष पप्पू बेग, उपविभागीय अधिकारी प्रदीप कुलकर्णी, तहसीलदार अरविंद नर्सीकर, मुख्याधिकारी आशुतोष चिंचाळकर आदींची उपस्थिती होती. कायमस्वरूपी पाणीपुरवठा योजना मंजूर करणे व २० टँकरद्वारे उन्हाळ्यात शहरात पाणीपुरवठा करण्याच्या निर्णयाचे नगराध्यक्षा प्रणिता सरोदे, उपनगराध्यक्ष पप्पू बेग व शहरातील नागरिकांनी स्वागत केले ़मालमत्ताकर वाढीसही मिळविली स्थगितीअर्धापूर नगरपंचायत प्रशासनाने वाढवलेल्या मालमत्ताकरास नागरिकांची मागणी लक्षात घेवून स्थगिती देण्यात आली आहे. अर्धापूर नगरपंचायत प्रशासनाने मागील काळात मालमत्ताकर वाढविण्याचा निर्णय घेतला होता. यासंदर्भात शहरातील नागरिकांनी हा वाढीव कर रद्द करावा, अशी मागणी खा. अशोकराव चव्हाण व आ. अमिता चव्हाण यांच्याकडे केली होती.नागरिकांच्या मागणीची दखल घेत खा.चव्हाण यांनी नगरपंचायतीने वाढविलेला मालमत्ताकर रद्द करावा अशा सूचना दिल्या होत्या. तसेच याबाबत बैठक घेण्याचे निर्देश दिले होते़त्यानंतर नगरपंचायतीची १५ मार्च रोजी सर्वसाधारण सभा झाली. या सभेमध्ये वाढविलेला मालमत्ताकर स्थगित करण्याचा निर्णय घेतला. नगरपंचायतीने घेतलेल्या या निर्णयाचे नागरिकांनी स्वागत केले आहे़

टॅग्स :Ashok Chavanअशोक चव्हाणWaterपाणी