शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा हट्टीपणा, अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लागू; भारत 'चौफेर' पलटवार करणार?
2
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
3
Saurabh Bharadwaj: आप नेते सौरभ भारद्वाज यांच्या घरासह १३ ठिकाणी ईडीचे छापे, नेमकं प्रकरण काय?
4
शेअर बाजाराचा धोका नको, पण परतावा बंपर हवा? मग 'या' ५ योजना आहेत बेस्ट, कमी जोखीमीत दुप्पट पैसे
5
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
6
अमेरिकेच्या टॅरिफचा फटका! सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी कोसळला, 'या' क्षेत्राला सर्वाधिक धक्का
7
गणपती २०२५: ६ मूलांकांना ८ राजयोग शुभ, दुपटीने चौफेर लाभ; धनलक्ष्मी-गणेश कृपेचा वरदहस्त!
8
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
9
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
10
Ganesh Chaturthi 2025:वडीलांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मोठ्या मुलानेच गणपती आणायचा? पंचांगकर्ते सोमण सांगतात... 
11
लग्नानंतरही विवाहितेला भेटायला गेला बॉयफ्रेंड; सासरच्यांनी पकडल्यावर मुलीच्या बापाने दोघांनाही हात बांधून...,
12
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
13
बँकिंग-फायनान्स क्षेत्रात बंपर भरती! मिळणार तब्बल २.५० लाख नोकऱ्या, छोटी शहरे केंद्रस्थानी
14
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
15
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
16
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
17
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
18
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
19
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
20
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा

अर्धापूर शहरासाठी कायमस्वरूपी पाणीपुरवठा योजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2018 00:42 IST

अर्धापूर शहराच्या पिण्याच्या पाण्याचा कायमस्वरूपी प्रश्न मिटविण्यासाठी पाणीपुरवठा योजनेला शासनाकडून मंजुरी मिळाली आहे. या योजनेसाठी शासनाने २५.६१ कोटी रुपये अनुदान मंजूर केले आहे.

ठळक मुद्देअशोकराव चव्हाण यांच्या प्रयत्नांना यश योजनेसाठी २५ कोटी ६१ लाखांचा निधी मंजूर; शहरवासियांना दिलासा

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : अर्धापूर शहराच्या पिण्याच्या पाण्याचा कायमस्वरूपी प्रश्न मिटविण्यासाठी पाणीपुरवठा योजनेला शासनाकडून मंजुरी मिळाली आहे. या योजनेसाठी शासनाने २५.६१ कोटी रुपये अनुदान मंजूर केले आहे. माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण व भोकरच्या आ.अमिता चव्हाण यांनी या योजनेसाठी सातत्याने शासनाकडे पाठपुरावा केला होता़अर्धापूर शहरास सध्या जुन्या पाणी पुरवठा योजनेतून पिण्याचे पाणी पुरविण्यात येते. परंतु पाण्याची असलेली उपलब्धता व शहराची वाढती लोकसंख्या यामुळे पाणीपुरवठ्यासाठी अडथळे येत होते. या पार्श्वभूमीवर खा. अशोकराव चव्हाण व आ़ अमिता चव्हाण यांनी कायमस्वरूपी पाणीपुरवठा योजनेसाठीचा प्रारुप आराखडा प्रशासनास तयार करण्याच्या सूचना दिल्या. नगरपंचायत प्रशासनाने तयार केलेला प्रारुप आराखडा शासन स्तरावर प्रलंबित होता. यासाठी खा. अशोकराव चव्हाण व आ. अमिता चव्हाण यांनी शासनाकडे पाठपुरावा करुन सुमारे २५.६१ कोटींची कायमस्वरूपी पाणीपुरवठा योजना मंजूर करुन घेतली आहे. या योजनेअंतर्गत उर्ध्व पैनगंगेच्या डाव्या कालव्यातून शहरापासून ६ कि.मी. अंतर असलेल्या निमगाव तलावामध्ये पाण्याची साठवणूक करण्यात येईल व गरजेनुसार या पाण्याचा उपसा करण्यात येईल. कायमस्वरूपी पाणीपुरवठा योजना मंजूर झाली असली तरीही यावर्षी अर्धापूर शहरास पिण्याच्या पाण्याची टंचाई भासू नये म्हणून खा़ चव्हाण यांनी १ एप्रिल रोजी एक बैठक घेतली. या बैठकीमध्ये २० टँकरद्वारे उन्हाळ्यात पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला़ बैठकीस भाऊराव साखर उद्योग समूहाचे चेअरमन गणपतराव तिडके, नगराध्यक्ष प्रतिनिधी सोनाजी सरोदे, उपनगराध्यक्ष पप्पू बेग, उपविभागीय अधिकारी प्रदीप कुलकर्णी, तहसीलदार अरविंद नर्सीकर, मुख्याधिकारी आशुतोष चिंचाळकर आदींची उपस्थिती होती. कायमस्वरूपी पाणीपुरवठा योजना मंजूर करणे व २० टँकरद्वारे उन्हाळ्यात शहरात पाणीपुरवठा करण्याच्या निर्णयाचे नगराध्यक्षा प्रणिता सरोदे, उपनगराध्यक्ष पप्पू बेग व शहरातील नागरिकांनी स्वागत केले ़मालमत्ताकर वाढीसही मिळविली स्थगितीअर्धापूर नगरपंचायत प्रशासनाने वाढवलेल्या मालमत्ताकरास नागरिकांची मागणी लक्षात घेवून स्थगिती देण्यात आली आहे. अर्धापूर नगरपंचायत प्रशासनाने मागील काळात मालमत्ताकर वाढविण्याचा निर्णय घेतला होता. यासंदर्भात शहरातील नागरिकांनी हा वाढीव कर रद्द करावा, अशी मागणी खा. अशोकराव चव्हाण व आ. अमिता चव्हाण यांच्याकडे केली होती.नागरिकांच्या मागणीची दखल घेत खा.चव्हाण यांनी नगरपंचायतीने वाढविलेला मालमत्ताकर रद्द करावा अशा सूचना दिल्या होत्या. तसेच याबाबत बैठक घेण्याचे निर्देश दिले होते़त्यानंतर नगरपंचायतीची १५ मार्च रोजी सर्वसाधारण सभा झाली. या सभेमध्ये वाढविलेला मालमत्ताकर स्थगित करण्याचा निर्णय घेतला. नगरपंचायतीने घेतलेल्या या निर्णयाचे नागरिकांनी स्वागत केले आहे़

टॅग्स :Ashok Chavanअशोक चव्हाणWaterपाणी