शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

नांदेडकर हुशार; मोदींना फसले नाहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2019 00:47 IST

२०१४ मध्ये नरेंद्र मोदी यांनी जनतेला अनेक स्वप्ने दाखविली. या आश्वासनांना देशातील जनता भुलली. मात्र पाच वर्षांचा भाजपाचा कार्यकाळ पाहिल्यानंतर नांदेडमधील जनताच हुशार होती. जनतेने भाजपाच्या भाषणबाजीवर न भुलता अशोकरावांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय घेतला.

ठळक मुद्देप्रदेशाध्यक्ष जयंत पाटील विकास काँग्रेसमुळे झाला याची जिल्हावासीयांना जाणीव

नांदेड : २०१४ मध्ये नरेंद्र मोदी यांनी जनतेला अनेक स्वप्ने दाखविली. या आश्वासनांना देशातील जनता भुलली. मात्र पाच वर्षांचा भाजपाचा कार्यकाळ पाहिल्यानंतर नांदेडमधील जनताच हुशार होती. जनतेने भाजपाच्या भाषणबाजीवर न भुलता अशोकरावांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय घेतला. आता तर नरेंद्र मोदींचा पाच वर्षांचा अपयशी कारभार आपल्यासमोर आहे. त्यामुळे नांदेडमधून पुन्हा अशोकराव चव्हाण मोठ्या मताधिक्याने विजयी झाल्याशिवाय राहणार नाहीत, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केला.रविवारी रात्री वाजेगाव येथे काँग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडीच्या वतीने आयोजित प्रचारसभेत ते बोलत होते. मंचावर लोकसभा निवडणुकीतील काँग्रेसचे उमेदवार खा. अशोकराव चव्हाण यांच्यासह राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुनील कदम यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी जिल्हा परिषद सदस्य मनोहर शिंदे यांनी दक्षिणमधून भरघोस मताधिक्य देवू, असा शब्द दिला तर मुस्ताक काझी यांनी ईदगाह मैदानासाठी ३५ लाख रुपये आणि वाजेगावचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी ८ कोटींचा निधी अशोकराव चव्हाण यांच्या पाठपुराव्यामुळेच मिळाल्याचे स्पष्ट केले.जयंत पाटील यांनी आपल्या भाषणात शिवसेना-भाजपावर सडकून टीका केली. वर्धा, गोंदियात मोदींच्या सभांना प्रतिसाद मिळाला नाही. नांदेडमध्ये मोदींच्या चेहऱ्यावर उत्साह नव्हता. भाषणातही त्यांनी टीकेपलीकडे काही सांगितले नाही. पंतप्रधान म्हणून स्वत:च्या कार्यक्रमाबद्दल बोलायला हवे. शेतकरी, शेतमजूर, कष्टकऱ्यांसह राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय धोरण मांडायला हवे. मात्र पाच वर्षांत काहीच केलेले नसल्याने पंतप्रधान आता पातळी सोडून टीका करीत फिरत असल्याचे पाटील यांनी सांगितले. पाच वर्षांत देशवासीयांची फसवणूक केल्यानंतर आता नरेंद्र मोदी हे जवानामागे दडत असल्याचे सांगत पुलवामा येथे झालेल्या स्फोटाला जबाबदार कोण? अडीचशे किलो आरडीएक्स तिथपर्यंत आले कसे? याची उत्तरे आता भाजपानेच द्यायला हवीत. काँग्रेसच्या काळातही सर्जीकल स्ट्राईक झाले मात्र त्याचा आम्ही कधी गवगवा केला नसल्याचे सांगत सर्वाधिक दहशतवादी हल्ले मोदींच्याच काळात झाले. याबरोबर शेतकरी आत्महत्यांच्या घटनाही याच देवेंद्र आणि नरेंद्रच्या काळात झाल्याचेही जयंत पाटील यांनी सांगितले. अशोकराव चव्हाण यांनी आपल्या भाषणात वाजेगावमधील वीटभट्ट्या आपण स्वत: पाठपुरावा करुन पुन्हा सुरू केल्याचे सांगितले. उद्योग बंद करुन येथील लोकांची रोजीरोटी हिसकावू नका, असेही ते म्हणाले.वंचित आघाडी स्पॉन्सर्डमहाराष्ट्रात दलित, अल्पसंख्याक, ओबीसी आपल्याला मते देणार नाहीत याची जाणीव भाजपाला झाली होती. त्यामुळे त्यांनीच मतविभाजन करण्यासाठी वंचित आघाडी स्पॉन्सर्ड केल्याचा आरोप जयंत पाटील यांनी केला. जागा वाटपासाठी चर्चा सुरू असताना दुसरीकडे उमेदवारी जाहीर होत होती. यावरुनच हे स्पष्ट होत असल्याचे सांगत वंचित आघाडीच्या नादी लागून स्वत:ची फसगत करु नका, तर भाजपाच्या पराभवासाठी काँग्रेस आघाडीला मते द्या, असे आवाहन पाटील यांनी केले.कै. शंकररावांमुळेच मिळाले या भागाला पाणीवाजेगाव कायम काँग्रेसच्या पाठीशी राहिले आहे. मी तुमच्याच गावचा असल्याचे सांगत शंकरराव मतदानासाठी धनेगावला यायचे, या आठवणींना उजाळा देत शंकररावांमुळेच या भागाला पाणी मिळाल्याचे अशोकराव चव्हाण यांनी सांगितले. नांदेडमधून काँग्रेसचा विजय पक्का असल्याची ग्वाही देत ७० टक्के मतदान भाजपाविरोधी असताना केवळ मतविभाजनामुळे मागीलवेळी त्यांची सत्ता आली होती. मात्र, यावेळी जनता भूलणार नाही. भाजपाला धडा शिकवेल, असे ते म्हणाले.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकnanded-pcनांदेडJayant Patilजयंत पाटीलNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेस