शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही भारत आणि पाकिस्तानला शस्त्रे टाकण्यास सांगू शकत नाही' : जेडी व्हेन्स
2
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
3
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
4
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
5
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
7
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
8
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
9
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
10
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
11
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानने दहशतवादाला पाठिंबा देणं थांबवावं, भारताच्या कारवाईदरम्यान अमेरिकेने सुनावले
12
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
13
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
14
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
15
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
16
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
17
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
18
"...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही दिसणार नाही"; एकनाथ शिंदे यांचे सडेतोड वक्तव्य
19
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
20
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच

कंधार तालुक्यातील ८ गावांतील प्रलंबित रस्ते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 04:31 IST

कंधार : तालुक्यातील बारूळ येथील मातंग व बौद्ध समाजाच्या स्मशानभूमीचा रस्ता अनेक वर्षांपासून रखडला होता. १ हजारापेक्षा अधिक लोकसंख्या ...

कंधार : तालुक्यातील बारूळ येथील मातंग व बौद्ध समाजाच्या स्मशानभूमीचा रस्ता अनेक वर्षांपासून रखडला होता. १ हजारापेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या समाजाची प्रेत घेऊन जाताना होणारी हेळसांड थांबली आहे, तसेच इतर ७ गावांतील रस्ता व पाणंद रस्त्याचा प्रश्न निकाली काढण्यात महसूल विभागाला यश मिळाले आहे.

तालुक्यातील अनेक गावांत लहानशी कारणे, स्थानिक राजकारण, हेवेदावे, काहींची अडवणुकीची असलेली भूमिका, भाऊबंदकीत असलेली टोकाची भूमिका यामुळे रस्त्याचा प्रश्न गुंतागुंतीचा होत असतो. गावात हा प्रश्न मिटत नसतो. काही जण न्यायालयात प्रकरण दाखल करतात. त्यामुळे सामान्यांची मोठी अडचण होते. माणुसकी व संवेदनशीलता असलेले अधिकारी व माणसे यातून सामोपचाराने मार्ग काढतात, तसेच तहसीलदारांना असलेल्या अधिकाराचा उपयोग करून प्रलंबित रस्त्यांचा प्रश्र निकाली काढण्यात आले असल्याचे सांगण्यात आले.

बारूळ येथील बौद्ध व मातंग समाजाला स्मशानभूमीला जाणाऱ्या रस्त्याची मोठी समस्या होती.

मामलेदार कोर्ट ॲक्ट १९०५ च्या पोटकलम ५ नुसार रस्त्याचा प्रश्न तहसीलदारांनी सोडवत दोन्ही समाजांना मोठा दिलासा दिला आहे. पावसाळ्यात मृत व्यक्तीवर अंत्यसंस्कार करणे जोखमीचे होते. ऑक्टोबर २०२० मध्ये जटिल प्रश्न सुटला, तसेच एक पारंपरिक सुमारे १९६० पासूनचा पाणंद रस्त्याचा प्रश्न सुटल्याने शेकडो शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

उस्माननगर येथील २ रस्त्यांचा प्रश्न सोडविण्यात आल्याने शेतकरी व नागरिकांना दिलासा मिळाला. दहीकळंबा येथील सुमारे १० कि.मी.पेक्षा जास्त, असा ४ ते ५ रस्त्यांचा प्रश्न सोडविण्यात आला. पानभोसी येथील ४०० ते ५०० मीटरचा रस्ता प्रश्न, पानशेवडी येथील दीड ते दोन कि.मी.चा रस्ता, कारतळा येथील १९७२ पासूनचा किचकट पाणंद रस्ता तयार करण्यात आला. रस्ता अडचणीमुळे शेतकरी, शेतमजूर, पशुधनाची होणारी फरपट थांबली. २ कि.मी.चा हा रस्ता पालकमंत्री पाणंद रस्त्यात मंजुरी आणून १ लाखातून करण्यात आला. सोमठाणा येथील रस्त्याच्या वादाने अडचण येत होती. हा प्रश्न सोडवून पालकमंत्री पाणंद रस्त्याचा प्रस्ताव दाखल करण्याची सूचना करण्यात आली, तसेच गुटेवाडी ते जयराम तांडा हा २ कि.मी.चा रस्ता पालकमंत्री पाणंद रस्त्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला.

जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या सूचना व उपविभागीय अधिकारी पांडुरंग बोरगावकर, तत्कालीन तहसीलदार सखाराम मांडवगडे, नायब तहसीलदार व काही काळ प्रभारी तहसीलदार असलेले विजय चव्हाण, मंडळ अधिकारी, तलाठी यांच्या सहकार्याने, स्थानिक लोकप्रतिनिधी व विशेषतः नागरिकांच्या विधायक भूमिकेने रस्त्यांचा प्रश्न ३ महिन्यांत सुटण्यास मदत मिळाली.