शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

कंधार तालुक्यातील ८ गावांतील प्रलंबित रस्ते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 04:31 IST

कंधार : तालुक्यातील बारूळ येथील मातंग व बौद्ध समाजाच्या स्मशानभूमीचा रस्ता अनेक वर्षांपासून रखडला होता. १ हजारापेक्षा अधिक लोकसंख्या ...

कंधार : तालुक्यातील बारूळ येथील मातंग व बौद्ध समाजाच्या स्मशानभूमीचा रस्ता अनेक वर्षांपासून रखडला होता. १ हजारापेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या समाजाची प्रेत घेऊन जाताना होणारी हेळसांड थांबली आहे, तसेच इतर ७ गावांतील रस्ता व पाणंद रस्त्याचा प्रश्न निकाली काढण्यात महसूल विभागाला यश मिळाले आहे.

तालुक्यातील अनेक गावांत लहानशी कारणे, स्थानिक राजकारण, हेवेदावे, काहींची अडवणुकीची असलेली भूमिका, भाऊबंदकीत असलेली टोकाची भूमिका यामुळे रस्त्याचा प्रश्न गुंतागुंतीचा होत असतो. गावात हा प्रश्न मिटत नसतो. काही जण न्यायालयात प्रकरण दाखल करतात. त्यामुळे सामान्यांची मोठी अडचण होते. माणुसकी व संवेदनशीलता असलेले अधिकारी व माणसे यातून सामोपचाराने मार्ग काढतात, तसेच तहसीलदारांना असलेल्या अधिकाराचा उपयोग करून प्रलंबित रस्त्यांचा प्रश्र निकाली काढण्यात आले असल्याचे सांगण्यात आले.

बारूळ येथील बौद्ध व मातंग समाजाला स्मशानभूमीला जाणाऱ्या रस्त्याची मोठी समस्या होती.

मामलेदार कोर्ट ॲक्ट १९०५ च्या पोटकलम ५ नुसार रस्त्याचा प्रश्न तहसीलदारांनी सोडवत दोन्ही समाजांना मोठा दिलासा दिला आहे. पावसाळ्यात मृत व्यक्तीवर अंत्यसंस्कार करणे जोखमीचे होते. ऑक्टोबर २०२० मध्ये जटिल प्रश्न सुटला, तसेच एक पारंपरिक सुमारे १९६० पासूनचा पाणंद रस्त्याचा प्रश्न सुटल्याने शेकडो शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

उस्माननगर येथील २ रस्त्यांचा प्रश्न सोडविण्यात आल्याने शेतकरी व नागरिकांना दिलासा मिळाला. दहीकळंबा येथील सुमारे १० कि.मी.पेक्षा जास्त, असा ४ ते ५ रस्त्यांचा प्रश्न सोडविण्यात आला. पानभोसी येथील ४०० ते ५०० मीटरचा रस्ता प्रश्न, पानशेवडी येथील दीड ते दोन कि.मी.चा रस्ता, कारतळा येथील १९७२ पासूनचा किचकट पाणंद रस्ता तयार करण्यात आला. रस्ता अडचणीमुळे शेतकरी, शेतमजूर, पशुधनाची होणारी फरपट थांबली. २ कि.मी.चा हा रस्ता पालकमंत्री पाणंद रस्त्यात मंजुरी आणून १ लाखातून करण्यात आला. सोमठाणा येथील रस्त्याच्या वादाने अडचण येत होती. हा प्रश्न सोडवून पालकमंत्री पाणंद रस्त्याचा प्रस्ताव दाखल करण्याची सूचना करण्यात आली, तसेच गुटेवाडी ते जयराम तांडा हा २ कि.मी.चा रस्ता पालकमंत्री पाणंद रस्त्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला.

जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या सूचना व उपविभागीय अधिकारी पांडुरंग बोरगावकर, तत्कालीन तहसीलदार सखाराम मांडवगडे, नायब तहसीलदार व काही काळ प्रभारी तहसीलदार असलेले विजय चव्हाण, मंडळ अधिकारी, तलाठी यांच्या सहकार्याने, स्थानिक लोकप्रतिनिधी व विशेषतः नागरिकांच्या विधायक भूमिकेने रस्त्यांचा प्रश्न ३ महिन्यांत सुटण्यास मदत मिळाली.