शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

"पाच लाख देऊन विषय संपणार नाही, 'महाराष्ट्र भूषण'कार्यक्रमाची न्यायालयीन चौकशी व्हावी"

By श्रीनिवास भोसले | Updated: April 25, 2023 12:35 IST

राज्य सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवावा

नांदेड : महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण सोहळा ऐन उन्हाळ्यात आयोजित करून निष्पाप १४ लोकांचा बळी घेणाऱ्या राज्य सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा. तसेच या कार्यक्रमाची न्यायालयीन चौकशी करावी, अशी मागणी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी केली. नांदेड येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी माजी मंत्री डी. पी. सावंत, माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा, प्रवक्ता संतोष पांडागळे, मुतेजीब यांची प्रमुख उपस्थिती होती.

पद्मश्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा सोहळा योग्यच होता, आप्पासाहेब यांना पुरस्कार दिल्याने या पुरस्काराची उंची वाढली. परंतु, हा कार्यक्रम चुकीच्या पद्धतीने घेऊन श्री सदस्यांना झालेला नाहक त्रास आणि उष्माघाताने १४ लोकांचा घेतलेला बळी तसेच शेकडो लोक आजारी पडून रुग्णालयात भरती झाले. त्याची जबाबदारी कोण घेणार? आयोजक म्हणून नैतिक जबाबदारी घेऊन राज्य सरकारने पुढे येणे गरजेचे होते. परंतु, यावर बोलायला कोणीही तयार नाही, असे चव्हाण म्हणाले.

ऐन उन्हाळ्यात एवढा मोठा जनसमुदाय एकत्रित आणण्याची गरज होती का? या कार्यक्रमातून सरकारला शक्तिप्रदर्शन करायचे होते का? असे विविध प्रश्न उपस्थित होतात, असे चव्हाण म्हणाले. पद्मश्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांचा चाहता वर्ग मोठा आहे. त्यामुळे होणारी गर्दी लक्षात घेऊन सरकारने नियोजन करणे गरजेचे होते. परंतु, प्यायला पाणी कमी पडल्याने अनेकांना जागोजागी भोवळ येत होती. अनेकजण रात्रीपासूनच कार्यक्रमस्थळी पोहोचले होते. त्यांना भोजनाची व्यवस्था केली गेली नाही. सलग सहा-आठ तास उन्हात बसणाऱ्यांना साधे पाणी मिळाले नाही. परिणामी अनेकांना उष्माघात झाला आणि त्यातच त्यांचा जीव गेला. ज्यावेळी श्री सदस्यांना चक्कर, भाेवळ येत होती, त्यावेळी कार्यक्रम सुरूच होता. रुग्णवाहिकेतून त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले. हा सर्व प्रकार नियोजन नसल्यानेच झाला. त्यामुळे या सर्व कार्यक्रमाची न्यायालयीन चौकशी करावी. तसेच एक दिवसीय विशेष अधिवेशन बोलावून त्यावर चर्चा करावी, अशी मागणी आम्ही राज्यपालांकडे करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

पाच लाख देऊन विषय संपणार नाही...या कार्यक्रमावर तब्बल १३ कोटींचा खर्च करण्यात आला. प्रमुख मान्यवर वातानुकूलित कक्षात आणि श्री सदस्य उन्हात होते, ही शोकांतिका आहे. मृतांच्या वारसांना पाच लाख रुपये देऊन हा विषय संपणारा नाही, असेही चव्हाण म्हणाले.

टॅग्स :Ashok Chavanअशोक चव्हाणcongressकाँग्रेसNandedनांदेडEknath Shindeएकनाथ शिंदे