शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

हदगाव तालुक्यातील पळसा कालवा फुटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2018 11:58 PM

बरडशेवाळा येथील फुटलेला कालवा दुरुस्त करून २६ जानेवारीला पुन्हा त्यातून पाणी सोडले़ दोन दिवसानंतर पळसा येथील साखळी क्रमांक ३८ फुटून चार हजार क्यूमेक्स पाणी वाया गेले़ कालवा पुन्हा फुटण्याची शक्यता असतानाही पाणी सोडले व कालवा फुटून गुराढोरांना मिळणारे पाणी वाया गेले़

लोकमत न्यूज नेटवर्कहदगाव : बरडशेवाळा येथील फुटलेला कालवा दुरुस्त करून २६ जानेवारीला पुन्हा त्यातून पाणी सोडले़ दोन दिवसानंतर पळसा येथील साखळी क्रमांक ३८ फुटून चार हजार क्यूमेक्स पाणी वाया गेले़ कालवा पुन्हा फुटण्याची शक्यता असतानाही पाणी सोडले व कालवा फुटून गुराढोरांना मिळणारे पाणी वाया गेले़८ जानेवारी रोजी बरडशेवाळा येथे कालवा फुटून सात हजार क्यूमेक्स पाणी वाया गेले होते़ त्यानंतर १७ दिवस काम सुरू होते़ २४ जानेवारी रोजी काम संपल्यानंतर २६ जानेवारीला पुन्हा पाणीपाळी देण्यात आली़ दोन दिवस चार ते सहा क्यूमेक्स पाणी प्रवाह असल्याने पाणी बरेच लांबपर्यंत गेले़ शेवटपर्यंत पोहोचलेही; पण आज सोमवारी पाण्याचा प्रवाह वाढविताच पळसा येथे मोठे भगदाड पडून चार हजार क्यूमेक्स पाणी वाया गेले़सोमवारी सकाळी ७़३० वाजता कालवा फुटला, त्यानंतर दुपारी १२ वाजता वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी आले व मातीचे पोते भरून संथगतीने भगदाड बुजविण्याचा प्रयत्न केला, पाणी प्रवाह बंद केले तरीही सायंकाळी पाचपर्यंत पाण्याचा प्रवाह जोरात होता़ त्यामुळे नाल्याला पाणी वाहत होते़ दुपारी मात्र जेसीबी बोलावून काम सुरू केले़ कालवा फुटण्याची कारणमीमांसा वरिष्ठ अधिका-यांना बोचरी लागली असली तरी ‘२८ ठिकाणी कालवा फुटण्याचा धोका कायम’ असे वृत्त ‘लोकमत’ने यापूर्वीच छापले होते़ दोनच दिवसांत पुन्हा कालवा फुटला़याविषयी नांदेड विभागाचे कार्यकारी अभियंता कुरुंदकर यांनी शेतकºयांना दोष देत त्यांनीच हा प्रकार केला असावा असा अंदाज व्यक्त केला़ परंतु साखळी क्ऱ३८-३७ मध्ये बाभूळ, उमर, लिंब यांचे मोठमोठी झाडे आहेत़ त्यांची मुळे खोल जावून कालव्याला छिद्रे पडली़ याकडे मात्र जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले़बरडशेवाळा कालवा फुटला की फोडला या आशयाचे वृत्त ‘लोकमत’ने छापले़ त्याविषयी कुरुंदकर यांनी आम्ही कशाला फोडू कालवा? असा सवाल केला. शेतक-यांनी फोडला तर त्यांच्यावर कारवाई का नाही करत? या प्रश्नावरही त्यांनी मौन बाळगले़ जमा झालेल्या सर्व शेतक-यांना व कर्मचा-यांना बोलण्यास मज्जाव करून कामास लावले़धरणामध्ये १३ टक्केच पाणीसाठा असताना दोन पाणीपाळ्या सोडल्या व दोन्ही वेळा कालवा फुटून ते वाया गेले़ याला जबाबदार शेतकरी की कर्मचारी-अधिकारी? कालव्यामध्ये फुटलेली झाडे तीन-चार वर्षे वयाची आहेत़ दरवर्षी कामासाठी निधी खर्च दाखविला जातो़ वृक्षाची तोड का केली जात नाही? दोन्ही ठिकाणी फुटलेला कालवा नाल्याजवळच कसा काय फुटला? शेतक-यांच्या पिकांचे नुकसान झाले नाही, पण आजूबाजूचे बंधारे भरून गेले़ २६ जानेवारीला सोडलेले पाणी गुराढोरांसाठी व पाणीपुरवठा योजनेची पाणीपातळी वाढण्यासाठी सोडले होते, तेही मध्येच बंद झाले़