शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

पैनगंगेला पूर; विदर्भ-मराठवाड्याचा संपर्क तुटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2020 19:41 IST

मागील चार ते पाच दिवसापासून पैनगंगा स्थित इसापूर प्रकल्पात पाणीसाठा वाढत आहे.

ठळक मुद्दे हिमायतनगर तालुक्यातील सुमारे ४० गावांना पुराचा धोका होण्याची भीती

नांदेड : उर्ध्व पैनगंगा म्हणजेच इसापूर धरणात गुरुवारी सकाळी ८१ टक्के पाणीसाठा झाल्याने या प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. त्यामुळे पैनगंगा नदीलापूर आला असून गांजेगाव येथील पुलावरुन पाणी वाहत असल्याने विदर्भ-मराठवाड्याचा संपर्क तुटला आहे. मागील सात वर्षात पहिल्यांदाच हे धरण ओव्हरफ्लो होण्याच्या मार्गावर आहे.

मागील चार ते पाच दिवसापासून पैनगंगा स्थित इसापूर प्रकल्पात पाणीसाठा वाढत असल्याने तसेच पावसाचा जोर धरणाच्या वरील बाजूसही कायम असल्याने धरणातून पैनगंगा नदीत विसर्ग करण्यात येत आहे. पुराचे पाणी गांजेगाव पुलावरुन वहात असल्याने विदर्भ-मराठवाड्याचा संपर्क तुटला असून हिमायतनगर-ढाणकी मार्गे होणारी वाहतूक ठप्प झाली आहे. त्यामुळे वाहनधारकांना दूरच्या मार्गाने प्रवास करावा लागत आहे. पैनगंगेच्या वरील क्षेत्रात असलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील पेनटाकळी धरणही तुडुंब भरले आहे.

या धरणातूनही मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात येत असून हे पाणी इसापूर धरण क्षेत्रात येत असल्याने धरणाची पाणी पातळी झपाट्याने वाढत आहे. या पाण्यामुळे हिमायतनगर तालुक्यातील सुमारे ४० गावांना पुराचा धोका होण्याची भीती व्यक्त केली जात असून नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क रहावे, असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे. दरम्यान, पुराच्या पाण्यामुळे जिवीत व वित्त हानी होऊ नये म्हणून किनवट तालुक्यातील नदी काठावरील गावातील नागरिकांनी गुरे-ढोरे, घरगुती व शेती उपयोगी सामान सुरक्षितस्थळी ठेवावे, असे आवाहन केले असून सर्व अधिकारी, कर्मचा-यांनी मुख्यालयी थांबण्याचे निर्देश किनवटच्या तहसीलदारांनी दिले आहेत.   

टॅग्स :riverनदीNandedनांदेडfloodपूरMarathwadaमराठवाडा