शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
2
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
3
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
4
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
5
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
6
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
7
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
8
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
9
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
10
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
11
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
12
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
13
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
14
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
15
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
16
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
17
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
18
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
19
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
20
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक

बंधाऱ्यात निम्माच साठा; नांदेडसह परभणी, हिंगोली जिल्ह्यांवर पाणीसंकट

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2023 15:58 IST

नदीकाठच्या गावांमधील पाण्याचे संकट कमी व्हावे, शेतीचे सिंचन वाढावे, या उद्देशाने गोदावरी नदीवर ठिकठिकाणी बंधारे बांधण्यात आले.

नांदेड : गोदावरी आणि पैनगंगा नद्यांवर बांधलेल्या बंधाऱ्यांत सरासरी निम्माच पाणीसाठा झाला असून, नांदेडसह परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील अनेक गावांवर पाणीसंकट ओढवण्याची भीती निर्माण झाली आहे.

नदीकाठच्या गावांमधील पाण्याचे संकट कमी व्हावे, शेतीचे सिंचन वाढावे, या उद्देशाने गोदावरी नदीवर पैठणपासून ते नांदेड जिल्ह्यापर्यंत ठिकठिकाणी बंधारे बांधण्यात आले. यावर्षी पाऊसकाळ कमी राहिला. काही जिल्ह्यांमध्ये सरासरीएवढाही पाऊस झाला नाही. प्रकल्प रिकामे असून, नदीतून पुढे पाणी सोडण्याची वेळ आलीच नाही. परभणी जिल्ह्यात गोदावरी नदीवर पाच बंधारे असून, नांदेड जिल्ह्यात चार बंधारे आहेत. तर नांदेड जिल्ह्यातील पैनगंगा नदीवर पाच बंधारे आहेत.

सध्या गोदावरी नदीवरील परभणी जिल्ह्यातील बंधाऱ्यांमध्ये जेमतेम निम्मा पाणीसाठा आहे. तर नांदेड जिल्ह्यात गोदावरीवरील बंधाऱ्यांत बऱ्यापैकी साठा आहे. मात्र, पैनगंगा नदीवरील बंधारे चक्क कोरडेच आहेत. त्यामुळे संभाव्य पाणीटंचाईची चिंता आतापासूनच सतावत आहे. जायकवाडी प्रकल्पातून नदीपात्रात पाणी सोडले तरच बंधाऱ्यात पाणीसाठा होणार आहे. उन्हाळ्यातील टंचाई दूर करण्यासाठी पुन्हा जायकवाडी प्रकल्पावर अवलंबून राहावे लागेल.

प्रकल्पांतील साठाही चिंतेचापरभणी जिल्ह्यातील येलदरी प्रकल्पात ६२ टक्के, सिद्धेश्वर प्रकल्पात ९९ टक्के, निम्न दुधना प्रकल्पात २७ टक्के, अपर मानार प्रकल्पात ३५ टक्के, निम्न मानार प्रकल्पात ७३ टक्के, इसापूर प्रकल्पात ८३ टक्के, तर नांदेडच्या विष्णुपुरी प्रकल्पात १०० टक्के पाणीसाठा आहे. परभणी जिल्ह्यातील निम्न दुधना आणि नांदेड जिल्ह्यातील अपर मानार प्रकल्पातील साठा चिंता वाढवीत आहे.

बंधाऱ्यातील साठा

ढालेगाव : ४८ टक्के

तारुगव्हाण : ५० टक्के

मुदगल : ४९ टक्के

मुळी : ० टक्के

डिग्रस : ७३ टक्के

अंतेश्वर : १०० टक्के

आमदुरा : ८० टक्के

बळेगाव : ८७ टक्के

बाभळी : शून्य टक्के

पैनगंगा नदीवरील बंधारेमंगरूळ : ०.४७ टक्केभंडारवाडी : ६.५० टक्केमोहपूर :०.३५ टक्केसाकूर : ०.३५ टक्केदिगडी : १.७२ टक्के

टॅग्स :NandedनांदेडWaterपाणी