शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

बंधाऱ्यात निम्माच साठा; नांदेडसह परभणी, हिंगोली जिल्ह्यांवर पाणीसंकट

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2023 15:58 IST

नदीकाठच्या गावांमधील पाण्याचे संकट कमी व्हावे, शेतीचे सिंचन वाढावे, या उद्देशाने गोदावरी नदीवर ठिकठिकाणी बंधारे बांधण्यात आले.

नांदेड : गोदावरी आणि पैनगंगा नद्यांवर बांधलेल्या बंधाऱ्यांत सरासरी निम्माच पाणीसाठा झाला असून, नांदेडसह परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील अनेक गावांवर पाणीसंकट ओढवण्याची भीती निर्माण झाली आहे.

नदीकाठच्या गावांमधील पाण्याचे संकट कमी व्हावे, शेतीचे सिंचन वाढावे, या उद्देशाने गोदावरी नदीवर पैठणपासून ते नांदेड जिल्ह्यापर्यंत ठिकठिकाणी बंधारे बांधण्यात आले. यावर्षी पाऊसकाळ कमी राहिला. काही जिल्ह्यांमध्ये सरासरीएवढाही पाऊस झाला नाही. प्रकल्प रिकामे असून, नदीतून पुढे पाणी सोडण्याची वेळ आलीच नाही. परभणी जिल्ह्यात गोदावरी नदीवर पाच बंधारे असून, नांदेड जिल्ह्यात चार बंधारे आहेत. तर नांदेड जिल्ह्यातील पैनगंगा नदीवर पाच बंधारे आहेत.

सध्या गोदावरी नदीवरील परभणी जिल्ह्यातील बंधाऱ्यांमध्ये जेमतेम निम्मा पाणीसाठा आहे. तर नांदेड जिल्ह्यात गोदावरीवरील बंधाऱ्यांत बऱ्यापैकी साठा आहे. मात्र, पैनगंगा नदीवरील बंधारे चक्क कोरडेच आहेत. त्यामुळे संभाव्य पाणीटंचाईची चिंता आतापासूनच सतावत आहे. जायकवाडी प्रकल्पातून नदीपात्रात पाणी सोडले तरच बंधाऱ्यात पाणीसाठा होणार आहे. उन्हाळ्यातील टंचाई दूर करण्यासाठी पुन्हा जायकवाडी प्रकल्पावर अवलंबून राहावे लागेल.

प्रकल्पांतील साठाही चिंतेचापरभणी जिल्ह्यातील येलदरी प्रकल्पात ६२ टक्के, सिद्धेश्वर प्रकल्पात ९९ टक्के, निम्न दुधना प्रकल्पात २७ टक्के, अपर मानार प्रकल्पात ३५ टक्के, निम्न मानार प्रकल्पात ७३ टक्के, इसापूर प्रकल्पात ८३ टक्के, तर नांदेडच्या विष्णुपुरी प्रकल्पात १०० टक्के पाणीसाठा आहे. परभणी जिल्ह्यातील निम्न दुधना आणि नांदेड जिल्ह्यातील अपर मानार प्रकल्पातील साठा चिंता वाढवीत आहे.

बंधाऱ्यातील साठा

ढालेगाव : ४८ टक्के

तारुगव्हाण : ५० टक्के

मुदगल : ४९ टक्के

मुळी : ० टक्के

डिग्रस : ७३ टक्के

अंतेश्वर : १०० टक्के

आमदुरा : ८० टक्के

बळेगाव : ८७ टक्के

बाभळी : शून्य टक्के

पैनगंगा नदीवरील बंधारेमंगरूळ : ०.४७ टक्केभंडारवाडी : ६.५० टक्केमोहपूर :०.३५ टक्केसाकूर : ०.३५ टक्केदिगडी : १.७२ टक्के

टॅग्स :NandedनांदेडWaterपाणी