शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Assembly Election Result 2025 Live Updates: 'किंगमेकर' झाला 'किंग' ! नितीश कुमारांच्या JDU ची जोरदार मुसंडी, भाजपचीही उत्तम साथ
2
Bihar Election Result 2025: शिंदेसेनेच्या नेत्याचा जावई बिहार निवडणुकीत पिछाडीवर; JDU ची आघाडी
3
Bihar Election 2025 Result: प्रशांत किशोर यांचे ३ उमेदवार आघाडीवर; एक्झिट पोल खरे ठरणार?
4
'निगेटिव्ह' झाली इलॉन मस्क यांची नेटवर्थ; एका झटक्यात ₹१८,२०,२५,८५,५०,००० चा फटका
5
Stock Market Today: सुरुवातीच्या व्यवहारात १०० अंकांपेक्षा अधिक घसरला बाजार, २५,८०० च्या खाली निफ्टी
6
IND vs SA 1st Test : गिल पुन्हा अनलकी; अखेर बावुमानं संपवली दक्षिण आफ्रिकेची 'साडेसाती'
7
Bihar Election 2025 Result: सुरुवातीचे कल हाती; BJP-RJD मध्ये काँटे की टक्कर, NDA आघाडीवर
8
Bihar Election: सरकार स्थापन करण्यासाठी किती जागा आवश्यक? समजून घ्या बहुमताचं गणित!
9
बॉलिवूड पार्ट्यांमध्ये अंडरवर्ल्डकडून ड्रग्ज सप्लाय; श्रद्धा कपूर, नोरा फतेही, ओरीसह टॉप सेलिब्रिटींची नावं आल्यानं खळबळ
10
ICUमध्ये धर्मेंद्र आणि देओल कुटुंबाचा गुपचूप व्हिडीओ बनवणं पडलं महागात, हॉस्पिटलचा कर्मचारी अटकेत
11
माझे काही फोटो अश्लील पद्धतीने...; अचानक व्हायरल झाल्यावर गिरीजा ओकने व्यक्त केली चिंता
12
बंडखोरीवर उपाय: अर्ज भरल्यावर भाजप जाहीर करणार उमेदवारांची यादी; ८०% नावे निश्चित
13
जबरदस्त रिटर्न देईल 'ही' स्कीम, केवळ ₹५,००० ची गुंतवणूक देईल ₹२६ लाखांपेक्षा जास्त फंड; पाहा कॅलक्युलेशन
14
दिल्लीत स्फोट घडवणाऱ्यांना कडक इशारा; मास्टरमाईंड डॉ. उमरचे पुलवामातील घर IED स्फोटकांनी उडवले!
15
आजचे राशीभविष्य, १४ नोव्हेंबर २०२५: सन्मान वाढेल, नोकरीत प्रगती होईल, बोलण्यावर संयम ठेवा!
16
३ राजयोगात उत्पत्ति एकादशी २०२५: ७ राशींना शुभ, उच्च पद मिळेल; अकल्पनीय लाभ, अनपेक्षित यश!
17
“अजित पवार सत्तेसाठी लाचार असल्याने ते सत्तेतून बाहेर पडण्याचा प्रश्नच नाही”; काँग्रेसची टीका
18
नितीशराज की तेजस्वी पर्व? बिहारचा आज फैसला
19
नगरपरिषद-नगरपंचायत निवडणुकांसाठी शिवसेनेचे प्रभारी जाहीर; DCM एकनाथ शिंदेंकडून घोषणा
20
रेल्वे प्रवाशांना पुन्हा खिंडीत गाठणार? ‘वर्क टू रुल’साठी सेंट्रल रेल्वे कर्मचारी करणार आंदोलन
Daily Top 2Weekly Top 5

विष्णूपुरीत केवळ ३१ दलघमी पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2018 00:28 IST

संपूर्ण शहराची तहाण भागवणा-या विष्णूपुरी प्रकल्पात अवघे ३१ दलघमी पाणी उरले असून हे पाणी संपल्यानंतर काय? असा प्रश्न उभा राहिला आहे.

ठळक मुद्देइसापूरचे पाणी नांदेडलाआजपासून उत्तर नांदेडचा पाणीपुरवठा सांगवी बंधाऱ्यातून

नांदेड : संपूर्ण शहराची तहाण भागवणा-या विष्णूपुरी प्रकल्पात अवघे ३१ दलघमी पाणी उरले असून हे पाणी संपल्यानंतर काय? असा प्रश्न उभा राहिला आहे. त्याचवेळी इसापूर प्रकल्पातून महापालिकेने पहिल्या टप्प्यात २ दलघमी पाणी घेतले असून यातील १ दलघमी पाणी सांगवी बंधा-यात पोहचले आहे.संपूर्ण शहराची तहान भागवण्यासाठी विष्णूपुरी प्रकल्पात महापालिकेने ३२ दलघमी पाणी राखीव केले आहे तर इसापूर प्रकल्पातही १५ दलघमी पाण्याचे आरक्षण केले आहे. विष्णूपुरी प्रकल्पातून सुरू असलेल्या अवैध पाणी उपसामुळे मोठ्या प्रमाणात जलसाठा कमी होत आहे. या अवैध पाणी उपसावर आळा घालण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि महापालिकेच्यावतीने स्थापन करण्यात आलेल्या ७ संयुक्त पथके स्थापन करण्यात आली आहेत. या पथकांची कामगिरीही अशी-तशीच असल्याने अवैध पाणी उपसा सुरूच असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यातच १६ डिसेंबर पासून विष्णूपुरी प्रकल्प क्षेत्रातील एक्सप्रेस फिडर बंद केल्याने अवैध पाणी उपसावर काही प्रमाणात आळा बसला आहे.चिंतेची बाब म्हणजे डिसेंबरच्या अखेरीस विष्णूपुरी प्रकल्पात केवळ ३१.२४ दलघमी साठा उरला आहे. ३८.६६ टक्के पाणी प्रकल्पात उपलब्ध आहे. आणखी जून-जुलै पर्यंत शहराला उपलब्ध पाण्यातून पाणी पुरवठा कसा होईल? हा प्रश्न आहे. विष्णूपुरी प्रकल्प क्षेत्रात जवळपास १ हजाराहून अधिक विद्युत पंपाद्वारे अनधिकृतपणे पाणी उपसा सुरू असल्याची बाब सिंचन विभागाकडून स्पष्ट करण्यात आली होती. प्रकल्पातून जवळपास ०.७५ दलघमी जलसाठा प्रतिदिन कमी होत होता. हा पाणी उपसा रोखण्यासाठी ७ पथके स्थापन करण्यात आली. मात्र या पथकांची कामगिरी पाहता अनधिकृत पाणी उपशावर आळा बसविण्यात प्रारंभी यश आलेच नव्हते. पथकातील अनेक विभागाचे कर्मचारी गस्तीवर आलेच नाहीत. त्यातही महत्वाचे विभाग असलेल्या महावितरण आणि पोलिस विभागातील कर्मचाºयांचा समावेश होता. यामुळे प्रकल्पातील अवैध पाणी उपसा कमी-अधिक प्रमाणात सुरूच होता. १६ डिसेंबर पासून एक्सप्रेस फिडर बंद करण्यात आले आहेत.विष्णूपुरीतील साठा झपाट्याने घटत असतानाच इसापूर प्रकल्पाचे २ दलघमी पाणी महापालिकेने मागितले आहे. हे पाणी गुरुवारी आसना नदीद्वारे सांगवी बंधा-यात पोहोचले आहे. गुरुवारी सायंकाळी ४ वाजेपासून दोन विद्युत पंपाद्वारे पाणी उपसा सुरू करण्यात आला आहे. आसनेवरील पाण्याद्वारे उत्तर नांदेडची तहान आगामी काळात भागवली जाणार आहे. २ दलघमी पैकी १ दलघमी पाणी उपलब्ध झाले असून जवळपास २० ते २५ दिवस उत्तर नांदेडला हे पाणी पुरणार आहे.सांगवी बंधाºयातील पाणी काबरानगर येथून जलशुद्धीकरण केंद्रात घेतले जाते. या केंद्रातून वर्कशॉप, नंदीग्राम, लेबर कॉलनी, नाना-नानी पार्क, हैदरबाग आदी भागाला पाणी पुरवठा केला जाणार आहे. त्यामुळे विष्णूपुरी प्रकल्पावरील काही भाग हलका होणार आहे. येथे सुरू असलेल्या चार पैकी दोन पंप बंद राहतील. दोन पंपाद्वारे दक्षिण नांदेडसह शहराच्या काही भागाला पाणी पुरवठा केला जाणार आहे. विष्णूपुरी प्रकल्पात उरलेले ३१ दलघमी पाण्याचे योग्य संरक्षण न केल्यास आगामी काळात पाण्याचे मोठे दुर्भिक्ष्य नांदेडकरांपुढे उभे राहणार आहे. त्याचवेळी पाणी आणण्यासाठी पर्याय उपलब्ध नसल्याने पाण्याची चिंता आणखीनच वाढल्याचे दिसून येते.हातपंप, बोअरवेल दुरुस्तीला सुरुवातआगामी काळातील पाण्याचे संकट पाहता महापालिका प्रशासन आतापासूनच तयारीला लागले आहे. शहरातील हातपंप व बोअरवेल दुरुस्तीला प्रारंभ करण्यात आल्याचे पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुग्रीव अंधारे यांनी सांगितले. शहरात एकूण ७१० हातपंप आहेत तर २५९ विद्युत पंप आहेत. यातील नादुरुस्त पंप दुरुस्त केले जाणार आहेत. शहरात असलेल्या अनधिकृत नळ कनेक्शनवरही महापालिकेने लक्ष घातले आहे. अनधिकृत नळ कनेक्शन शोधण्यासाठी विशेष पथकाची स्थापना करण्यात आली आहे. राजेश चव्हाण यांच्यासह अन्य कर्मचाºयांचा या पथकात समावेश आहे.

टॅग्स :NandedनांदेडWaterपाणीwater scarcityपाणी टंचाईDamधरण