शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

विष्णूपुरीत केवळ ३१ दलघमी पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2018 00:28 IST

संपूर्ण शहराची तहाण भागवणा-या विष्णूपुरी प्रकल्पात अवघे ३१ दलघमी पाणी उरले असून हे पाणी संपल्यानंतर काय? असा प्रश्न उभा राहिला आहे.

ठळक मुद्देइसापूरचे पाणी नांदेडलाआजपासून उत्तर नांदेडचा पाणीपुरवठा सांगवी बंधाऱ्यातून

नांदेड : संपूर्ण शहराची तहाण भागवणा-या विष्णूपुरी प्रकल्पात अवघे ३१ दलघमी पाणी उरले असून हे पाणी संपल्यानंतर काय? असा प्रश्न उभा राहिला आहे. त्याचवेळी इसापूर प्रकल्पातून महापालिकेने पहिल्या टप्प्यात २ दलघमी पाणी घेतले असून यातील १ दलघमी पाणी सांगवी बंधा-यात पोहचले आहे.संपूर्ण शहराची तहान भागवण्यासाठी विष्णूपुरी प्रकल्पात महापालिकेने ३२ दलघमी पाणी राखीव केले आहे तर इसापूर प्रकल्पातही १५ दलघमी पाण्याचे आरक्षण केले आहे. विष्णूपुरी प्रकल्पातून सुरू असलेल्या अवैध पाणी उपसामुळे मोठ्या प्रमाणात जलसाठा कमी होत आहे. या अवैध पाणी उपसावर आळा घालण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि महापालिकेच्यावतीने स्थापन करण्यात आलेल्या ७ संयुक्त पथके स्थापन करण्यात आली आहेत. या पथकांची कामगिरीही अशी-तशीच असल्याने अवैध पाणी उपसा सुरूच असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यातच १६ डिसेंबर पासून विष्णूपुरी प्रकल्प क्षेत्रातील एक्सप्रेस फिडर बंद केल्याने अवैध पाणी उपसावर काही प्रमाणात आळा बसला आहे.चिंतेची बाब म्हणजे डिसेंबरच्या अखेरीस विष्णूपुरी प्रकल्पात केवळ ३१.२४ दलघमी साठा उरला आहे. ३८.६६ टक्के पाणी प्रकल्पात उपलब्ध आहे. आणखी जून-जुलै पर्यंत शहराला उपलब्ध पाण्यातून पाणी पुरवठा कसा होईल? हा प्रश्न आहे. विष्णूपुरी प्रकल्प क्षेत्रात जवळपास १ हजाराहून अधिक विद्युत पंपाद्वारे अनधिकृतपणे पाणी उपसा सुरू असल्याची बाब सिंचन विभागाकडून स्पष्ट करण्यात आली होती. प्रकल्पातून जवळपास ०.७५ दलघमी जलसाठा प्रतिदिन कमी होत होता. हा पाणी उपसा रोखण्यासाठी ७ पथके स्थापन करण्यात आली. मात्र या पथकांची कामगिरी पाहता अनधिकृत पाणी उपशावर आळा बसविण्यात प्रारंभी यश आलेच नव्हते. पथकातील अनेक विभागाचे कर्मचारी गस्तीवर आलेच नाहीत. त्यातही महत्वाचे विभाग असलेल्या महावितरण आणि पोलिस विभागातील कर्मचाºयांचा समावेश होता. यामुळे प्रकल्पातील अवैध पाणी उपसा कमी-अधिक प्रमाणात सुरूच होता. १६ डिसेंबर पासून एक्सप्रेस फिडर बंद करण्यात आले आहेत.विष्णूपुरीतील साठा झपाट्याने घटत असतानाच इसापूर प्रकल्पाचे २ दलघमी पाणी महापालिकेने मागितले आहे. हे पाणी गुरुवारी आसना नदीद्वारे सांगवी बंधा-यात पोहोचले आहे. गुरुवारी सायंकाळी ४ वाजेपासून दोन विद्युत पंपाद्वारे पाणी उपसा सुरू करण्यात आला आहे. आसनेवरील पाण्याद्वारे उत्तर नांदेडची तहान आगामी काळात भागवली जाणार आहे. २ दलघमी पैकी १ दलघमी पाणी उपलब्ध झाले असून जवळपास २० ते २५ दिवस उत्तर नांदेडला हे पाणी पुरणार आहे.सांगवी बंधाºयातील पाणी काबरानगर येथून जलशुद्धीकरण केंद्रात घेतले जाते. या केंद्रातून वर्कशॉप, नंदीग्राम, लेबर कॉलनी, नाना-नानी पार्क, हैदरबाग आदी भागाला पाणी पुरवठा केला जाणार आहे. त्यामुळे विष्णूपुरी प्रकल्पावरील काही भाग हलका होणार आहे. येथे सुरू असलेल्या चार पैकी दोन पंप बंद राहतील. दोन पंपाद्वारे दक्षिण नांदेडसह शहराच्या काही भागाला पाणी पुरवठा केला जाणार आहे. विष्णूपुरी प्रकल्पात उरलेले ३१ दलघमी पाण्याचे योग्य संरक्षण न केल्यास आगामी काळात पाण्याचे मोठे दुर्भिक्ष्य नांदेडकरांपुढे उभे राहणार आहे. त्याचवेळी पाणी आणण्यासाठी पर्याय उपलब्ध नसल्याने पाण्याची चिंता आणखीनच वाढल्याचे दिसून येते.हातपंप, बोअरवेल दुरुस्तीला सुरुवातआगामी काळातील पाण्याचे संकट पाहता महापालिका प्रशासन आतापासूनच तयारीला लागले आहे. शहरातील हातपंप व बोअरवेल दुरुस्तीला प्रारंभ करण्यात आल्याचे पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुग्रीव अंधारे यांनी सांगितले. शहरात एकूण ७१० हातपंप आहेत तर २५९ विद्युत पंप आहेत. यातील नादुरुस्त पंप दुरुस्त केले जाणार आहेत. शहरात असलेल्या अनधिकृत नळ कनेक्शनवरही महापालिकेने लक्ष घातले आहे. अनधिकृत नळ कनेक्शन शोधण्यासाठी विशेष पथकाची स्थापना करण्यात आली आहे. राजेश चव्हाण यांच्यासह अन्य कर्मचाºयांचा या पथकात समावेश आहे.

टॅग्स :NandedनांदेडWaterपाणीwater scarcityपाणी टंचाईDamधरण