शहरं
Join us  
Trending Stories
1
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
2
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
3
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
4
"त्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही"; डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात उदयनराजेंनी लोकांना काय केले आवाहन?
5
अजबच! गावठी कुत्रा बनला ज्वेलरी शॉपचा रखवालदार, गळ्यात घालतो ५० तोळ्यांची सोन्याची चेन
6
Inspiring Story: तरुणीला किडनीची गरज, तरुणाला कर्करोग...; गोष्ट एका अनोख्या प्रेमाची!
7
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
8
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
9
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
10
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
11
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
12
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
13
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?
14
दादर रेल्वे स्टेशनवर धक्कादायक प्रकार! तरुणाने स्वत:वरच केला चाकूहल्ला.. घटना CCTVमध्ये कैद
15
'आपण मोठी चूक करतोय', भारतावर कर लादल्यामुळे माजी अमेरिकन मंत्र्यांची ट्रम्प सरकारवर टीका
16
"टीम इंडियावर कारवाई करायची नाही... BCCIकडून आलेला फोन"; माजी मॅच रेफरीच्या आरोपांमुळे खळबळ
17
अजानमुळे सोनू निगमने कॉन्सर्ट थांबवला, आधी कौतुक झाले मग आठवला जुना वाद, एका ट्वीटमुळे झालेला गोंधळ
18
कर्नाटकमध्ये संघावर निर्बंध, हायकोर्टाचा काँग्रेस सरकारला दणका, दिले असे आदेश 
19
सलमान खानने केलेलं लाँच, आता १० वर्षांनंतर प्रसिद्ध स्टारकिडने बॉलिवूडमधून घेतला संन्यास, चाहत्यांना धक्का!
20
लोकांत असंतोष, भारतात नेपाळसारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते: प्रकाश आंबेडकरांचा इशारा

१६०० किलोमीटर कालव्याच्या नियंत्रणासाठी केवळ २८ कालवा निरीक्षक

By रामेश्वर बालाजीराव काकडे | Updated: August 12, 2024 15:02 IST

तीन जिल्ह्यांतील सिंचनासाठी जलसंधारण विभागाची होतेय दमछाक

नांदेड : उर्ध्व पैनगंगा प्रकल्प इसापूर धरणांतर्गत नांदेड, हिंगोली व यवतमाळ जिल्ह्यात १ लाख ७ हजार हेक्टर सिंचनक्षेत्र आहे. उन्हाळी आणि रब्बी हंगामासाठी इसापूरमधून पाणीपाळ्याचे नियोजन करण्यात येते. यासाठी लहान-मोठे १६०० किलोमीटर लांबीचे कालवे असून, त्याचे नियंत्रण करण्यासाठी केवळ २८ कालवा निरीक्षक असल्याने तीन जिल्ह्यांतील शेतकऱ्यांच्या सिंचनासाठी पाण्याचे नियोजन करताना जलसंधारण विभागाची मोठी दमछाक होत आहे. 

इसापूर धरण हे हिंगोली जिल्ह्यात असले तरी त्याचा मोठ्या प्रमाणात सिंचनासाठी फायदा नांदेड जिल्ह्यातील शेतीसाठी होतो. एकूण १ लाख ७ हजार हेक्टर क्षेत्र असून, त्यात सर्वाधिक ७३ हजार हेक्टर सिंचन नांदेड जिल्ह्यातील आहे. त्यापाठोपाठ हिंगोली जिल्ह्यातील १७ हजार तर यवतमाळ जिल्ह्यातील १६ हजार हेक्टर सिंचनासाठी पाणी सोडले जाते. इसापूर धरणांतर्गत मुख्य उजवा कालवा १४० किलोमीटर तर डावा कालवा ८४ किलोमीटर आहे. याशिवाय मेन कॅनॉल, ब्रँच कॅनॉल, कालवा, चाऱ्या अशी तब्बल १६०० किलोमीटर लांबीचे कालवे आहेत. दोन्ही हंगामासाठी पाणीपाळ्याचे नियोजन करून वेळेवर पाणी सोडणे आणि पाणीपट्टीची वसुली करणे, ही कामे जलसंधारण विभागाला करावी लागतात.

उर्ध्व पैनगंगा प्रकल्पांतर्गत ५८२ पैकी ६४२ पदे रिक्तउर्ध्व पैनगंगा प्रकल्पांतर्गत विविध एकूण ५८२ पदांसाठी मंजुरी आहे. तर त्यापैकी केवळ १२० कार्यरत पदे असून, तब्बल ४६२ पदे रिक्त आहेत. त्यामुळे बोटावर मोजण्याइतक्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना जलसंधारण विभागाचा गाडा हाकावा लागत असल्याची स्थिती आहे. त्यामुळे नियोजन करणे आणि पाणीपट्टी वसुली करणे, यासाठी नाकीनऊ येत आहे.

फिल्डवरील मंजूर आणि रिक्त पदे अशीउपकार्यकारी अभियंता मंजूर १, रिक्त १, उपविभागीय अभियंता मंजूर ७, रिक्त ६, शाखा अभियंता मंजूर ४०, रिक्त २६, स्था. सहायक अभियंता मंजूर ३२, रिक्त २७, दप्तर कारकून मंजूर ५१ रिक्त, ४४, कालवा निरीक्षक मंजूर १६०, रिक्त १३२, मोजणीदार मंजूर ८०, रिक्त ७०, कालवा चौकीदार मंजूर ६० आणि रिक्त ५०, अशी स्थिती आहे. त्यामुळे फिल्डवरील कामे करण्यासाठी उपलब्ध कर्मचाऱ्यांना मोठी कसरत करावी लागते आहे.

२०२३-२४ मध्ये ३ कोटी ४५ लाख पाणीपट्टी वसुलीशेतकऱ्यांना दिलेल्या पाण्याची पाणीपट्टी आकारली जाते; पण कर्मचारी अपुरे असल्याने वसुलीवर त्याचा परिणाम होते. मागील तीन वर्षांत २०२१-२२ मध्ये ३ कोटी १५ लाख रुपये, २०२२-२३ मध्ये २ कोटी ९५ लाख तर २०२३-२४ या वर्षात ३ कोटी ४५ लाख रुपये इतकी पाणीपट्टी वसुली झालेली आहे.

लवकरच नियुक्तीजलसंपदा विभागाकडून नवीन भरती प्रक्रिया सुरू आहे. येत्या रब्बी हंगामाच्या आवर्तनापूर्वी कर्मचाऱ्यांची नियुक्ती होईल.-अभय जगताप, कार्यकारी अभियंता, जलसंपदा विभाग, नांदेड

टॅग्स :NandedनांदेडWaterपाणीIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प