शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

आता आम्ही शेती करू... 5 एकर जमीन मिळाल्याचा आनंद, पतीच्या आठवणीने वीरपत्नी भावूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2019 22:35 IST

सीमारेषेवर लढत असताना घरातील करता पुरुष गमावल्यानंतर कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न निर्माण होतो.

नांदेड - शहीद जवानांच्या कुटुंबीयांना मदत म्हणून 5 एकर जमीन मोफत देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला होता. नांदेड जिल्ह्यातील शहीद संभाजी कदम यांच्या कुटुंबियांना याचा पहिला लाभ मिळाला आहे. काश्मीरच्या सीमेवर तैनात असताना संभाजी कदम शहीद झाले होते. त्यांच्या पाठीमागे आई, वडील, पत्नी आणि मुलगी असा परिवार आहे. या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी म्हणून सरकारच्या निर्णयाप्रमाणे कदम कुटुबीयांना 5 एकर जमिन देण्यात आली. 

सीमारेषेवर लढत असताना घरातील करता पुरुष गमावल्यानंतर कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न निर्माण होतो. तसेच त्या शहीदाच्या पत्नी आणि मुलांचा सांभाळ हाही चिंतेचा विषय ठरतो. राज्य सरकारने ही बाब लक्षात घेऊनच 28 जून 2018 रोजी महाराष्ट्रातील शहिदांच्या कुटुंबाला 5 एकर शेतीयोग्य जमीन मोफत देण्याचा निर्णय घेतला होता. नांदेड जिल्हा प्रशासनाने याची तात्काळ अमलबजावणी करून शहीद संभाजी कदम यांच्या परिवाराला 5 एकर शेतीयोग्य सरकारी जमीन 'खरबी' या गावात मोफत दिली आहे. सरकारच्या या योजनेमुळे आपणास 5 एकर जमीन मिळाल्याने कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न मार्गी लागलं. आता आम्ही या जमिनीवर शेती करू असे वीरपत्नी शीतल संभाजी कदम यांनी म्हटलंय. तर आपल्या गावातील शासकीय जमीन एका वीरपत्नीला मिळाल्याचा आनंदही गावकऱ्यांनी व्यक्त केला. यापर्वी नांदेड-वाघाला महापालिकेकडून शहीद कदम कुटुबीयांना 11 लाख रुपयांचा मदत निधी देण्यात आला आहे. 

दरम्यान, जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी लढताना नांदेडचे सुपुत्र संभाजी यशवंत कदम यांना वीरमरण प्राप्त झाले होते. 29 नोव्हेंबर 2016 रोजी सीमारेषेवर ते शहीद झाले होते. नांदेडच्या लोहा तालूक्यातील जानापुरी गावचे ते रहिवासी आहेत. त्यांच्यामागे आई-वडील,पत्नी, तीन वर्षाची कन्या आणि दोन विवाहित बहिणी असा परिवार आहे.  

टॅग्स :MartyrशहीदNandedनांदेडFarmerशेतकरी