शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
7
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
8
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
9
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
10
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
11
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
12
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
13
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
14
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
15
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
16
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
17
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
18
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
19
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
20
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या

आता आम्ही शेती करू... 5 एकर जमीन मिळाल्याचा आनंद, पतीच्या आठवणीने वीरपत्नी भावूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2019 22:35 IST

सीमारेषेवर लढत असताना घरातील करता पुरुष गमावल्यानंतर कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न निर्माण होतो.

नांदेड - शहीद जवानांच्या कुटुंबीयांना मदत म्हणून 5 एकर जमीन मोफत देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला होता. नांदेड जिल्ह्यातील शहीद संभाजी कदम यांच्या कुटुंबियांना याचा पहिला लाभ मिळाला आहे. काश्मीरच्या सीमेवर तैनात असताना संभाजी कदम शहीद झाले होते. त्यांच्या पाठीमागे आई, वडील, पत्नी आणि मुलगी असा परिवार आहे. या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी म्हणून सरकारच्या निर्णयाप्रमाणे कदम कुटुबीयांना 5 एकर जमिन देण्यात आली. 

सीमारेषेवर लढत असताना घरातील करता पुरुष गमावल्यानंतर कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न निर्माण होतो. तसेच त्या शहीदाच्या पत्नी आणि मुलांचा सांभाळ हाही चिंतेचा विषय ठरतो. राज्य सरकारने ही बाब लक्षात घेऊनच 28 जून 2018 रोजी महाराष्ट्रातील शहिदांच्या कुटुंबाला 5 एकर शेतीयोग्य जमीन मोफत देण्याचा निर्णय घेतला होता. नांदेड जिल्हा प्रशासनाने याची तात्काळ अमलबजावणी करून शहीद संभाजी कदम यांच्या परिवाराला 5 एकर शेतीयोग्य सरकारी जमीन 'खरबी' या गावात मोफत दिली आहे. सरकारच्या या योजनेमुळे आपणास 5 एकर जमीन मिळाल्याने कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न मार्गी लागलं. आता आम्ही या जमिनीवर शेती करू असे वीरपत्नी शीतल संभाजी कदम यांनी म्हटलंय. तर आपल्या गावातील शासकीय जमीन एका वीरपत्नीला मिळाल्याचा आनंदही गावकऱ्यांनी व्यक्त केला. यापर्वी नांदेड-वाघाला महापालिकेकडून शहीद कदम कुटुबीयांना 11 लाख रुपयांचा मदत निधी देण्यात आला आहे. 

दरम्यान, जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी लढताना नांदेडचे सुपुत्र संभाजी यशवंत कदम यांना वीरमरण प्राप्त झाले होते. 29 नोव्हेंबर 2016 रोजी सीमारेषेवर ते शहीद झाले होते. नांदेडच्या लोहा तालूक्यातील जानापुरी गावचे ते रहिवासी आहेत. त्यांच्यामागे आई-वडील,पत्नी, तीन वर्षाची कन्या आणि दोन विवाहित बहिणी असा परिवार आहे.  

टॅग्स :MartyrशहीदNandedनांदेडFarmerशेतकरी