शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB चा 'विराट' विजय! प्ले ऑफच्या शर्यतीत इतरांच्या जीवावर उभे, पण PBKS ला बाहेर फेकले
2
वैजयंतीमाला, चिरंजीवी यांच्यासह १३२ विजेत्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पद्म पुरस्कार प्रदान
3
गंमत-जंमत केली तर खपवून घेणार नाही, मीच बंदोबस्त करेन; अजित पवारांनी दिला सज्जड दम
4
सेनेगलमध्ये ८५ प्रवाशांनी भरलेले विमान धावपट्टीवरून घसरले, लागली आग; मोठी दुर्घटना टळली!
5
रायली रुसोने फिफ्टी मारून बॅट उंचावली, विराट कोहलीने विकेट पडताच खोड काढली
6
भारतीय प्रवाशांनी भरलेलं विमान या देशानं माघारी पाठवलं! नेमकं काय घढलं? सरकारनं सांगितलं
7
जंगल सफारीला निघाला क्रिकेटचा देव! Sachin Tendulkar ने शेअर केले जिम कॉर्बेट नॅशनल पार्कमधील निसर्गरम्य Photos
8
मुंबईची लोकसभा निवडणूक आता भारत-पाकिस्तान लढाई झालेली आहे; भाजपाचे मविआवर टीकास्त्र
9
स्ट्राइक रेटवरून विराट कोहलीची अप्रत्यक्षपणे पुन्हा गावस्करांना कोपरखळी, म्हणाला...  
10
मतदान झालं, बारामतीत लीड कोणाला?; सुनेत्रा पवारांच्या विजयाबद्दल अजित पवार म्हणाले...
11
विराट कोहलीला शतकाची हुलकावणी, पण RCB ची आतषबाजी; PBKS समोर २४२ धावांचे लक्ष्य
12
यशाची गॅरंटी; 'पुष्य नक्षत्र' असेल PM मोदींसाठी खास, 'या' दिवशी उमेदवारी अर्ज भरणार...
13
शिवसेना नेते सुरेशदादा जैन यांचा उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
14
"खलिस्तानवर नियंत्रण ठेवण्याची गरज", ब्रिटनच्या NSA सोबत अजित डोवालांची चर्चा
15
ही निवडणूक राहुल गांधी vs नरेंद्र मोदी अन् जिहाद विरुद्ध...; अमित शाह यांचा मोठा हल्ला
16
PBKS vs RCB सामन्यात गारांचा पाऊस! सामना झालाच नाही तर कोण होईल 'गार'? चाहत्यांची वाढलीय चिंता
17
"अदानी, अंबानींची चौकशी करा; सत्य बाहेर येईल"; पंतप्रधान मोदींच्या टीकेवर काँग्रेसकडून पलटवार
18
धक्कादायक! चार दिवसांत दोन मातांनी गमावले प्राण, अहेरीत आरोग्यसेवेचा बोजवारा
19
तुफान राडा अन् लाथा-बुक्क्यांची जुगलबंदी! बसच्या दरवाज्यात दोन महिलांमध्ये तुंबळ हाणामारी (Video)
20
अब की बार, मतदान जोरदार!... कोल्हापुरातील वाढलेला टक्का कुणाला देणार धक्का? 

कृषी कार्यालयाकडून परमिट मिळेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2019 12:17 AM

तालुक्यात अजून पावसाने हजेरी लावली नसली तरीही शेतकऱ्यांनी मशागतीची कामे पूर्ण करुन शेती पेरणीसाठी सज्ज ठेवली आहे. कृषी दुकानात बी-बियाणे दाखल झाले असले तरीही महामंडळाकडून एक महिन्यापूर्वी दाखल सबसीडीच्या बियाणांकडे शेतकऱ्यांचे लक्ष आहे, मात्र, कृषी कार्यालय मात्र परमीट देण्यास तयार नसल्याने शेतकरी संताप व्यक्त करीत आहेत.

ठळक मुद्देहिमायतनगर तालुक्याचे चित्र महामंडळाचे बियाणे महिनाभरापासून दाखल, संबंधितांच्या दुर्लक्षाने

कोंडबा कवडे।

हिमायतनगर : तालुक्यात अजून पावसाने हजेरी लावली नसली तरीही शेतकऱ्यांनी मशागतीची कामे पूर्ण करुन शेती पेरणीसाठी सज्ज ठेवली आहे. कृषी दुकानात बी-बियाणे दाखल झाले असले तरीही महामंडळाकडून एक महिन्यापूर्वी दाखल सबसीडीच्या बियाणांकडे शेतकऱ्यांचे लक्ष आहे, मात्र, कृषी कार्यालय मात्र परमीट देण्यास तयार नसल्याने शेतकरी संताप व्यक्त करीत आहेत.सबीसीडीचे परमीट महामंडळकडून अजून आले नाहीत, असे एकमेव उत्तर संबंधितांकडून शेतकऱ्यांना दिले जात आहे. यात मोठी ‘गोम’ असल्याचे शेतक-यांचे म्हणणे आहे. कृषी केंद्र चालक, महामंडळाच्या अधिकाऱ्यांमध्ये ‘मिलीभगत’ असल्याचा आरोप शेतकऱ्यांचा आहे.गतवर्षी शेतकऱ्यांच्या पदरी बोगस बियाणे पडल्याने मोठे नुकसान झाले होते. पाऊसही कमी पडल्याने उत्पादनात कमालीची घट झाली. यावेळी चांगल्या पावसाच्या प्रतीक्षेत शेतकरी असून, पाऊस पडला की, पेरणीच्या कामाला लागण्याचे संकेत शेतकऱ्यांनी दिले आहेत.शेतकऱ्यांना सबसीडीचा लाभ मिळण्यासाठी महामंडळाच्या वतीने कृषी कार्यालयात परमीट बुक पाठवून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे. यासंदर्भात जबाबदार कुणीही बोलण्यास तयार नाही. नांदेड जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाच्या वरिष्ठांनीच आता या कामी पुढाकार घ्यावा, अशी मागणी होत आहे़महांडळकडून अजून आले नाहीत, असे एकमेव उत्तर संबंधितांकडून शेतकऱ्यांना दिले जात आहे. यात मोठी ‘गोम’ असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. कृषी केंद्र चालक, महामंडळाच्या अधिकाऱ्यांमध्ये ‘मिलीभगत’ असल्याचा आरोप शेतकऱ्यांचा आहे. महिनाभरापूर्वीच महामंडळाचे बियाणे दाखल झालेले असताना परमीट कसे काय आले नाही? असा सवाल शेतकरी करीत आहेत.महिनाभरापूर्वीच महामंडळाचे बियाणे दाखल झालेले असताना परमीट कसे काय आले नाही? असा सवाल शेतकरी करीत आहेत. परमीट नसल्याचे सांगून काही दुकानदार बियाणांची चढ्या दराने विक्री करीत असल्याचा आरोप आहे.हिमायतनगरातील काही व्यापाऱ्यांनी गोदामत बोगस खताचा भरणा केल्याच्या अफवेनेही काही दिवसापूर्वी जोर धरला होता. मात्र ‘मांजराच्या गळ्यात घंटा कोण बांधणार’ या युक्तीप्रमाणे पुढे काहीही झाले नाही. त्यामुळे कृषी केंद्रातील खते, बी-बियाणे, औषधांचे सॅपल तपासण्याची गरज शेतकरी व्यक्त करीत आहेत.

टॅग्स :NandedनांदेडFarmerशेतकरीagricultureशेती