शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचार समितीचा राजीनामा मागे घेतोय; काँग्रेस नेते नसीम खान यांची मोठी घोषणा
2
मोठी दुर्घटना! बॉल समजून बॉम्ब उचलला, ब्लास्टमध्ये लहान मुलाचा मृत्यू, 3 जखमी
3
Narendra Modi : "भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
4
मराठी उमेदवाराचा प्रचार करण्यास गुजराती सोसायटीत विरोध; ठाकरे गटाचा दावा, काय घडलं?
5
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी कन्हैया कुमारांनी केले हवन, सर्व धर्माच्या गुरूंचे घेतले आशीर्वाद! 
6
T20 World Cup वर दहशतवादी हल्ल्याचे सावट; उत्तर पाकिस्तानमधून आली धमकी
7
रथावर स्वार मुख्यमंत्र्यांनी गदा उंचावली, काँग्रेसमधून भाजपात आलेल्या आमदाराच्या डोक्याला लागली, मग...  
8
संत मंडळींमध्ये ‘वडील’, उत्तर भारतात मोठी ख्याती; ‘अशी’ आहे संत गोरोबा काकांची महती
9
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी
10
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
11
Nexon EV Review: टाटा नेक्सॉन ईव्हीच्या रेंजने चकीत केले...; दररोजचे गाव ते पुण्यातील ऑफिसचे अंतर, कशी वाटली...
12
Adani Group Stocks SEBI: अदानी समूहाचे शेअर्स आपटले, SEBI च्या नोटिसनंतर स्टॉक्समध्ये घसरण कायम
13
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
14
१५ हजार सॅलरी, १० हजारांची लाच अन् घरी सापडले ३० कोटी; वाचा इनसाईड स्टोरी
15
Video: कुटुंबासह अयोध्येत पोहोचला प्रसाद ओक; रामलला चरणी झाला नतमस्तक
16
स्वामी समर्थ पुण्यतिथी: स्वामीपूजनानंतर आवर्जून म्हणा, श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती
17
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
18
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
19
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
20
SBI मधून २० वर्षांसाठी ₹३० लाखांचं घ्याल Home Loan? किती असेल EMI, किती द्याल व्याज, पाहा

नऊ वर्षांपूर्वीच्या पाणीपुरवठा योजनेतील गैरव्यवहारवर आजी-माजी सरपंचावर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2018 4:18 PM

नऊ वर्षांपूर्वी केलेल्या पाणीपुरवठा योजनेत आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी माजी सरपंच अरविंद ठक्करवाड व विद्यमान प्रभारी सरपंच शेषराव लंके यांच्यावर अजामिनपात्र गुन्हा दाखल करण्याचे आदेश बिलोली कनिष्ठ न्यायालयाचे न्या.आर आर पत्की यांनी दिले आहेत.

नांदेड : नऊ वर्षांपूर्वी केलेल्या पाणीपुरवठा योजनेत आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी माजी सरपंच अरविंद ठक्करवाड व विद्यमान प्रभारी सरपंच शेषराव लंके यांच्यावर अजामिनपात्र गुन्हा दाखल करण्याचे आदेश बिलोली कनिष्ठ न्यायालयाचे न्या.आर आर पत्की यांनी दिले आहेत.

बिलोली तालुक्यातील कासराळी येथे २००९ मध्ये भारत निर्माणअंतर्गत पाणीपुरवठा योजना हाती घेण्यात आली. दहा टक्के लोकसहभागातून रक्कम व नव्वद टक्के  रक्कम राज्य शासनाकडून मंजूर झाली़ सदरील योजना जवळपास ७५ लाखांची होती. पाणीपुरवठा समिती व जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाने जिगळा या गावातून योजनेचे काम हाती घेतले. पाणीपुरवठा योजनेचे काम काही प्रमाणात पूर्ण झाले. कालांतराने कामासाठी अनुदान कमी पडले व विद्युत पुरवठा रोहित्र बसवण्यासाठी मोठी अडचण आली. परिणामी ही योजना सुरूच झाली नाही. 

यासंबंधी माजी जिल्हा परिषद सदस्य संग्राम हायगले यांनी वरिष्ठांकडे तक्रार केली. ज्यात किनवटच्या समितीने काही प्रमाणात पाणीपुरवठा समितीवर ताशेरे ओढले आहेत. मध्यंतरी सार्वत्रिक निवडणुका झाल्या, ज्यात ललिता हायगले या कासराळीच्या सरपंच झाल्या. त्यांच्याच काळात वाढीव अनुदानासाठी प्रयत्नही झाले; पण नंतर ठक्करवाड व हायगले यांच्यात राजकीय वैर सुरू झाले.

कासराळीत राजकीय घडामोडी झाल्या. तत्कालीन पाणीपुरवठा  समितीने या योजनेत बँकेतून परस्पर गैरव्यवहार केल्याची तक्रार संग्राम हायगले यांनी जानेवारी २०१८ मध्ये बिलोली पोलीस व नांदेड पोलीस अधीक्षकांकडे केली. बिलोली पोलिसांनी तांत्रिक समितीकडून अहवाल मागवला व तक्रार निकाली काढली; पण पोलिसांच्या या अहवालावर समाधान न झाल्याने हायगले यांनी बिलोली न्यायालयात धाव घेत पुरावे व अहवाल दाखल केला. मागच्या आठ महिन्यांत झालेल्या युक्तिवादानंतर फिर्यादी अर्जदार  संग्राम हायगले यांचा अर्ज मंजूर करून वेगवेगळ्या गुन्ह्यांखाली तत्कालीन सरपंच अरविंद ठक्करवाड व प्रभारी सरपंच तथा पाणीपुरवठा सचिव शेषराव लंके या दोघांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिले. त्यानुसार बिलोली पोलिसांनी बुधवारी अंमलबजावणी केल्याचे पोलीस निरीक्षक भगवान धबडगे यांनी सांगितले.

दरम्यान, जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाचा अहवाल, यापूर्वी पोलिसांनी केलेली  चौकशी  व तपास तसेच पाणीपुरवठा समितीचा अहवाल, कामाची सद्य:स्थिती आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांचे जबाब घेण्याचे काम सुरू करून न्यायालयात सविस्तर अहवाल सादर करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

राजकीय सूडबुद्धीने न्यायालयात तक्रारनऊ वर्षांपूर्वीचे हे प्रकरण असून याबाबत यापूर्वी फिर्यादीच्या भावाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण केले तेव्हा विशेष समितीने चौकशी केली व अहवाल दिला. अनुदान कमी पडल्याने शासनाकडे हायगले यांच्याच सरपंचपदाच्या काळात मागणीचा ठराव झाला. गतवर्षी  सरपंच ललिता हायगले यांच्यावर अविश्वास ठराव आणल्यानंतर त्यांना पदावरून पायउतार व्हावे लागले. हाच द्वेष मनात ठेवून राजकीय सूडबुद्धीने न्यायालयात तक्रार करण्यात आली. सत्य काय? आहे ते जगासमोरच आहे. चौकशी समितीचा संपूर्ण अहवाल तयार आहे -लक्ष्मण ठक्करवाड, जिल्हा परिषद सदस्य़

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNandedनांदेडCourtन्यायालय