शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

नऊ वर्षांपूर्वीच्या पाणीपुरवठा योजनेतील गैरव्यवहारवर आजी-माजी सरपंचावर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2018 16:19 IST

नऊ वर्षांपूर्वी केलेल्या पाणीपुरवठा योजनेत आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी माजी सरपंच अरविंद ठक्करवाड व विद्यमान प्रभारी सरपंच शेषराव लंके यांच्यावर अजामिनपात्र गुन्हा दाखल करण्याचे आदेश बिलोली कनिष्ठ न्यायालयाचे न्या.आर आर पत्की यांनी दिले आहेत.

नांदेड : नऊ वर्षांपूर्वी केलेल्या पाणीपुरवठा योजनेत आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी माजी सरपंच अरविंद ठक्करवाड व विद्यमान प्रभारी सरपंच शेषराव लंके यांच्यावर अजामिनपात्र गुन्हा दाखल करण्याचे आदेश बिलोली कनिष्ठ न्यायालयाचे न्या.आर आर पत्की यांनी दिले आहेत.

बिलोली तालुक्यातील कासराळी येथे २००९ मध्ये भारत निर्माणअंतर्गत पाणीपुरवठा योजना हाती घेण्यात आली. दहा टक्के लोकसहभागातून रक्कम व नव्वद टक्के  रक्कम राज्य शासनाकडून मंजूर झाली़ सदरील योजना जवळपास ७५ लाखांची होती. पाणीपुरवठा समिती व जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाने जिगळा या गावातून योजनेचे काम हाती घेतले. पाणीपुरवठा योजनेचे काम काही प्रमाणात पूर्ण झाले. कालांतराने कामासाठी अनुदान कमी पडले व विद्युत पुरवठा रोहित्र बसवण्यासाठी मोठी अडचण आली. परिणामी ही योजना सुरूच झाली नाही. 

यासंबंधी माजी जिल्हा परिषद सदस्य संग्राम हायगले यांनी वरिष्ठांकडे तक्रार केली. ज्यात किनवटच्या समितीने काही प्रमाणात पाणीपुरवठा समितीवर ताशेरे ओढले आहेत. मध्यंतरी सार्वत्रिक निवडणुका झाल्या, ज्यात ललिता हायगले या कासराळीच्या सरपंच झाल्या. त्यांच्याच काळात वाढीव अनुदानासाठी प्रयत्नही झाले; पण नंतर ठक्करवाड व हायगले यांच्यात राजकीय वैर सुरू झाले.

कासराळीत राजकीय घडामोडी झाल्या. तत्कालीन पाणीपुरवठा  समितीने या योजनेत बँकेतून परस्पर गैरव्यवहार केल्याची तक्रार संग्राम हायगले यांनी जानेवारी २०१८ मध्ये बिलोली पोलीस व नांदेड पोलीस अधीक्षकांकडे केली. बिलोली पोलिसांनी तांत्रिक समितीकडून अहवाल मागवला व तक्रार निकाली काढली; पण पोलिसांच्या या अहवालावर समाधान न झाल्याने हायगले यांनी बिलोली न्यायालयात धाव घेत पुरावे व अहवाल दाखल केला. मागच्या आठ महिन्यांत झालेल्या युक्तिवादानंतर फिर्यादी अर्जदार  संग्राम हायगले यांचा अर्ज मंजूर करून वेगवेगळ्या गुन्ह्यांखाली तत्कालीन सरपंच अरविंद ठक्करवाड व प्रभारी सरपंच तथा पाणीपुरवठा सचिव शेषराव लंके या दोघांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिले. त्यानुसार बिलोली पोलिसांनी बुधवारी अंमलबजावणी केल्याचे पोलीस निरीक्षक भगवान धबडगे यांनी सांगितले.

दरम्यान, जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाचा अहवाल, यापूर्वी पोलिसांनी केलेली  चौकशी  व तपास तसेच पाणीपुरवठा समितीचा अहवाल, कामाची सद्य:स्थिती आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांचे जबाब घेण्याचे काम सुरू करून न्यायालयात सविस्तर अहवाल सादर करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

राजकीय सूडबुद्धीने न्यायालयात तक्रारनऊ वर्षांपूर्वीचे हे प्रकरण असून याबाबत यापूर्वी फिर्यादीच्या भावाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण केले तेव्हा विशेष समितीने चौकशी केली व अहवाल दिला. अनुदान कमी पडल्याने शासनाकडे हायगले यांच्याच सरपंचपदाच्या काळात मागणीचा ठराव झाला. गतवर्षी  सरपंच ललिता हायगले यांच्यावर अविश्वास ठराव आणल्यानंतर त्यांना पदावरून पायउतार व्हावे लागले. हाच द्वेष मनात ठेवून राजकीय सूडबुद्धीने न्यायालयात तक्रार करण्यात आली. सत्य काय? आहे ते जगासमोरच आहे. चौकशी समितीचा संपूर्ण अहवाल तयार आहे -लक्ष्मण ठक्करवाड, जिल्हा परिषद सदस्य़

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNandedनांदेडCourtन्यायालय