शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

राज्यात मुख्यमंत्री काँग्रेसचाच होणार; प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा पुनरुच्चार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 17:17 IST

जिथे जातीयवाद झाला त्याचा परिणाम त्या देशास भाेगावा लागला आहे.

ठळक मुद्देदेशाचे स्वातंत्र्य काँग्रेसच वाचवू शकतो.राज्यात काँग्रेसचा झेंडा फडकवू

नांदेड : भाजपकडून जातीयवादी राजकारण केले जात आहे. त्यामुळे सर्व समाजाने भाजपचे स्वार्थी राजकारण हाणून पाडावे. काँग्रेसची ( Congress ) विचारसरणी सर्व समाजाला न्याय देणारी आहे. त्यामुळे आगामी काळात मुख्यमंत्री काँग्रेसचाच होणार असल्याचा पुनरुच्चार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ( Nana Patole) यांनी केला.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त काँग्रेसच्या वतीने ‘व्यर्थ न हो बलिदान, चलो बचाओ संविधान’ या कार्यक्रमानिमित्त कुसुम सभागृहात मंगळवारी स्वातंत्र्यसैनिकांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाला महाराष्ट्राचे प्रभारी एच. के. पाटील, पालकमंत्री अशोक चव्हाण, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख, विजय वड्डेट्टीवार, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, अस्लम शेख, माजी मंत्री डी. पी. सावंत, सचिव संपक कुमार, माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे, शिवाजीराव मोघे आदींची उपस्थिती होती. 

पटोले म्हणाले, ज्यांचा देशाच्या स्वातंत्र्यप्राप्तीत कोणताच सहभाग नव्हता. त्यांनी धर्माच्या नावावर देश निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मात्र जिथे जातीयवाद झाला त्याचा परिणाम त्या देशास भाेगावा लागला आहे. देशाचे स्वातंत्र्य काँग्रेसच वाचवू शकतो. सर्वांनी एकत्र येत भाजपचे स्वार्थी राजकारण हाणून पाडावे, असेही ते म्हणाले.

राज्यात काँग्रेसचा झेंडा फडकवू -अमित देशमुखनाना पटोले यांची या कार्यक्रमाची संकल्पना असून पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी सर्वांना एकत्र आणले आहे. काँग्रेसच्या कार्यक्रमातून कै. डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या विचारांचा वारसा पुढे नेऊन नांदेडहून घेतलेली प्रेरणा, ऊर्जा आणि शक्तीच्या बळावर राज्यात काँग्रेसचा झेंडा फडकवू आणि राज्यात कॉंग्रेसचाच मुख्यमंत्री करु, असे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख ( Amit Deshmukh ) यांनी केले.

टॅग्स :Nana Patoleनाना पटोलेcongressकाँग्रेसAmit Deshmukhअमित देशमुखNandedनांदेड