शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

राज्यात मुख्यमंत्री काँग्रेसचाच होणार; प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा पुनरुच्चार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 17:17 IST

जिथे जातीयवाद झाला त्याचा परिणाम त्या देशास भाेगावा लागला आहे.

ठळक मुद्देदेशाचे स्वातंत्र्य काँग्रेसच वाचवू शकतो.राज्यात काँग्रेसचा झेंडा फडकवू

नांदेड : भाजपकडून जातीयवादी राजकारण केले जात आहे. त्यामुळे सर्व समाजाने भाजपचे स्वार्थी राजकारण हाणून पाडावे. काँग्रेसची ( Congress ) विचारसरणी सर्व समाजाला न्याय देणारी आहे. त्यामुळे आगामी काळात मुख्यमंत्री काँग्रेसचाच होणार असल्याचा पुनरुच्चार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ( Nana Patole) यांनी केला.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त काँग्रेसच्या वतीने ‘व्यर्थ न हो बलिदान, चलो बचाओ संविधान’ या कार्यक्रमानिमित्त कुसुम सभागृहात मंगळवारी स्वातंत्र्यसैनिकांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाला महाराष्ट्राचे प्रभारी एच. के. पाटील, पालकमंत्री अशोक चव्हाण, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख, विजय वड्डेट्टीवार, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, अस्लम शेख, माजी मंत्री डी. पी. सावंत, सचिव संपक कुमार, माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे, शिवाजीराव मोघे आदींची उपस्थिती होती. 

पटोले म्हणाले, ज्यांचा देशाच्या स्वातंत्र्यप्राप्तीत कोणताच सहभाग नव्हता. त्यांनी धर्माच्या नावावर देश निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मात्र जिथे जातीयवाद झाला त्याचा परिणाम त्या देशास भाेगावा लागला आहे. देशाचे स्वातंत्र्य काँग्रेसच वाचवू शकतो. सर्वांनी एकत्र येत भाजपचे स्वार्थी राजकारण हाणून पाडावे, असेही ते म्हणाले.

राज्यात काँग्रेसचा झेंडा फडकवू -अमित देशमुखनाना पटोले यांची या कार्यक्रमाची संकल्पना असून पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी सर्वांना एकत्र आणले आहे. काँग्रेसच्या कार्यक्रमातून कै. डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या विचारांचा वारसा पुढे नेऊन नांदेडहून घेतलेली प्रेरणा, ऊर्जा आणि शक्तीच्या बळावर राज्यात काँग्रेसचा झेंडा फडकवू आणि राज्यात कॉंग्रेसचाच मुख्यमंत्री करु, असे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख ( Amit Deshmukh ) यांनी केले.

टॅग्स :Nana Patoleनाना पटोलेcongressकाँग्रेसAmit Deshmukhअमित देशमुखNandedनांदेड