शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोठी बातमी! दिल्लीत लाल किल्ल्याजवळ भीषण स्फोट, 8 जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
2
'त्या' जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवार, शीतल तेजवानींना पोलिसांकडून क्लीन चिट
3
भयानक कोसळणार ...! मी १९७१ पासून सोने खरेदी करतोय, पण...; रॉबर्ट कियोसाकी यांच्या दाव्याने खळबळ 
4
भारताच्या शेजारी देशांत भरतो 'नवरीचा बाजार', खरेदी करण्यासाठी चीनमधून येतात लोक! काय आहे प्रकार?
5
राष्ट्रवादीने हटवले तरी रुपाली ठोंबरे पाटील 'प्रवक्त्या'च; पोस्ट करत म्हणाल्या, 'अजित पवारांना भेटून...'
6
ताजमहालसमोर साखरपुडा...! दोनवेळा ऑस्ट्रेलियाला वर्ल्डकप जिंकविणारी भारताची सून होणार; कोण आहे ती...
7
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...
8
"मी तुझ्या बापाला मारलं, मृतदेह सुटकेसमध्ये..."; बायकोने नवऱ्याला संपवलं, लेकीला केला फोन
9
Honeymoon Destinations : गुलाबी थंडीत रोमँटिक हनिमून प्लॅन करताय? भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट!
10
"पंक्चर बनवणारे येऊन...!", बिहारमध्ये योगी आदित्यनाथांची तुफान बॅटिंग; विरोधकांवर थेट हल्लाबोल
11
"जबरदस्तीनं मिठीत घ्यायचा, शारीरिक जवळीक साधायचा, अन्..."; महिला क्रिकेटरच्या आरोपांनी खळबळ
12
धर्मेंद्र यांच्या तब्येतीबद्दल कळताच हेमा मालिनी रुग्णालयात पोहोचल्या, म्हणाल्या, "आम्ही सगळेच..."
13
मुंबईत काँग्रेस स्वबळावर लढणार तर उद्धव ठाकरेंसोबत युतीआधीच मनसेने 'इतक्या' जागांची केली तयारी
14
'या' मुस्लिम देशाची अमेरिकेशी वाढतेय जवळीक! ब्लॅकलिस्टमधून बाहेर पडताच, ८० वर्षांनी अमेरिकेत एन्ट्री
15
'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजना बंद होणार? एकनाथ शिंदेंकडून मोठी घोषणा, e-KYC देखील...
16
धक्कादायक! बाथरूममध्ये आंघोळीसाठी गेली, पण तासभर बाहेरच नाही आली; दरवाजा तोडला तर...
17
ब्युटी आणि फॅशन क्षेत्रातील 'हा' शेअर्स ५२ आठवड्यांच्या उच्चांकाजवळ, वर्षात ५७% रिटर्न, अजूनही संधी?
18
२ डॉक्टर अन् मशिदीच्या इमामासह ७ जणांना अटक, 'व्हाइट कॉलर' दहशतवाद्यांचा पर्दाफाश, पोलिसांनी केले धक्कादायक खुलासे
19
कर्मानेच अडकले! करायला गेला एक अन्.. दहशतवादी अकील आणि मुजम्मिल यांचा 'असा' झाला पर्दाफाश!
20
Jalgaon Accident: कार दुभाजकावर धडकून पेटली, पत्नीचा होरपळून मृत्यू, पती गंभीर जखमी 

कंधार तालुक्यातील शेतकऱ्यांचा नवपिकाचा प्रयोग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 04:31 IST

कंधार : निसर्गाचा लहरीपणा, खरीप हंगामाने दिलेला दगा अन् बिघडलेले शेतीचे अर्थकारण. यातून नवीन पीक प्रयोग घेण्याचा प्रयत्न शेतकरी ...

कंधार : निसर्गाचा लहरीपणा, खरीप हंगामाने दिलेला दगा अन् बिघडलेले शेतीचे अर्थकारण. यातून नवीन पीक प्रयोग घेण्याचा प्रयत्न शेतकरी करत आहेत. तालुक्यात १५० एकरांवर शेतकऱ्यांनी बटाटा लागवड केली आहे. अवघ्या २० गुंठे जमिनीत बटाटा लागवड करून पंढरी भोसीकर यांनी १ लाख ५० हजारांचे उत्पन्न काढून आर्थिक बळकटीकरण करण्याचा संकल्प केला आहे. बटाटा लागवडीने शिवार हिरवेगार झाले असून, लक्ष वेधून घेत आहे.

तालुक्यातील शेतकऱ्यांना सलग दुसऱ्या वर्षी खरीप हंगामाने दगा दिला. निसर्गाच्या लहरीपणाचा मोठा फटका बसला. तरीही शेतकरी रब्बी व इतर पीक लागवड करून आर्थिक स्त्रोत शोधत आहेत. यंदा पहिल्यांदाच बटाटा लागवड करण्याकडे शेतकऱ्यांचा कल मोठ्या प्रमाणात वाढला आहे. पेठवडज, उस्माननगर, हिप्परगा, बाभूळगाव, दाताळा, शिराढोण, संगमवाडी, पानशेवडी, तळ्याचीवाडी, भंडारकुमठ्याचीवाडी, जांभूळवाडी, बहाद्दरपुरा, नवरंगपुरा, बिजेवाडी तांडा, लालवाडी, कंधार, कंधारेवाडी, चिंचोली, आलेगाव, पानभोसी आदी गावांतील शेतकऱ्यांनी बटाटा लागवड केली आहे.

तालुक्यात सुमारे ६० हेक्टर क्षेत्रावर बटाटा लागवड झाली असल्याचे समोर आले आहे. तालुक्यात माळरान, भुसभुशीत, मध्यम प्रतीची, पाण्याचा निचरा होणाऱ्या जमिनीचे प्रमाण मोठे आहे. त्यातच उपलब्ध जलसाठा व नवीन शेती तंत्रज्ञानाची सांगड घालून उत्पन्न वाढविण्यासाठी शेतकरी सरासावला असल्याचे चित्र आहे. योग्य पाणी व्यवस्थापन, खताची मात्रा, जमिनीची निवड, लागवड व संगोपन आदींचा समन्वय साधत शेतकरी बटाटा लागवड करून आर्थिक बळकटीकडे वळला आहे. ता. कृषी अधिकारी रमेश देशमुख, मंडळ कृषी अधिकारी, कृषी सहायक आदींचे मार्गदर्शन घेऊन नवीन पीक प्रयोग केला जात आहे.

पानभोसी ता. कंधार येथील पंढरी भोसीकर यांनी २० गुंठे शेतीवर ऑक्टोबरअखेर अडीच क्विंटल बटाटे बेणे आणून लागवड केली आहे. मूग काढणीतून अपेक्षित उत्पन्न मिळाले नाही. मग हेच भूसभशीत क्षेत्र बटाटा लागवडीसाठी तयार केले. त्यावर तिफण फिरवून एका वितभर अंतराने बेणे लागवड केले. ठिबक अंथरून पाण्याची सोय केली. पोटॅश, जैविक, १८:१८ :१० खताचे मिश्रण करून खताची मात्रा दिली. एकूण १० हजार रुपये बेणे, मजुरी, खत आदी लागवडीवर खर्च केला. आणि अल्प खर्चावर अधिक मिळकत होण्यासाठी कसोशीने प्रयत्न केले जात आहेत.

साधारण तीन महिन्यांचे असलेले बटाटा पीक २० गुंठ्यांत ६० ते ७० क्विंटल निघेल, अशी एकंदरीत स्थिती असून बाजारात सध्या अडीच ते तीन हजार रु. प्रतिक्विंटल भाव आहे. त्यामुळे खर्च वजा करता दीड लाख रुपये नफा मिळण्याची अपेक्षा आहे, असे पंढरी भोसीकर यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.