शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादावरून राजनाथ सिंह यांनी चीनसमोरच केलं पाकिस्तानचं वस्त्रहरण, म्हणाले...  
2
धक्कादायक! डीजे ऑपरेटरच्या प्रेमात मुलगी आंधळी झाली, प्रियकराला घरी बोलावून आईची हत्या केली
3
प्रवाशांनी भरलेली बस पूर आलेल्या नदीत कोसळली, उत्तराखंडमध्ये भीषण अपघात
4
सर्व ऑनलाइन पासवर्ड बदला; सरकारच्या नागरिकांना सूचना, १६ अब्ज पासवर्ड हॅकर्सनी लांबविले
5
आजचे राशीभविष्य - २६ जून २०२५, या राशीच्या मंडळींना सरकारकडून लाभ होईल, धन, मान-सन्मान वाढेल
6
सरकारी नोकऱ्यांमध्ये मिळेल वाढीव आरक्षण; आठ जिल्ह्यांमधील आदिवासींना मोठा दिलासा
7
Viral Video: जीव वाचवण्यासाठी थेट बिबट्याशी भिडला, मजुराचं धाडस पाहून अंगावर येईल काटा! पाहा व्हिडीओ
8
चांदीच्या ताटात न दिलेल्या जेवणाची चर्चा जोरदार; आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा
9
वीज कमी वापरणाऱ्यांना स्वस्त दर; जास्त वापरल्यास बिलात ‘झटका’, किती युनिटपर्यंत दिलासा?
10
अहिल्यानगर हादरले! आठवीच्या विद्यार्थ्याने केला दहावीच्या विद्यार्थ्याचा खून; क्रिकेटच्या वादातून शाळेतच संपवले
11
पंचगंगा, चंद्रभागेला पूर, भीमा नदीत ६३ हजार क्युसेकचा विसर्ग सुरू; विदर्भाला पावसाचा दिलासा 
12
अग्रलेख: इराण विरुद्ध इस्रायल; युद्ध संपले, की तात्पुरते थांबले?
13
समृद्धी महामार्गावर आता २४ तास खड्डे दुरुस्तीपथक; देखभाल-दुरुस्तीचे काम कंत्राटदारामार्फत नियमित
14
जमीन सरकारी, वापरण्याचा हक्क सरकारलाच; मोघरपाड्यात मेट्रो कार शेड उभारण्याचा मार्ग मोकळा
15
‘गडकरी’ सुरू झाल्याखेरीज ‘घाणेकर’ बंद होणार नाही! ठाणे महापालिकेने मांडली स्पष्ट भूमिका
16
विशेष लेख: माझ्या मनात पाल का चुकचुकते आहे?
17
विधानसभा निकाल रद्द करण्याची मागणी फेटाळली; याचिका करून कोर्टाचा वेळ वाया घालवला : हायकोर्ट
18
लेख : मेट्रोच्या डब्यात वाढदिवस, लग्ने साजरी होतात, तेव्हा...
19
एसटी महामंडळाच्या २ हजार बसेस भंगारात; ‘एमएसटीसी’च्या माध्यमातून करण्यात येणार लिलाव
20
भरती-ओहोटीचे सर्वेक्षण वाढवणवासियांनी उधळले; आयटीडीसी पथकाला पिटाळले

कंधार तालुक्यातील शेतकऱ्यांचा नवपिकाचा प्रयोग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 04:31 IST

कंधार : निसर्गाचा लहरीपणा, खरीप हंगामाने दिलेला दगा अन् बिघडलेले शेतीचे अर्थकारण. यातून नवीन पीक प्रयोग घेण्याचा प्रयत्न शेतकरी ...

कंधार : निसर्गाचा लहरीपणा, खरीप हंगामाने दिलेला दगा अन् बिघडलेले शेतीचे अर्थकारण. यातून नवीन पीक प्रयोग घेण्याचा प्रयत्न शेतकरी करत आहेत. तालुक्यात १५० एकरांवर शेतकऱ्यांनी बटाटा लागवड केली आहे. अवघ्या २० गुंठे जमिनीत बटाटा लागवड करून पंढरी भोसीकर यांनी १ लाख ५० हजारांचे उत्पन्न काढून आर्थिक बळकटीकरण करण्याचा संकल्प केला आहे. बटाटा लागवडीने शिवार हिरवेगार झाले असून, लक्ष वेधून घेत आहे.

तालुक्यातील शेतकऱ्यांना सलग दुसऱ्या वर्षी खरीप हंगामाने दगा दिला. निसर्गाच्या लहरीपणाचा मोठा फटका बसला. तरीही शेतकरी रब्बी व इतर पीक लागवड करून आर्थिक स्त्रोत शोधत आहेत. यंदा पहिल्यांदाच बटाटा लागवड करण्याकडे शेतकऱ्यांचा कल मोठ्या प्रमाणात वाढला आहे. पेठवडज, उस्माननगर, हिप्परगा, बाभूळगाव, दाताळा, शिराढोण, संगमवाडी, पानशेवडी, तळ्याचीवाडी, भंडारकुमठ्याचीवाडी, जांभूळवाडी, बहाद्दरपुरा, नवरंगपुरा, बिजेवाडी तांडा, लालवाडी, कंधार, कंधारेवाडी, चिंचोली, आलेगाव, पानभोसी आदी गावांतील शेतकऱ्यांनी बटाटा लागवड केली आहे.

तालुक्यात सुमारे ६० हेक्टर क्षेत्रावर बटाटा लागवड झाली असल्याचे समोर आले आहे. तालुक्यात माळरान, भुसभुशीत, मध्यम प्रतीची, पाण्याचा निचरा होणाऱ्या जमिनीचे प्रमाण मोठे आहे. त्यातच उपलब्ध जलसाठा व नवीन शेती तंत्रज्ञानाची सांगड घालून उत्पन्न वाढविण्यासाठी शेतकरी सरासावला असल्याचे चित्र आहे. योग्य पाणी व्यवस्थापन, खताची मात्रा, जमिनीची निवड, लागवड व संगोपन आदींचा समन्वय साधत शेतकरी बटाटा लागवड करून आर्थिक बळकटीकडे वळला आहे. ता. कृषी अधिकारी रमेश देशमुख, मंडळ कृषी अधिकारी, कृषी सहायक आदींचे मार्गदर्शन घेऊन नवीन पीक प्रयोग केला जात आहे.

पानभोसी ता. कंधार येथील पंढरी भोसीकर यांनी २० गुंठे शेतीवर ऑक्टोबरअखेर अडीच क्विंटल बटाटे बेणे आणून लागवड केली आहे. मूग काढणीतून अपेक्षित उत्पन्न मिळाले नाही. मग हेच भूसभशीत क्षेत्र बटाटा लागवडीसाठी तयार केले. त्यावर तिफण फिरवून एका वितभर अंतराने बेणे लागवड केले. ठिबक अंथरून पाण्याची सोय केली. पोटॅश, जैविक, १८:१८ :१० खताचे मिश्रण करून खताची मात्रा दिली. एकूण १० हजार रुपये बेणे, मजुरी, खत आदी लागवडीवर खर्च केला. आणि अल्प खर्चावर अधिक मिळकत होण्यासाठी कसोशीने प्रयत्न केले जात आहेत.

साधारण तीन महिन्यांचे असलेले बटाटा पीक २० गुंठ्यांत ६० ते ७० क्विंटल निघेल, अशी एकंदरीत स्थिती असून बाजारात सध्या अडीच ते तीन हजार रु. प्रतिक्विंटल भाव आहे. त्यामुळे खर्च वजा करता दीड लाख रुपये नफा मिळण्याची अपेक्षा आहे, असे पंढरी भोसीकर यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.