शहरं
Join us  
Trending Stories
1
कराची अन् इस्लामाबादचं कनेक्शन तुटलं; भारताच्या INS विक्रांतचा पाकिस्तानवर मोठा हल्ला
2
लाहोर, सियालकोट, कराची अन् इस्लामाबादेत भारताचा हल्ला; स्फोटांनी पाकिस्तान हादरलं
3
“सैन्यावर विश्वास, देशाचा अभिमान, युद्ध नक्की जिंकू”; पाक कुरापतीवर J&Kतील नागरिकांना विश्वास
4
पाकिस्ताचे भारताच्या संपूर्ण पश्मिम सीमेवर हल्ले! भारताचेही जशास तसे प्रत्युत्तर; बघा कसा पाडला ड्रोन
5
India Pakistan War : भारताच्या प्रत्युत्तराच्या कारवाईमुळे पाकिस्तानमध्ये विध्वंस, आतापर्यंत काय-काय घडले; १० मुद्द्यांमध्ये समजून घ्या
6
पाकिस्तानचा भारतावर सायबर हल्ल्याचा डाव; 'Dance of the Hillary' व्हायरस नेमकं काय आहे?
7
रात्री उशिरापर्यंत सुरू होती धुमश्चक्री; पाकचे हल्ले भारताने हवेतच उधळले
8
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होतील; अपूर्ण कामे पूर्ण होतील
9
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
10
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
11
'आम्ही भारत आणि पाकिस्तानला शस्त्रे टाकण्यास सांगू शकत नाही' : जेडी व्हेन्स
12
भारत, पाकच्या सीमा आगळ्यावेगळ्या का; ही सीमा जगात सर्वांत धोकादायक का आहे?
13
पुन्हा पाकिस्तानमध्ये घुसून हल्ला; इस्रायल मेड ड्रोनने केली लाहोरची डिफेन्स सिस्टिम ध्वस्त
14
शरद पवार बोलले, त्याचा नक्की अर्थ काय घ्यायचा?
15
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
16
मसूद अझहरचा लहान भाऊ अब्दुल रौफ अझहर ऑपरेशन सिंदूरमध्ये ठार
17
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
18
Operation Sindoor Live Updates: एलओसीवर स्फोटांचे आवाज, जम्मूमध्ये पूर्णपणे ब्लॅकआऊट
19
'मैं भी अगर मारा जाता तो अच्छा होता!' कोण हा मसूद अझर? - आठवून पाहा...
20
अजित पवारांसोबत जायचे का हे नवी पिढी ठरवेल, मी त्या प्रक्रियेत नाही : शरद पवार

कंधार तालुक्यातील शेतकऱ्यांचा नवपिकाचा प्रयोग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 04:31 IST

कंधार : निसर्गाचा लहरीपणा, खरीप हंगामाने दिलेला दगा अन् बिघडलेले शेतीचे अर्थकारण. यातून नवीन पीक प्रयोग घेण्याचा प्रयत्न शेतकरी ...

कंधार : निसर्गाचा लहरीपणा, खरीप हंगामाने दिलेला दगा अन् बिघडलेले शेतीचे अर्थकारण. यातून नवीन पीक प्रयोग घेण्याचा प्रयत्न शेतकरी करत आहेत. तालुक्यात १५० एकरांवर शेतकऱ्यांनी बटाटा लागवड केली आहे. अवघ्या २० गुंठे जमिनीत बटाटा लागवड करून पंढरी भोसीकर यांनी १ लाख ५० हजारांचे उत्पन्न काढून आर्थिक बळकटीकरण करण्याचा संकल्प केला आहे. बटाटा लागवडीने शिवार हिरवेगार झाले असून, लक्ष वेधून घेत आहे.

तालुक्यातील शेतकऱ्यांना सलग दुसऱ्या वर्षी खरीप हंगामाने दगा दिला. निसर्गाच्या लहरीपणाचा मोठा फटका बसला. तरीही शेतकरी रब्बी व इतर पीक लागवड करून आर्थिक स्त्रोत शोधत आहेत. यंदा पहिल्यांदाच बटाटा लागवड करण्याकडे शेतकऱ्यांचा कल मोठ्या प्रमाणात वाढला आहे. पेठवडज, उस्माननगर, हिप्परगा, बाभूळगाव, दाताळा, शिराढोण, संगमवाडी, पानशेवडी, तळ्याचीवाडी, भंडारकुमठ्याचीवाडी, जांभूळवाडी, बहाद्दरपुरा, नवरंगपुरा, बिजेवाडी तांडा, लालवाडी, कंधार, कंधारेवाडी, चिंचोली, आलेगाव, पानभोसी आदी गावांतील शेतकऱ्यांनी बटाटा लागवड केली आहे.

तालुक्यात सुमारे ६० हेक्टर क्षेत्रावर बटाटा लागवड झाली असल्याचे समोर आले आहे. तालुक्यात माळरान, भुसभुशीत, मध्यम प्रतीची, पाण्याचा निचरा होणाऱ्या जमिनीचे प्रमाण मोठे आहे. त्यातच उपलब्ध जलसाठा व नवीन शेती तंत्रज्ञानाची सांगड घालून उत्पन्न वाढविण्यासाठी शेतकरी सरासावला असल्याचे चित्र आहे. योग्य पाणी व्यवस्थापन, खताची मात्रा, जमिनीची निवड, लागवड व संगोपन आदींचा समन्वय साधत शेतकरी बटाटा लागवड करून आर्थिक बळकटीकडे वळला आहे. ता. कृषी अधिकारी रमेश देशमुख, मंडळ कृषी अधिकारी, कृषी सहायक आदींचे मार्गदर्शन घेऊन नवीन पीक प्रयोग केला जात आहे.

पानभोसी ता. कंधार येथील पंढरी भोसीकर यांनी २० गुंठे शेतीवर ऑक्टोबरअखेर अडीच क्विंटल बटाटे बेणे आणून लागवड केली आहे. मूग काढणीतून अपेक्षित उत्पन्न मिळाले नाही. मग हेच भूसभशीत क्षेत्र बटाटा लागवडीसाठी तयार केले. त्यावर तिफण फिरवून एका वितभर अंतराने बेणे लागवड केले. ठिबक अंथरून पाण्याची सोय केली. पोटॅश, जैविक, १८:१८ :१० खताचे मिश्रण करून खताची मात्रा दिली. एकूण १० हजार रुपये बेणे, मजुरी, खत आदी लागवडीवर खर्च केला. आणि अल्प खर्चावर अधिक मिळकत होण्यासाठी कसोशीने प्रयत्न केले जात आहेत.

साधारण तीन महिन्यांचे असलेले बटाटा पीक २० गुंठ्यांत ६० ते ७० क्विंटल निघेल, अशी एकंदरीत स्थिती असून बाजारात सध्या अडीच ते तीन हजार रु. प्रतिक्विंटल भाव आहे. त्यामुळे खर्च वजा करता दीड लाख रुपये नफा मिळण्याची अपेक्षा आहे, असे पंढरी भोसीकर यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.