शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
2
टॅरिफचे विघ्न, स्वदेशीचा मंत्र, अमेरिकेचे भारतावर अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ आजपासून, ४८ अब्ज डॉलर्सच्या निर्यातीला फटका
3
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
4
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
5
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
6
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
7
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
8
उच्च न्यायालयाने सुनावले, तरीही जरांगे मुंबईत आंदोलनावर ठाम! मुंबईकडे कूच करणारच, जरांगे यांचा इशारा
9
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
10
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
11
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
12
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
13
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
14
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
15
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
16
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
17
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
18
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
19
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
20
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!

कंधार तालुक्यातील शेतकऱ्यांचा नवपिकाचा प्रयोग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 04:31 IST

कंधार : निसर्गाचा लहरीपणा, खरीप हंगामाने दिलेला दगा अन् बिघडलेले शेतीचे अर्थकारण. यातून नवीन पीक प्रयोग घेण्याचा प्रयत्न शेतकरी ...

कंधार : निसर्गाचा लहरीपणा, खरीप हंगामाने दिलेला दगा अन् बिघडलेले शेतीचे अर्थकारण. यातून नवीन पीक प्रयोग घेण्याचा प्रयत्न शेतकरी करत आहेत. तालुक्यात १५० एकरांवर शेतकऱ्यांनी बटाटा लागवड केली आहे. अवघ्या २० गुंठे जमिनीत बटाटा लागवड करून पंढरी भोसीकर यांनी १ लाख ५० हजारांचे उत्पन्न काढून आर्थिक बळकटीकरण करण्याचा संकल्प केला आहे. बटाटा लागवडीने शिवार हिरवेगार झाले असून, लक्ष वेधून घेत आहे.

तालुक्यातील शेतकऱ्यांना सलग दुसऱ्या वर्षी खरीप हंगामाने दगा दिला. निसर्गाच्या लहरीपणाचा मोठा फटका बसला. तरीही शेतकरी रब्बी व इतर पीक लागवड करून आर्थिक स्त्रोत शोधत आहेत. यंदा पहिल्यांदाच बटाटा लागवड करण्याकडे शेतकऱ्यांचा कल मोठ्या प्रमाणात वाढला आहे. पेठवडज, उस्माननगर, हिप्परगा, बाभूळगाव, दाताळा, शिराढोण, संगमवाडी, पानशेवडी, तळ्याचीवाडी, भंडारकुमठ्याचीवाडी, जांभूळवाडी, बहाद्दरपुरा, नवरंगपुरा, बिजेवाडी तांडा, लालवाडी, कंधार, कंधारेवाडी, चिंचोली, आलेगाव, पानभोसी आदी गावांतील शेतकऱ्यांनी बटाटा लागवड केली आहे.

तालुक्यात सुमारे ६० हेक्टर क्षेत्रावर बटाटा लागवड झाली असल्याचे समोर आले आहे. तालुक्यात माळरान, भुसभुशीत, मध्यम प्रतीची, पाण्याचा निचरा होणाऱ्या जमिनीचे प्रमाण मोठे आहे. त्यातच उपलब्ध जलसाठा व नवीन शेती तंत्रज्ञानाची सांगड घालून उत्पन्न वाढविण्यासाठी शेतकरी सरासावला असल्याचे चित्र आहे. योग्य पाणी व्यवस्थापन, खताची मात्रा, जमिनीची निवड, लागवड व संगोपन आदींचा समन्वय साधत शेतकरी बटाटा लागवड करून आर्थिक बळकटीकडे वळला आहे. ता. कृषी अधिकारी रमेश देशमुख, मंडळ कृषी अधिकारी, कृषी सहायक आदींचे मार्गदर्शन घेऊन नवीन पीक प्रयोग केला जात आहे.

पानभोसी ता. कंधार येथील पंढरी भोसीकर यांनी २० गुंठे शेतीवर ऑक्टोबरअखेर अडीच क्विंटल बटाटे बेणे आणून लागवड केली आहे. मूग काढणीतून अपेक्षित उत्पन्न मिळाले नाही. मग हेच भूसभशीत क्षेत्र बटाटा लागवडीसाठी तयार केले. त्यावर तिफण फिरवून एका वितभर अंतराने बेणे लागवड केले. ठिबक अंथरून पाण्याची सोय केली. पोटॅश, जैविक, १८:१८ :१० खताचे मिश्रण करून खताची मात्रा दिली. एकूण १० हजार रुपये बेणे, मजुरी, खत आदी लागवडीवर खर्च केला. आणि अल्प खर्चावर अधिक मिळकत होण्यासाठी कसोशीने प्रयत्न केले जात आहेत.

साधारण तीन महिन्यांचे असलेले बटाटा पीक २० गुंठ्यांत ६० ते ७० क्विंटल निघेल, अशी एकंदरीत स्थिती असून बाजारात सध्या अडीच ते तीन हजार रु. प्रतिक्विंटल भाव आहे. त्यामुळे खर्च वजा करता दीड लाख रुपये नफा मिळण्याची अपेक्षा आहे, असे पंढरी भोसीकर यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.