शहरं
Join us  
Trending Stories
1
एक दिवस फॅन्स अन् क्रिकेटपटू यांच्यातल्या विश्वासाला तडा जाईल, Rohit Sharma चं विधान
2
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
3
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
4
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
5
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
6
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
7
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
8
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
9
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
10
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
11
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल
12
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
13
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय 
14
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
15
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
16
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
17
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
18
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
19
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
20
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत

कल्पनाशक्तीला चालना देणाऱ्या साहित्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2019 12:33 AM

बालसाहित्यिकांनी आऊट आॅफ दी बॉक्स विचार करण्याची आवश्यकता असून बालकांच्या कल्पनाशक्तीला चालना देणाऱ्या साहित्याची वर्तमानात गरज आहे, असे प्रतिपादन साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त लेखक राजीव तांबे यांनी ‘बालसाहित्य - सद्य:स्थिती आणि भवितव्य’ या चर्चासत्राच्या समारोपप्रसंगी केले.

ठळक मुद्देबालसाहित्य चर्चासत्राच्या समारोपप्रसंगी राजीव तांबे यांचे प्रतिपादन

नांदेड : बालसाहित्यिकांनी आऊट आॅफ दी बॉक्स विचार करण्याची आवश्यकता असून बालकांच्या कल्पनाशक्तीला चालना देणाऱ्या साहित्याची वर्तमानात गरज आहे, असे प्रतिपादन साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त लेखक राजीव तांबे यांनी ‘बालसाहित्य - सद्य:स्थिती आणि भवितव्य’ या चर्चासत्राच्या समारोपप्रसंगी केले.स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या रौप्य महोत्सवानिमित्त भाषा, वाड.्मय आणि संस्कृती अभ्यास संकुलाच्या वतीने ‘बालसाहित्य’ या विषयावर दोन दिवसांचे राष्ट्रीय चर्चासत्र घेण्यात आले. चर्चासत्राचा समारोप राजीव तांबे यांनी केला. अध्यक्षस्थानी डॉ. केशव सखाराम देशमुख होते. डॉ. वैजयंता पाटील, डॉ. एम. के. पाटील, डॉ. दिलीप चव्हाण, डॉ. पृथ्वीराज तौर यांची यावेळी उपस्थिती होती.शिशुगटासाठी शब्दरहित पुस्तकांची मोठ्या प्रमाणात आवश्यकता असल्याचेही तांबे यावेळी म्हणाले. बालकांना गोष्टी वाचून दाखवणे आणि गोष्टी सांगणे यातून बालकाचे शिक्षण होत असते. बालसाहित्याचे प्रयोजन मुलांना दृष्टी देणे, आनंद देणे, विविध संकल्पनांबाबतच्या कक्षा रुंदावत नेणे हा असतो. बालसाहित्याचा पाया मुलांवरचा अपार विश्वास आणि निरपेक्ष प्रेम हा आहे, असेही राजीव तांबे आपल्या विवेचनात म्हणाले.‘बालसाहित्य : सद्य:स्थिती आणि भवितव्य’ या दोन दिवसांच्या चर्चासत्रात नामदेव माळी, माधुरी पुरंदरे, सुभाष विभुते, विद्या सुर्वे, सुरेश सावंत, प्राचार्य रावसाहेब जाधव, जगदीश कदम, देवीदास फुलारी यांच्या अध्यक्षतेखालील आठ सत्रांमध्ये पंचेचाळीस शोधनिबंध सादर करण्यात आले.बालसाहित्याच्या क्षेत्रातील ज्येष्ठ अभ्यासक, समीक्षक आणि बालसाहित्यिक यांची चर्चासत्राला लक्षणीय उपस्थिती होती. प्रशांत गौतम, किरण केंद्रे, सुनीता बोर्डे, फारुक काझी, माया धुप्पड, श्रीनिवास बाळकृष्णन, शिवाजी आंबुलगेकर, नरेंद्र्र लांजेवार, अनिरुद्ध गोगटे, माधव चुकेवाड या बालसाहित्यिकांसह हमीद अशरफ, मुहमद मकबूल अहमद, गिरीश जकापुरे, नाथा चितळे स्वाती काटे, संजय जोशी, आनंदी विकास, दिलीप चव्हाण, सत्यकाम पाठक, दीपा बियाणी, सुचिता पाटील, अर्चना डावरे, नीना गोगटे, पी. विठ्ठल, योगिनी सातारकर, झिशान अली, विठ्ठल जाधव, सविदा गोविंदवार आदी अभ्यासकांनी विषयांची मांडणी केली.चर्चासत्रात एम. ए. मराठीच्या विद्यार्थ्यांनी लावलेल्या पोस्टर प्रदर्शनाचे कुलगुरू डॉ उद्धव भोसले, भोपाळ येथील सुशील शुक्ल, साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त लेखिका माधुरी पुरंदरे, डॉ. रमजान मुलानी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. माया दिलीप धुप्पड, डॉ. पृथ्वीराज तौर, डॉ. सुरेश कदम यांच्या पुस्तकाचे आणि फुलोरा शाळेच्या विद्यार्थ्यांच्या हस्तपुस्तिकेचे राजीव तांबे, माधुरी पुरंदरे यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.

टॅग्स :Nandedनांदेडswami ramanand tirth marathawada univercity, nandedस्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड