शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
6
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
7
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
8
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
9
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
10
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
11
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
12
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
13
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
14
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
15
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
16
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
17
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
18
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
19
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
20
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज

कल्पनाशक्तीला चालना देणाऱ्या साहित्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2019 00:33 IST

बालसाहित्यिकांनी आऊट आॅफ दी बॉक्स विचार करण्याची आवश्यकता असून बालकांच्या कल्पनाशक्तीला चालना देणाऱ्या साहित्याची वर्तमानात गरज आहे, असे प्रतिपादन साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त लेखक राजीव तांबे यांनी ‘बालसाहित्य - सद्य:स्थिती आणि भवितव्य’ या चर्चासत्राच्या समारोपप्रसंगी केले.

ठळक मुद्देबालसाहित्य चर्चासत्राच्या समारोपप्रसंगी राजीव तांबे यांचे प्रतिपादन

नांदेड : बालसाहित्यिकांनी आऊट आॅफ दी बॉक्स विचार करण्याची आवश्यकता असून बालकांच्या कल्पनाशक्तीला चालना देणाऱ्या साहित्याची वर्तमानात गरज आहे, असे प्रतिपादन साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त लेखक राजीव तांबे यांनी ‘बालसाहित्य - सद्य:स्थिती आणि भवितव्य’ या चर्चासत्राच्या समारोपप्रसंगी केले.स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या रौप्य महोत्सवानिमित्त भाषा, वाड.्मय आणि संस्कृती अभ्यास संकुलाच्या वतीने ‘बालसाहित्य’ या विषयावर दोन दिवसांचे राष्ट्रीय चर्चासत्र घेण्यात आले. चर्चासत्राचा समारोप राजीव तांबे यांनी केला. अध्यक्षस्थानी डॉ. केशव सखाराम देशमुख होते. डॉ. वैजयंता पाटील, डॉ. एम. के. पाटील, डॉ. दिलीप चव्हाण, डॉ. पृथ्वीराज तौर यांची यावेळी उपस्थिती होती.शिशुगटासाठी शब्दरहित पुस्तकांची मोठ्या प्रमाणात आवश्यकता असल्याचेही तांबे यावेळी म्हणाले. बालकांना गोष्टी वाचून दाखवणे आणि गोष्टी सांगणे यातून बालकाचे शिक्षण होत असते. बालसाहित्याचे प्रयोजन मुलांना दृष्टी देणे, आनंद देणे, विविध संकल्पनांबाबतच्या कक्षा रुंदावत नेणे हा असतो. बालसाहित्याचा पाया मुलांवरचा अपार विश्वास आणि निरपेक्ष प्रेम हा आहे, असेही राजीव तांबे आपल्या विवेचनात म्हणाले.‘बालसाहित्य : सद्य:स्थिती आणि भवितव्य’ या दोन दिवसांच्या चर्चासत्रात नामदेव माळी, माधुरी पुरंदरे, सुभाष विभुते, विद्या सुर्वे, सुरेश सावंत, प्राचार्य रावसाहेब जाधव, जगदीश कदम, देवीदास फुलारी यांच्या अध्यक्षतेखालील आठ सत्रांमध्ये पंचेचाळीस शोधनिबंध सादर करण्यात आले.बालसाहित्याच्या क्षेत्रातील ज्येष्ठ अभ्यासक, समीक्षक आणि बालसाहित्यिक यांची चर्चासत्राला लक्षणीय उपस्थिती होती. प्रशांत गौतम, किरण केंद्रे, सुनीता बोर्डे, फारुक काझी, माया धुप्पड, श्रीनिवास बाळकृष्णन, शिवाजी आंबुलगेकर, नरेंद्र्र लांजेवार, अनिरुद्ध गोगटे, माधव चुकेवाड या बालसाहित्यिकांसह हमीद अशरफ, मुहमद मकबूल अहमद, गिरीश जकापुरे, नाथा चितळे स्वाती काटे, संजय जोशी, आनंदी विकास, दिलीप चव्हाण, सत्यकाम पाठक, दीपा बियाणी, सुचिता पाटील, अर्चना डावरे, नीना गोगटे, पी. विठ्ठल, योगिनी सातारकर, झिशान अली, विठ्ठल जाधव, सविदा गोविंदवार आदी अभ्यासकांनी विषयांची मांडणी केली.चर्चासत्रात एम. ए. मराठीच्या विद्यार्थ्यांनी लावलेल्या पोस्टर प्रदर्शनाचे कुलगुरू डॉ उद्धव भोसले, भोपाळ येथील सुशील शुक्ल, साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त लेखिका माधुरी पुरंदरे, डॉ. रमजान मुलानी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. माया दिलीप धुप्पड, डॉ. पृथ्वीराज तौर, डॉ. सुरेश कदम यांच्या पुस्तकाचे आणि फुलोरा शाळेच्या विद्यार्थ्यांच्या हस्तपुस्तिकेचे राजीव तांबे, माधुरी पुरंदरे यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.

टॅग्स :Nandedनांदेडswami ramanand tirth marathawada univercity, nandedस्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड