शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
2
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
3
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
4
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
5
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
6
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
7
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
8
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
9
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
10
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
11
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
12
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
13
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
14
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...
15
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
16
Vivo Y400 5G: एमोलेड डिस्प्ले, ६००० mAh बॅटरी आणि बरेच काही; विवो व्हाय ४०० भारतात लॉन्च!
17
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
18
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
19
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
20
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?

राज्याच्या एकात्मिक जल आराखड्यात मराठवाड्यात २९ ‘टीएमसी’ ची नोंद हवी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2018 19:32 IST

सध्या राज्याचा एकात्मिक जल आराखडा तयार करण्याचे काम सुरु आहे.

नांदेड : सध्या राज्याचा एकात्मिक जल आराखडा तयार करण्याचे काम सुरु आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच या जल परिषदेचे अध्यक्ष आहेत. आराखड्याचे काम अंतिम टप्प्यात असून या आराखड्यात मराठवाड्यात २९ टीएमसी पाणी शिल्लक आहे हे स्पष्टपणे नमूद करायला हवे, अशी मागणी खा. अशोकराव चव्हाण यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केली. 

ते म्हणाले, खोरे निहाय होणाऱ्या जल आराखड्यात दर्शविल्याप्रमाणेच यापुढे पाणी गृहित धरल्या जाईल. त्यात कोणाला बदलही करता येणार नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ३० एप्रिल २०१८ रोजी कंधार येथेच मराठवाड्यातील गोदावरी खोऱ्यात २९ टीएमसी पाणी शिल्लक असल्याचे घोषित केले  होते. मात्र आता मुख्य अभियंत्यांच्या अध्यक्षतेखालील कृतीगट या भागात पाणी उपलब्ध नसल्याचे सांगत आहे.

मुख्यमंत्र्यांनी ३० नोव्हेंबर २०१७ मध्ये गोदावरी खोरे जल आराखड्याला दिलेली मान्यता यात २९ टीएमसीचा स्पष्ट उल्लेख आहे. जलसंपदामंत्री यांचेही तसेच पत्र उपलब्ध असताना कृतीगट कसे काय पाणी उपलब्ध नसल्याचे सांगतो, असा सवाल करत राज्याच्या आराखड्यात २९ टीएमसीचा स्पष्ट उल्लेख हवा अशी मागणी चव्हाण यांनी केली. 

नांदेडवरील अन्याय सहन करणार नाहीमराठवाड्यातील पाणीप्रश्नासंदर्भात २५ सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री आणि जलसंपदामंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक झाली. त्यावेळी अप्पर पैनगंगेचा मुद्दा प्रामुख्याने उपस्थित केल्याचे सांगत सदर बाब शासनाच्या निदर्शनास आणून दिली आहे. याबाबत राज्यपालांचीही भेट घेतली असून त्यांनीही तातडीने हस्तक्षेप करावा, अशी मागणी केली आहे. 

शासनाच्या या निर्णयामुळे नांदेडसह परभणी, यवतमाळसह हिंगोली जिल्ह्याचेही नुकसान होणार आहे. त्यामुळे १९६८ चे या प्रकल्पासंबंधीचे मूळ धोरण कायम ठेवण्याची मागणी केली आहे. होऊ घातलेल्या सापळी धरणासाठीही वेगळा प्रस्ताव पुढे आल्याचे समजते. तेथील जमीन अधिगृहित न करता पाणी लिफ्ट करुन न्यायचा प्रस्ताव शासनापुढे आहे. हे करताना अप्पर पैनगंगेचे नुकसान होणार नाही. आमचे पाणी कायम राहील, याकडे शासनाने लक्ष द्यावे. प्रकल्पाच्या उर्ध्व भागात कोणत्याही नवीन प्रकल्पाला मंजुरी देवून नांदेडकरांवर अन्याय करु नये अन्यथा यासंबंधी ठोस भूमिका घेऊ,असा इशाराही खा. अशोकराव चव्हाण यांनी शासनाला दिला.

टॅग्स :Ashok Chavanअशोक चव्हाणNandedनांदेडState Governmentराज्य सरकारWaterपाणीMarathwadaमराठवाडा