शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

मोदींविरोधात समविचारी पक्षांनी एकत्र येण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2018 00:40 IST

उत्तप्रदेशातील पोटनिवडणूक मुलायमसिंग आणि मायावती यांनी युती करुन लढविल्याने भाजपचा पराभव झाला़ यापुढेदेखील भाजप आणि मोदींविरोधात सर्व समविचारी पक्षांनी एकत्र येवून निवडणूका लढविणे गरजेचे आहे, असे मत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले़

ठळक मुद्देविभागीय कार्यकर्ता शिबीर : पृथ्वीराज चव्हाण यांचे प्रतिपादन

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : उत्तप्रदेशातील पोटनिवडणूक मुलायमसिंग आणि मायावती यांनी युती करुन लढविल्याने भाजपचा पराभव झाला़ यापुढेदेखील भाजप आणि मोदींविरोधात सर्व समविचारी पक्षांनी एकत्र येवून निवडणूका लढविणे गरजेचे आहे, असे मत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले़नांदेड शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने शहरातील भक्ती लॉन्स येथे आयोजित मराठवाडा विभागीय कार्यकर्ता शिबीरात ते बोलत होते़ मंचावर अ़भाक़ाँग्रेसचे सरचिटणीस तथा महाराष्ट्र प्रभारी मोहन प्रकाश, राजस्थान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सचिन पायलट, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष तथा माजी मुख्यमंत्री खा़अशोकराव चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, खा.राजीव सातव, खा. कुमार केतकर, विधान परिषदेचे उप सभापती माणिकराव ठाकरे, ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे, आ. डी.पी. सावंत, आ. अमिता चव्हाण, आ. अमर राजूरकर, आ़हर्षवर्धन सपकाळ, आ़मधुकर चव्हाण, आ. वसंतराव चव्हाण, अमित देशमुख, आ़बस्वराज पाटील, आ़हर्षवर्धन सपकाळ, माजी मंत्री नईम खान, आ. अब्दुल सत्तार आदींची प्रमुख उपस्थिती होती.पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, भाजप सत्तेत येवून चार वर्ष लोटली तरी अद्याप त्यांनी कोणतेही आश्वासन पूर्ण केले नाही़ वर्षाला दोन कोटी रोजगार देण्याचे आश्वासन देणाऱ्या भाजपने आजपर्यंत किती जणांना रोजगार उपबल्ध करून दिला, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला़बुलेट ट्रेन, नोटाबंदी आणि जीएसटीवरून चव्हाण यांनी भाजप सरकारवर सडकून टिका केली़ बहुतांश प्रकल्प गुजरामध्ये घेवून जाणारे मोदी देशाचे पंतप्रधान आहेत की गुजारातचे असा सवाल त्यांनी उपस्थित केला़ काँग्रेस अध्यक्ष राहूल गांधी यांच्या नेतृत्वात नवीन तरूण काँग्रेसचा जन्म झाला असून ही परिवर्तनाची सुरूवात असल्याचे ते म्हणाले़ अ. भा. काँग्रेसचे सचिव खा़राजीव सातव म्हणाले, मंत्रालयात आत्महत्या झाल्याची देशातील पहिली घटना आहे़ सर्कशीप्रमाणे मंत्रालयाला जाळ्या बसविल्या असून त्या मंत्रालयातील जोकरासाठी बसविल्याची टिका त्यांनी केली़ मंत्रालयात एवढे बोके असताना उंदिर मारण्यासाठी लाखो रूपये कशाला खर्च करावे लागतात, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला़ ते म्हणाले, काँग्रेसचा अजेंडा राष्ट्रनिर्माणाचा असून त्यादृष्टीनेच कार्यकर्त्यांनी काम करावे, असे आवाहन केले़ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे म्हणाले, नांदेड ही काँग्रेसची यशोभूमी आहे़ येथील लोकांनी दिवंगत नेते शंकरराव चव्हाण यांच्याप्रमाणेच अशोकराव चव्हाण यांनाही भरभरून साथ दिली़ काँग्रेस हा सर्व जाती-धर्मांचा आदर करणारा, त्यांना सोबत घेवून चालणारा पक्ष आहे़ काँग्रेसने विष्णुपुरी, जायकवाडी, इसापूर असे शेकडो धरणं बांधून देश सुजलाम् सुफलाम् करण्याचे कार्य केले़दरम्यान, माजी मंत्री नसीम खान, माणिकराव ठाकरे आदींनी आपले विचार मांडले़ प्रास्ताविकात काँग्रेस महानगराध्यक्ष आ़अमरनाथ राजूरकर यांनी शिबीर आयोजनामागील भूमिका विशद केली़ कार्यक्रमास महापौर शीला भवरे, सभापजी शीला निखाते, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बी़ आऱ कदम, निलेश पावडे, विजय येवनकर, शाम दरक, प्रवक्ते संतोष पांडागळे आदी उपस्थित होते़ सूत्रसंचालन प्रा़संतोष देवराये तर जिल्हाध्यक्ष गोविंद पाटील नागेलीकर यांनी आभार मानले़चव्हाण : काँग्रेसच देवू शकते अच्छे दिऩअशोकराव चव्हाण म्हणाले, सत्ते येण्यापूर्वी भाजपने जनतेला अच्छे दिनचे स्वप्न दाखविले़ परंतु, ते पूर्ण करण्याची ताकद केवळ काँग्रेसमध्येच आहे हे आता जनतेच्या लक्षात आले आहे़ भाजपने पहिल्या कॅबिनेटमध्ये मराठा आरक्षण, शेतीमालाला उत्पन्नावर आधारीत हमी भाव आदी निर्णय घेतले जातील, असे आश्वासन दिले होते़ परंतु, एकही आश्वासन भाजपाने पूर्ण केले नाही़ सर्व घटकांच्या हातावर तुरी देण्याचे काम या सरकारने केल्याची टिका त्यांनी केली़ राष्ट्रीय महामार्गासाठी संपादित जमिनीचा मावेजा देण्याबाबत सरकारची भूमिका न्यायीक नाही़ शहर आणि ग्रामीण भागात वेगवेगळा मावेजा दिला जात आहे़ तर ग्रामीण भागात वेगवेगळे टप्पे करून दिला जाणार आहे़ यास शेतकºयांचा विरोध असल्याचे ते म्हणाले़ यासंदर्भात काँग्रेसच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीयमंत्री नितिन गडकरी यांची भेट घेतल्याचे त्यांनी सांगितले़ तसेच आपण स्वत: गडकरी यांच्याशी फोनवरून चर्चा केल्याचे खा़अशोकराव चव्हाण यांनी सांगितले़

टॅग्स :congressकाँग्रेसMarathwadaमराठवाडा