शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
4
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
5
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
6
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
7
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
8
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
9
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
10
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
11
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
12
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
13
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
14
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
15
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
16
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
17
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
18
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
19
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
20
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 

मोदींविरोधात समविचारी पक्षांनी एकत्र येण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2018 00:40 IST

उत्तप्रदेशातील पोटनिवडणूक मुलायमसिंग आणि मायावती यांनी युती करुन लढविल्याने भाजपचा पराभव झाला़ यापुढेदेखील भाजप आणि मोदींविरोधात सर्व समविचारी पक्षांनी एकत्र येवून निवडणूका लढविणे गरजेचे आहे, असे मत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले़

ठळक मुद्देविभागीय कार्यकर्ता शिबीर : पृथ्वीराज चव्हाण यांचे प्रतिपादन

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : उत्तप्रदेशातील पोटनिवडणूक मुलायमसिंग आणि मायावती यांनी युती करुन लढविल्याने भाजपचा पराभव झाला़ यापुढेदेखील भाजप आणि मोदींविरोधात सर्व समविचारी पक्षांनी एकत्र येवून निवडणूका लढविणे गरजेचे आहे, असे मत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले़नांदेड शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने शहरातील भक्ती लॉन्स येथे आयोजित मराठवाडा विभागीय कार्यकर्ता शिबीरात ते बोलत होते़ मंचावर अ़भाक़ाँग्रेसचे सरचिटणीस तथा महाराष्ट्र प्रभारी मोहन प्रकाश, राजस्थान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सचिन पायलट, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष तथा माजी मुख्यमंत्री खा़अशोकराव चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, खा.राजीव सातव, खा. कुमार केतकर, विधान परिषदेचे उप सभापती माणिकराव ठाकरे, ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे, आ. डी.पी. सावंत, आ. अमिता चव्हाण, आ. अमर राजूरकर, आ़हर्षवर्धन सपकाळ, आ़मधुकर चव्हाण, आ. वसंतराव चव्हाण, अमित देशमुख, आ़बस्वराज पाटील, आ़हर्षवर्धन सपकाळ, माजी मंत्री नईम खान, आ. अब्दुल सत्तार आदींची प्रमुख उपस्थिती होती.पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, भाजप सत्तेत येवून चार वर्ष लोटली तरी अद्याप त्यांनी कोणतेही आश्वासन पूर्ण केले नाही़ वर्षाला दोन कोटी रोजगार देण्याचे आश्वासन देणाऱ्या भाजपने आजपर्यंत किती जणांना रोजगार उपबल्ध करून दिला, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला़बुलेट ट्रेन, नोटाबंदी आणि जीएसटीवरून चव्हाण यांनी भाजप सरकारवर सडकून टिका केली़ बहुतांश प्रकल्प गुजरामध्ये घेवून जाणारे मोदी देशाचे पंतप्रधान आहेत की गुजारातचे असा सवाल त्यांनी उपस्थित केला़ काँग्रेस अध्यक्ष राहूल गांधी यांच्या नेतृत्वात नवीन तरूण काँग्रेसचा जन्म झाला असून ही परिवर्तनाची सुरूवात असल्याचे ते म्हणाले़ अ. भा. काँग्रेसचे सचिव खा़राजीव सातव म्हणाले, मंत्रालयात आत्महत्या झाल्याची देशातील पहिली घटना आहे़ सर्कशीप्रमाणे मंत्रालयाला जाळ्या बसविल्या असून त्या मंत्रालयातील जोकरासाठी बसविल्याची टिका त्यांनी केली़ मंत्रालयात एवढे बोके असताना उंदिर मारण्यासाठी लाखो रूपये कशाला खर्च करावे लागतात, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला़ ते म्हणाले, काँग्रेसचा अजेंडा राष्ट्रनिर्माणाचा असून त्यादृष्टीनेच कार्यकर्त्यांनी काम करावे, असे आवाहन केले़ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे म्हणाले, नांदेड ही काँग्रेसची यशोभूमी आहे़ येथील लोकांनी दिवंगत नेते शंकरराव चव्हाण यांच्याप्रमाणेच अशोकराव चव्हाण यांनाही भरभरून साथ दिली़ काँग्रेस हा सर्व जाती-धर्मांचा आदर करणारा, त्यांना सोबत घेवून चालणारा पक्ष आहे़ काँग्रेसने विष्णुपुरी, जायकवाडी, इसापूर असे शेकडो धरणं बांधून देश सुजलाम् सुफलाम् करण्याचे कार्य केले़दरम्यान, माजी मंत्री नसीम खान, माणिकराव ठाकरे आदींनी आपले विचार मांडले़ प्रास्ताविकात काँग्रेस महानगराध्यक्ष आ़अमरनाथ राजूरकर यांनी शिबीर आयोजनामागील भूमिका विशद केली़ कार्यक्रमास महापौर शीला भवरे, सभापजी शीला निखाते, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बी़ आऱ कदम, निलेश पावडे, विजय येवनकर, शाम दरक, प्रवक्ते संतोष पांडागळे आदी उपस्थित होते़ सूत्रसंचालन प्रा़संतोष देवराये तर जिल्हाध्यक्ष गोविंद पाटील नागेलीकर यांनी आभार मानले़चव्हाण : काँग्रेसच देवू शकते अच्छे दिऩअशोकराव चव्हाण म्हणाले, सत्ते येण्यापूर्वी भाजपने जनतेला अच्छे दिनचे स्वप्न दाखविले़ परंतु, ते पूर्ण करण्याची ताकद केवळ काँग्रेसमध्येच आहे हे आता जनतेच्या लक्षात आले आहे़ भाजपने पहिल्या कॅबिनेटमध्ये मराठा आरक्षण, शेतीमालाला उत्पन्नावर आधारीत हमी भाव आदी निर्णय घेतले जातील, असे आश्वासन दिले होते़ परंतु, एकही आश्वासन भाजपाने पूर्ण केले नाही़ सर्व घटकांच्या हातावर तुरी देण्याचे काम या सरकारने केल्याची टिका त्यांनी केली़ राष्ट्रीय महामार्गासाठी संपादित जमिनीचा मावेजा देण्याबाबत सरकारची भूमिका न्यायीक नाही़ शहर आणि ग्रामीण भागात वेगवेगळा मावेजा दिला जात आहे़ तर ग्रामीण भागात वेगवेगळे टप्पे करून दिला जाणार आहे़ यास शेतकºयांचा विरोध असल्याचे ते म्हणाले़ यासंदर्भात काँग्रेसच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीयमंत्री नितिन गडकरी यांची भेट घेतल्याचे त्यांनी सांगितले़ तसेच आपण स्वत: गडकरी यांच्याशी फोनवरून चर्चा केल्याचे खा़अशोकराव चव्हाण यांनी सांगितले़

टॅग्स :congressकाँग्रेसMarathwadaमराठवाडा