शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

राष्ट्रवादीचे नांदेड जिल्हाध्यक्ष गोरठेकर यांनी पक्ष सोडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2019 16:04 IST

भोकर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार

नांदेड : राष्ट्रवादीचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष बापूसाहेब गोरठेकर यांनी प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस सोडल्याची घोषणा करत आगामी निवडणूक ही भोकर मतदारसंघातून लढवणार असल्याचे स्पष्ट केले़ पक्ष कोणता हे अद्याप त्यांनी घोषित केले नसले तरीही ते भाजपाच्या वाटेवर आहेत़ 

नांदेडमध्ये सोमवारी गोरठेकर यांनी प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक बोलावली होती़ या बैठकीत आगामी कार्यकाळातील निर्णयाबाबत प्रमुख कार्यकर्त्यांची मते जाणून घेण्यात आली़ यावेळी बहुतांश कार्यकर्त्यांनी गोरठेकर जो निर्णय घेतील तो आपल्याला मान्य राहील असे सांगून गोरठेकरांच्या निर्णयाला पाठिंबा राहील, ही भूमिका मांडली़ भोकर व नायगाव मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा आग्रह कार्यकर्त्यांनी धरला होता़ 

गोरठेकर यांनी भूमिका मांडताना मागील १० वर्षात आमच्या कार्यकर्त्यावर जो अन्याय झाला त्याचा हिशोब आता पूर्ण केला जाईल हे ठणकावताना सर्वसामान्यांसाठीच निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे ते म्हणाले़ कुस्ती लढताना ती मोठ्या पैलवानाशी लढावी, असे सांगताना त्यांनी आगामी निवडणूक ही भोकर मतदारसंघातून लढवणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत़ 

लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने धोका दिल्याचे भोकरच्या आमदार अमिताताई चव्हाण यांनी म्हटले होते़ त्याबाबत राष्ट्रवादीने धोका दिला नाही तर काँग्रेसच्या लोकप्रतिनिधींनीही अशोकरावांना मतदान करा असे म्हटले नसल्याचे सांगितले़ त्यांचेच कार्यकर्ते प्रचारात उतरले नाहीत़ इतकेच नव्हे तर काँग्रेसने आपल्यावरही पाळत ठेवली होती़ विश्वासच नाही तर सोबत राहण्याची काय गरज होती, असा सवालही त्यांनी उपस्थित केला़ काँग्रेसने आपल्याला दोनवेळा पराभूत केले़ मात्र आम्ही ब्र ही काढला नाही़ त्यामुळे आता कोण काय म्हणते याकडे लक्ष देण्याची गरज नसल्याचे गोरठेकर यांनी सांगितले़ 

राष्ट्रवादी काँग्रेस सोडण्यास पक्षातील राहू-केतू कारणीभूत असल्याचे सांगितले़ हे राहू-केतू म्हणजे माजी आ़शंकरअण्णा धोंडगे आणि किनवटचे आ़ प्रदीप नाईक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले़ मेहनत आम्ही करायची आणि धोंडगे व नाईक यांनी सौदेबाजी करत आपल्या मुलाला, नातेवाईकाला पदे मिळवून घ्यायची़ काँग्रेसनेही गरज पडल्यासच या राहू-केतूंना जवळ घेतले़ यामुळे पक्षात राहायचे कशाला असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला़ निवडणुकीच्या काळात येणारे निरीक्षकही काँग्रेसशी मॅनेज असायचे असा आरोपही त्यांनी केला़  

जिल्ह्यात गोरठेकर आणि कुंटूरकर घराणे हे राजकारणातील मोठे घराणे होते़ याच घराण्यांच्या मदतीने शंकरराव चव्हाण यांनी जिल्ह्यात राजकारण केले़ मात्र अशोकराव चव्हाण यांनी या घराण्यांची वाट लावली, असेही त्यांनी सांगितले़ मागील १० वर्षात सत्तेत नसताना कार्यकर्त्यांना जाणीवपूर्वक त्रास देण्यात आला़ मात्र त्याचा आता आगामी काळात निश्चितच हिशोब केला जाईल, असेही ते म्हणाले़ यावेळी सभापती दत्तू रेड्डी, राजेश कुंटूरकर, मारोतराव कवळे, रमेश सरोदे, दत्ताहरी पाटील, गणेशराव गाढे, विश्वनाथ बन्नाळीकर, भास्कर भिलवंडे, महंमद जावेद, उत्तम बाभळे, जीवन पाटील, धर्मराज देशमुख यांनीही भावना व्यक्त केल्या़

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसNandedनांदेडPoliticsराजकारण