शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात २७ वी घटना दुरुस्ती, असीम मुनीर यांनी मिळाली जबरदस्त 'पॉवर'; पाहा किती ताकद वाढली?
2
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
3
Delhi Crime: वर्गमित्राला घरी घेऊन आला, वडिलांचे पिस्तुल घेतले आणि घातल्या गोळ्या; कारण...
4
नोकरी सोडल्यानंतरही तुमचा आरोग्य विमा संपणार नाही; 'ही' घ्या पॉलिसी पोर्ट करण्याची प्रक्रिया
5
वंदे भारत एक्सप्रेसच्या उद्घाटनावेळी विद्यार्थ्यांनी गायलं RSS गीत, राजकारण तापलं; केरळ सरकारचे चौकशीचे आदेश
6
गुंतवणूक दुप्पट करण्यासाठी श्रीमंत वापरतात 'हा' सिक्रेट फॉर्म्युला! काय आहे 'रूल ऑफ ७२'चे अचूक गणित
7
आरएसएसची नोंदणी का केली नाही? भागवतांनी दिले उत्तर; 'हिंदू धर्मही रजिस्टर्ड नाही...'
8
लगाव बत्ती... स्पीडऽऽऽ लीडर! कोल्हापूरचे पाटील, ‘साताऱ्या’चे दोन राजे
9
डिझेल वाहन मालकांसाठी...! इथेनॉलच्या 'आयसोब्युटानॉल' रुपावर टेस्टिंग सुरु; टाटा कंपनीची कार...
10
Solapur Crime: अंकिताने १४ महिन्यांच्या बाळाला पाजलं विष, नंतर स्वतःही संपवलं आयुष्य; बार्शी पुन्हा हादरली 
11
"जर पाकिस्तान परीक्षण करत असेल, तर...!"; पाकच्या अणुचाचणीवरून राजनाथ सिंहांचा थेट इशारा
12
बलात्काराचा आरोपी, आप आमदार हरमीत सिंग पठानमाजरा ऑस्ट्रेलियाला पळाला! आप सरकारवर टीका...
13
आयपीओचे धमाकेदार सबस्क्रिप्शन असूनही लिस्टिंग होतेय फ्लॉप; सेबीने घेतला मोठा निर्णय
14
पोलिसांच्या भीतीने वेगात निघाला, कार बारवर जाऊन धडकली; ४ लोक जागीच ठार, १३ जखमी
15
"प्रत्येक परिस्थितीला तोंड देण्यास सज्ज..."; राजनाथ सिंह यांचा पाकिस्तानला सूचक इशारा
16
"राष्ट्रवादीची औलाद सत्तेशिवाय राहू शकत नाही"; तानाजी सावंतांच्या वादग्रस्त विधानामुळे महायुतीत मोठा भूकंप
17
इराणमध्ये खळबळ! राजधानी तेहरानचे पाणी संपले; अवघ्या दोन आठवड्यांत शहरे रिकामी करावी लागणार...
18
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! आठवडाभरात सोन-चांदीत मोठी घसरण! काय आहेत आजचे दर?
19
'मातोश्री'वर ड्रोनची नजर? टेहळणी होत असल्याचा ठाकरे गटाचा आरोप, मुंबई पोलीस म्हणाले, "परवानगी होती..."
20
मोठी बातमी! भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; गुजरातमधून ३ संशयित दहशतवाद्यांना अटक

राष्ट्रवादीचे नांदेड जिल्हाध्यक्ष गोरठेकर यांनी पक्ष सोडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2019 16:04 IST

भोकर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार

नांदेड : राष्ट्रवादीचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष बापूसाहेब गोरठेकर यांनी प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस सोडल्याची घोषणा करत आगामी निवडणूक ही भोकर मतदारसंघातून लढवणार असल्याचे स्पष्ट केले़ पक्ष कोणता हे अद्याप त्यांनी घोषित केले नसले तरीही ते भाजपाच्या वाटेवर आहेत़ 

नांदेडमध्ये सोमवारी गोरठेकर यांनी प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक बोलावली होती़ या बैठकीत आगामी कार्यकाळातील निर्णयाबाबत प्रमुख कार्यकर्त्यांची मते जाणून घेण्यात आली़ यावेळी बहुतांश कार्यकर्त्यांनी गोरठेकर जो निर्णय घेतील तो आपल्याला मान्य राहील असे सांगून गोरठेकरांच्या निर्णयाला पाठिंबा राहील, ही भूमिका मांडली़ भोकर व नायगाव मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा आग्रह कार्यकर्त्यांनी धरला होता़ 

गोरठेकर यांनी भूमिका मांडताना मागील १० वर्षात आमच्या कार्यकर्त्यावर जो अन्याय झाला त्याचा हिशोब आता पूर्ण केला जाईल हे ठणकावताना सर्वसामान्यांसाठीच निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे ते म्हणाले़ कुस्ती लढताना ती मोठ्या पैलवानाशी लढावी, असे सांगताना त्यांनी आगामी निवडणूक ही भोकर मतदारसंघातून लढवणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत़ 

लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने धोका दिल्याचे भोकरच्या आमदार अमिताताई चव्हाण यांनी म्हटले होते़ त्याबाबत राष्ट्रवादीने धोका दिला नाही तर काँग्रेसच्या लोकप्रतिनिधींनीही अशोकरावांना मतदान करा असे म्हटले नसल्याचे सांगितले़ त्यांचेच कार्यकर्ते प्रचारात उतरले नाहीत़ इतकेच नव्हे तर काँग्रेसने आपल्यावरही पाळत ठेवली होती़ विश्वासच नाही तर सोबत राहण्याची काय गरज होती, असा सवालही त्यांनी उपस्थित केला़ काँग्रेसने आपल्याला दोनवेळा पराभूत केले़ मात्र आम्ही ब्र ही काढला नाही़ त्यामुळे आता कोण काय म्हणते याकडे लक्ष देण्याची गरज नसल्याचे गोरठेकर यांनी सांगितले़ 

राष्ट्रवादी काँग्रेस सोडण्यास पक्षातील राहू-केतू कारणीभूत असल्याचे सांगितले़ हे राहू-केतू म्हणजे माजी आ़शंकरअण्णा धोंडगे आणि किनवटचे आ़ प्रदीप नाईक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले़ मेहनत आम्ही करायची आणि धोंडगे व नाईक यांनी सौदेबाजी करत आपल्या मुलाला, नातेवाईकाला पदे मिळवून घ्यायची़ काँग्रेसनेही गरज पडल्यासच या राहू-केतूंना जवळ घेतले़ यामुळे पक्षात राहायचे कशाला असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला़ निवडणुकीच्या काळात येणारे निरीक्षकही काँग्रेसशी मॅनेज असायचे असा आरोपही त्यांनी केला़  

जिल्ह्यात गोरठेकर आणि कुंटूरकर घराणे हे राजकारणातील मोठे घराणे होते़ याच घराण्यांच्या मदतीने शंकरराव चव्हाण यांनी जिल्ह्यात राजकारण केले़ मात्र अशोकराव चव्हाण यांनी या घराण्यांची वाट लावली, असेही त्यांनी सांगितले़ मागील १० वर्षात सत्तेत नसताना कार्यकर्त्यांना जाणीवपूर्वक त्रास देण्यात आला़ मात्र त्याचा आता आगामी काळात निश्चितच हिशोब केला जाईल, असेही ते म्हणाले़ यावेळी सभापती दत्तू रेड्डी, राजेश कुंटूरकर, मारोतराव कवळे, रमेश सरोदे, दत्ताहरी पाटील, गणेशराव गाढे, विश्वनाथ बन्नाळीकर, भास्कर भिलवंडे, महंमद जावेद, उत्तम बाभळे, जीवन पाटील, धर्मराज देशमुख यांनीही भावना व्यक्त केल्या़

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसNandedनांदेडPoliticsराजकारण