शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
2
दोन मुलांची आई १७ वर्षांच्या तरुणाच्या प्रेमात पडली, वर्ष झालं पिच्छा सोडेना, अखेर तरुणाने 'असा' शिकवला धडा! 
3
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
4
खळबळजनक! ४ लाख फॉलोअर्स असलेल्या महिला इन्फ्लुएन्सरचा कारमध्ये सापडला मृतदेह
5
"पाकिस्तान्यांचा नानांना भलताच कळवळा?, तुमचा आणि तुमच्या मालकाचा डीएनए एकच...देशद्रोह"
6
Astro Tips: शुक्र केतू युती सुखाने जगू देत नाही; आयुष्यात होते मोठे नुकसान!
7
पाकिस्तानचा हा कट्टर शत्रू तयार करतोय आत्मघातकी ड्रोनची फौज; इस्लामाबाद असो वा कराची, क्षणात होईल माती-माती!
8
'आता आणखी खेळाडू निवृत्त होतील...'; वर्ल्डकप विजेत्या कर्णधाराने केला धक्कादायक दावा
9
"लिव्ह इनमध्ये राहण्याचा खूप फायदा", मराठी अभिनेत्रीने मांडले विचार; म्हणाली, "आपले खरे रंग..."
10
आरोग्य विमा घेताना फसगत नको! 'हे' ६ प्रश्न विचाराच, अन्यथा पैसे वाया जातील!
11
लग्नाच्या ३ वर्षांनंतर आलिया भटने नावात केला मोठा बदल; हॉटेलमधील 'त्या' फोटोमुळे चर्चांना उधाण
12
डिसेंबरपासून बंद पडलंय 'या' शेअरचं ट्रेडिंग; किंमत फक्त १० रुपये, आता समोर आली मोठी अपडेट 
13
IND vs ENG : टीम इंडियातील या स्टार खेळाडूसाठी गांगुलीनं घेतला BCCI निवडकर्त्यांशी पंगा! म्हणाला...
14
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यापूर्वी कॅनडात खलिस्तानवाद्यांवर जोरदार कारवाई, अनेकांना अटक...
15
Raj Kushwaha : "सोनम वयाने मोठी, बॉस होती, राज फक्त नोकर"; आईने घेतली लेकाची बाजू, म्हणाली...
16
विशेष लेख: मोठ्या पवारांची भाजपच्या दारावर टकटक?
17
'PM मोदींनी आपला हट्टीपणा सोडावा', असीम मुनीरच्या अमेरिका दौऱ्यावरुन काँग्रेसची टीका
18
आजचा अग्रलेख - किती मुले केव्हा? की नकोच?
19
राज कुशवाह तर मोहरा, सोनमचं खरं प्रेम कुणीतरी दुसरंच...? राजा रघुवंशी प्रकरणात नवा 'ट्विस्ट'

राष्ट्रवादीचे नांदेड जिल्हाध्यक्ष गोरठेकर यांनी पक्ष सोडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2019 16:04 IST

भोकर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार

नांदेड : राष्ट्रवादीचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष बापूसाहेब गोरठेकर यांनी प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस सोडल्याची घोषणा करत आगामी निवडणूक ही भोकर मतदारसंघातून लढवणार असल्याचे स्पष्ट केले़ पक्ष कोणता हे अद्याप त्यांनी घोषित केले नसले तरीही ते भाजपाच्या वाटेवर आहेत़ 

नांदेडमध्ये सोमवारी गोरठेकर यांनी प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक बोलावली होती़ या बैठकीत आगामी कार्यकाळातील निर्णयाबाबत प्रमुख कार्यकर्त्यांची मते जाणून घेण्यात आली़ यावेळी बहुतांश कार्यकर्त्यांनी गोरठेकर जो निर्णय घेतील तो आपल्याला मान्य राहील असे सांगून गोरठेकरांच्या निर्णयाला पाठिंबा राहील, ही भूमिका मांडली़ भोकर व नायगाव मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा आग्रह कार्यकर्त्यांनी धरला होता़ 

गोरठेकर यांनी भूमिका मांडताना मागील १० वर्षात आमच्या कार्यकर्त्यावर जो अन्याय झाला त्याचा हिशोब आता पूर्ण केला जाईल हे ठणकावताना सर्वसामान्यांसाठीच निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे ते म्हणाले़ कुस्ती लढताना ती मोठ्या पैलवानाशी लढावी, असे सांगताना त्यांनी आगामी निवडणूक ही भोकर मतदारसंघातून लढवणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत़ 

लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने धोका दिल्याचे भोकरच्या आमदार अमिताताई चव्हाण यांनी म्हटले होते़ त्याबाबत राष्ट्रवादीने धोका दिला नाही तर काँग्रेसच्या लोकप्रतिनिधींनीही अशोकरावांना मतदान करा असे म्हटले नसल्याचे सांगितले़ त्यांचेच कार्यकर्ते प्रचारात उतरले नाहीत़ इतकेच नव्हे तर काँग्रेसने आपल्यावरही पाळत ठेवली होती़ विश्वासच नाही तर सोबत राहण्याची काय गरज होती, असा सवालही त्यांनी उपस्थित केला़ काँग्रेसने आपल्याला दोनवेळा पराभूत केले़ मात्र आम्ही ब्र ही काढला नाही़ त्यामुळे आता कोण काय म्हणते याकडे लक्ष देण्याची गरज नसल्याचे गोरठेकर यांनी सांगितले़ 

राष्ट्रवादी काँग्रेस सोडण्यास पक्षातील राहू-केतू कारणीभूत असल्याचे सांगितले़ हे राहू-केतू म्हणजे माजी आ़शंकरअण्णा धोंडगे आणि किनवटचे आ़ प्रदीप नाईक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले़ मेहनत आम्ही करायची आणि धोंडगे व नाईक यांनी सौदेबाजी करत आपल्या मुलाला, नातेवाईकाला पदे मिळवून घ्यायची़ काँग्रेसनेही गरज पडल्यासच या राहू-केतूंना जवळ घेतले़ यामुळे पक्षात राहायचे कशाला असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला़ निवडणुकीच्या काळात येणारे निरीक्षकही काँग्रेसशी मॅनेज असायचे असा आरोपही त्यांनी केला़  

जिल्ह्यात गोरठेकर आणि कुंटूरकर घराणे हे राजकारणातील मोठे घराणे होते़ याच घराण्यांच्या मदतीने शंकरराव चव्हाण यांनी जिल्ह्यात राजकारण केले़ मात्र अशोकराव चव्हाण यांनी या घराण्यांची वाट लावली, असेही त्यांनी सांगितले़ मागील १० वर्षात सत्तेत नसताना कार्यकर्त्यांना जाणीवपूर्वक त्रास देण्यात आला़ मात्र त्याचा आता आगामी काळात निश्चितच हिशोब केला जाईल, असेही ते म्हणाले़ यावेळी सभापती दत्तू रेड्डी, राजेश कुंटूरकर, मारोतराव कवळे, रमेश सरोदे, दत्ताहरी पाटील, गणेशराव गाढे, विश्वनाथ बन्नाळीकर, भास्कर भिलवंडे, महंमद जावेद, उत्तम बाभळे, जीवन पाटील, धर्मराज देशमुख यांनीही भावना व्यक्त केल्या़

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसNandedनांदेडPoliticsराजकारण