शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
7
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
8
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
9
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
10
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
11
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
12
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
13
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
14
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
15
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
16
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
17
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
18
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
19
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
20
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या

राष्ट्रवादीचे नांदेड जिल्हाध्यक्ष गोरठेकर यांनी पक्ष सोडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2019 16:04 IST

भोकर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार

नांदेड : राष्ट्रवादीचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष बापूसाहेब गोरठेकर यांनी प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस सोडल्याची घोषणा करत आगामी निवडणूक ही भोकर मतदारसंघातून लढवणार असल्याचे स्पष्ट केले़ पक्ष कोणता हे अद्याप त्यांनी घोषित केले नसले तरीही ते भाजपाच्या वाटेवर आहेत़ 

नांदेडमध्ये सोमवारी गोरठेकर यांनी प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक बोलावली होती़ या बैठकीत आगामी कार्यकाळातील निर्णयाबाबत प्रमुख कार्यकर्त्यांची मते जाणून घेण्यात आली़ यावेळी बहुतांश कार्यकर्त्यांनी गोरठेकर जो निर्णय घेतील तो आपल्याला मान्य राहील असे सांगून गोरठेकरांच्या निर्णयाला पाठिंबा राहील, ही भूमिका मांडली़ भोकर व नायगाव मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा आग्रह कार्यकर्त्यांनी धरला होता़ 

गोरठेकर यांनी भूमिका मांडताना मागील १० वर्षात आमच्या कार्यकर्त्यावर जो अन्याय झाला त्याचा हिशोब आता पूर्ण केला जाईल हे ठणकावताना सर्वसामान्यांसाठीच निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे ते म्हणाले़ कुस्ती लढताना ती मोठ्या पैलवानाशी लढावी, असे सांगताना त्यांनी आगामी निवडणूक ही भोकर मतदारसंघातून लढवणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत़ 

लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने धोका दिल्याचे भोकरच्या आमदार अमिताताई चव्हाण यांनी म्हटले होते़ त्याबाबत राष्ट्रवादीने धोका दिला नाही तर काँग्रेसच्या लोकप्रतिनिधींनीही अशोकरावांना मतदान करा असे म्हटले नसल्याचे सांगितले़ त्यांचेच कार्यकर्ते प्रचारात उतरले नाहीत़ इतकेच नव्हे तर काँग्रेसने आपल्यावरही पाळत ठेवली होती़ विश्वासच नाही तर सोबत राहण्याची काय गरज होती, असा सवालही त्यांनी उपस्थित केला़ काँग्रेसने आपल्याला दोनवेळा पराभूत केले़ मात्र आम्ही ब्र ही काढला नाही़ त्यामुळे आता कोण काय म्हणते याकडे लक्ष देण्याची गरज नसल्याचे गोरठेकर यांनी सांगितले़ 

राष्ट्रवादी काँग्रेस सोडण्यास पक्षातील राहू-केतू कारणीभूत असल्याचे सांगितले़ हे राहू-केतू म्हणजे माजी आ़शंकरअण्णा धोंडगे आणि किनवटचे आ़ प्रदीप नाईक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले़ मेहनत आम्ही करायची आणि धोंडगे व नाईक यांनी सौदेबाजी करत आपल्या मुलाला, नातेवाईकाला पदे मिळवून घ्यायची़ काँग्रेसनेही गरज पडल्यासच या राहू-केतूंना जवळ घेतले़ यामुळे पक्षात राहायचे कशाला असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला़ निवडणुकीच्या काळात येणारे निरीक्षकही काँग्रेसशी मॅनेज असायचे असा आरोपही त्यांनी केला़  

जिल्ह्यात गोरठेकर आणि कुंटूरकर घराणे हे राजकारणातील मोठे घराणे होते़ याच घराण्यांच्या मदतीने शंकरराव चव्हाण यांनी जिल्ह्यात राजकारण केले़ मात्र अशोकराव चव्हाण यांनी या घराण्यांची वाट लावली, असेही त्यांनी सांगितले़ मागील १० वर्षात सत्तेत नसताना कार्यकर्त्यांना जाणीवपूर्वक त्रास देण्यात आला़ मात्र त्याचा आता आगामी काळात निश्चितच हिशोब केला जाईल, असेही ते म्हणाले़ यावेळी सभापती दत्तू रेड्डी, राजेश कुंटूरकर, मारोतराव कवळे, रमेश सरोदे, दत्ताहरी पाटील, गणेशराव गाढे, विश्वनाथ बन्नाळीकर, भास्कर भिलवंडे, महंमद जावेद, उत्तम बाभळे, जीवन पाटील, धर्मराज देशमुख यांनीही भावना व्यक्त केल्या़

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसNandedनांदेडPoliticsराजकारण