शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंसोबत रात्री बैठक, सकाळी पत्रकार परिषद; महायुतीबाबत रवींद्र चव्हाणांचं मोठं विधान
2
परदेशी लोकांच्या हातात जाणार का सरकारी IDBI बँक? कॅनडाची दिग्गज कंपनीही खरेदीसाठी रेसमध्ये
3
"घरी ये, लग्नाची बोलणी करू..."; तरुणाला घरी बोलावलं अन् गर्लफ्रेंडच्या कुटुंबाने मिळून संपवलं!
4
Samruddhi Mahamarg Accident: साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीला निघाले, मृत्युने समृद्धी महामार्गावरच गाठले; दोघे ठार, तर...
5
अपमान सहन होईना! बांगलादेशचे राष्ट्रपती शहाबुद्दीन निवडणुकीनंतर पद सोडणार, युनूस सरकारवर गंभीर आरोप
6
मुंबई पागडीमुक्त हाेणार, इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा; स्वतंत्र नियमावली करण्याची शिंदे यांची घोषणा
7
लुथरा बंधूंना पोलिसांनी पकडलं, पण थायलंडमधून भारतात आणण्यास आणखी उशीर होणार! कारण काय?
8
NPS, UPS आणि अटल पेन्शनच्या नियमांमध्ये मोठा बदल; कोणाला होणार किती फायदा?
9
केंद्रीय प्राधिकरणावरील अधिकारी लोकायुक्त कक्षेत; महाराष्ट्र लोकायुक्त सुधारणा विधेयक मंजूर
10
Leopard Spotted in Pune Airport: अखेर सापडला! पुणे विमानतळ परिसरात लपलेला बिबट्या ७ महिन्यांनी अडकला पिंजऱ्यात
11
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचं निधन 
12
आजचे राशीभविष्य, १२ डिसेंबर २०२५: सही करताना काळजी घ्या, जमीन-संपत्तीच्या प्रकरणात फसवणूक होण्याची शक्यता
13
चिथावणीमुळे मारहाणीचे आराेप राज यांना अमान्य; ठाणे सत्र न्यायालयात हजर; महिनाभरात खटल्याच्या निकालाचे संकेत
14
लोकसभेत तृणमूल खासदाराने ओढली ई-सिगारेट; भाजपचा आराेप; संसदेची प्रतिष्ठा कमी केल्याचा दावा
15
न संपणारा घोळ ! पाच दिवस विलंबाने म्हणजे १५ डिसेंबर रोजी मतदारयाद्या प्रसिद्ध होतील
16
गाेवा आग : लुथरा बंधू थायलंडमध्ये ताब्यात, लवकरच गोव्यात आणणार; दोघांचेही पासपोर्ट रद्द
17
मुंबईकरांना ओसी ‘गिफ्ट’, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांनी विधानसभेत केली सुधारित भोगवटा अभय योजनेची घोषणा
18
‘बिग डी’, ‘बिग ई’... अन् महायुतीचा पिक्चर ! एकाचवेळी दोघांना एकाच खिडकीजवळची जागा कशी देता येईल?
19
राज्यातील १७ शहरे महाबळेश्वरपेक्षाही थंड; मुंबईचे किमान तापमान १५, तर माथेरानचे किमान तापमान १७ अंश नोंदविण्यात आले
20
इंडिगोकडून प्रवाशांची बोळवण; देणार १० हजारांचे ट्रॅव्हल व्हाउचर; ३ ते ५ डिसेंबरदरम्यान फटका बसलेल्यांनाच मिळेल भरपाई
Daily Top 2Weekly Top 5

नांदेडकरांना पाणीटंचाईच्या झळा कायम; सहा दिवसाआड पाणीपुरवठ्याचा निर्णय 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2019 15:28 IST

उपलब्ध पाण्याचेच करावे लागणार नियोजन

ठळक मुद्देसध्या विष्णूपुरी प्रकल्पातून ५० टक्के उपसा सुरू आहे़ जायकवाडीचे पाणी मिळण्याची शक्यता कमीच

नांदेड : महापालिकेने १६ आॅगस्टपासून चार दिवसांआड पाणी पुरवठा करण्याचा निर्णय अखेर रद्द करण्यात आला असून नांदेडकरांना पुन्हा आठ दिवसानंतरच पाणी मिळणार आहे़  दुसरीकडे जायकवाडीचे पाणी मिळण्याची शक्यताही मावळली आहे़ त्यामुळे  पाणीटंचाईचे संकट कायम आहे़महापालिकेच्या स्थायी समिती सभेत महापौर व सभापतींनी पाणी पुरवठा विभागाला १६ आॅगस्टपासून चार दिवसांआड पाणी सोडण्याचे आदेश दिले होते. मात्र त्यानंतर काही वेळातच हा निर्णय रद्द करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली़ त्यामुळे आता नांदेडकरांना चार दिवसआड नव्हे तर सहा दिवसआड पाणी मिळणार आहे़

शहरात मागील चार महिन्यांपासून आठ दिवसांआड पाणीपुरवठा केला जात आहे़ जून, जुलै महिन्यात केवळ तीन ते चार दिवसांआड पाणी सोडण्यात आले होते़ सध्या विष्णूपुरी प्रकल्पात १६़९३ दलघमी साठा उपलब्ध आहे़ त्यामुळे नागरिकांना दिलासा देण्यासाठी चार दिवसांआड पाणी सोडण्याचा निर्णय  आयुक्त लहुराज माळी यांनी जाहीर केला होता़ यासंदर्भात १५ आॅगस्ट रोजी वृत्तपत्रातून जाहिरातही प्रसिद्ध करण्यात आली होती़ मात्र त्यानंतर काही वेळातच हा निर्णय रद्द करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली़ त्यामुळे आता नांदेडकरांना चार दिवसआड नव्हे तर सहा दिवसआड पाणी मिळणार आहे़ काही भागात सातव्या, आठव्या दिवशीही पाणी सोडण्यात येत आहे़ पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक कोलमडले असून रात्री- बेरात्री नळाला पाणी सोडले जात आहे़ त्यामुळे नागरिकांना नळाचे  पाणी मिळत नाही़ भर पावसाळ्यात नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे़ काही भागात टँकरही सात, आठ दिवसानंतर येत असून त्यावर पाण्यासाठी झुंबड उडत आहे़ 

जायकवाडी धरणात १६ आॅगस्ट रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत १९९३़६८६ दलघमी जिवंत पाणीसाठा उपलब्ध असून धरणाची टक्केवारी ९१़८३  एवढी आहे़ या धरणातून उजवा कालव्यात ९०० क्यूसेस तर डाव्या कालव्यात १४०० क्यूसेस विसर्ग सुरू आहे़ पैठण जलविद्युत केंद्रामधून १५८९ क्युसेस विसर्ग सुरू आहे़ ढालेगाव बंधाऱ्यापर्यंत हे पाणी मिळणार आहे़ मात्र त्यापुढे विष्णूपुरी प्रकल्पापर्यंत पाणी मिळण्याची शक्यता कमीच आहे़ गोदावरी नदीपरिक्षेत्रातील पाऊसही बंद झाला आहे़ विष्णूपुरी प्रकल्पासह जिल्ह्यातील मध्यम, लघु व मोठ्या बंधाऱ्याची स्थिती नाजूक आहे़ अर्धा पावसाळा संपला असून यापुढे जोरदार पाऊस झाला तरच प्रकल्पाचा साठा वाढण्याची शक्यता आहे़ मात्र या जर, तरच्या बाबी असून उपलब्ध साठ्यावरच पुढील चार महिने काढावे लागणार आहेत़ त्यासाठी मनपाने चार दिवसांआड पाणी सोडण्याचा निर्णय रद्द केला आहे़ प्रशासनाने पाणीपुरवठ्याच्या बाबतीत गंभीर नियोजन करावे, अशी मागणी करण्यात येत आहे़ 

सध्या शहराला सहा दिवसांआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे़ विष्णूपुरी प्रकल्पात २० टक्के साठा उपलब्ध असून या पाण्याचे योग्य नियोजन करावे लागेल़ सध्या विष्णूपुरी प्रकल्पातून ५० टक्के उपसा सुरू आहे़ सांगवी बंधाऱ्यातील पाण्यावरच पाणीपुरवठा सुरू आहे़ मराठवाड्यात कमी पाऊस झाल्यामुळे धरणांची स्थिती नाजूक आहे़ त्यामुळे इतर शहरात  १० ते १५ दिवसानंतर पाणीपुरवठा केला जात आहे़ नांदेडमध्ये चार दिवसांआड पाणी सोडण्याचे नियोजन केले होते़ मात्र वरिष्ठांच्या निर्णयानुसार तो निर्णय रद्द करण्यात आला आहे़  - सुग्रीव अंधारे,कार्यकारी अभियंता महापालिका

टॅग्स :vishnupuri damविष्णुपुरी धरणWaterपाणीNanded-Waghala Municipal Corporationनांदेड - वाघाळा महानगरपालिकाRainपाऊस