शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
3
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
4
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
5
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
6
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
7
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
8
हा सदोष मनुष्यवधच!
9
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
10
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
11
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
12
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
13
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
14
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
15
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
16
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
17
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
18
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
19
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?

नांदेडकरांना पाणीटंचाईच्या झळा कायम; सहा दिवसाआड पाणीपुरवठ्याचा निर्णय 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2019 15:28 IST

उपलब्ध पाण्याचेच करावे लागणार नियोजन

ठळक मुद्देसध्या विष्णूपुरी प्रकल्पातून ५० टक्के उपसा सुरू आहे़ जायकवाडीचे पाणी मिळण्याची शक्यता कमीच

नांदेड : महापालिकेने १६ आॅगस्टपासून चार दिवसांआड पाणी पुरवठा करण्याचा निर्णय अखेर रद्द करण्यात आला असून नांदेडकरांना पुन्हा आठ दिवसानंतरच पाणी मिळणार आहे़  दुसरीकडे जायकवाडीचे पाणी मिळण्याची शक्यताही मावळली आहे़ त्यामुळे  पाणीटंचाईचे संकट कायम आहे़महापालिकेच्या स्थायी समिती सभेत महापौर व सभापतींनी पाणी पुरवठा विभागाला १६ आॅगस्टपासून चार दिवसांआड पाणी सोडण्याचे आदेश दिले होते. मात्र त्यानंतर काही वेळातच हा निर्णय रद्द करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली़ त्यामुळे आता नांदेडकरांना चार दिवसआड नव्हे तर सहा दिवसआड पाणी मिळणार आहे़

शहरात मागील चार महिन्यांपासून आठ दिवसांआड पाणीपुरवठा केला जात आहे़ जून, जुलै महिन्यात केवळ तीन ते चार दिवसांआड पाणी सोडण्यात आले होते़ सध्या विष्णूपुरी प्रकल्पात १६़९३ दलघमी साठा उपलब्ध आहे़ त्यामुळे नागरिकांना दिलासा देण्यासाठी चार दिवसांआड पाणी सोडण्याचा निर्णय  आयुक्त लहुराज माळी यांनी जाहीर केला होता़ यासंदर्भात १५ आॅगस्ट रोजी वृत्तपत्रातून जाहिरातही प्रसिद्ध करण्यात आली होती़ मात्र त्यानंतर काही वेळातच हा निर्णय रद्द करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली़ त्यामुळे आता नांदेडकरांना चार दिवसआड नव्हे तर सहा दिवसआड पाणी मिळणार आहे़ काही भागात सातव्या, आठव्या दिवशीही पाणी सोडण्यात येत आहे़ पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक कोलमडले असून रात्री- बेरात्री नळाला पाणी सोडले जात आहे़ त्यामुळे नागरिकांना नळाचे  पाणी मिळत नाही़ भर पावसाळ्यात नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे़ काही भागात टँकरही सात, आठ दिवसानंतर येत असून त्यावर पाण्यासाठी झुंबड उडत आहे़ 

जायकवाडी धरणात १६ आॅगस्ट रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत १९९३़६८६ दलघमी जिवंत पाणीसाठा उपलब्ध असून धरणाची टक्केवारी ९१़८३  एवढी आहे़ या धरणातून उजवा कालव्यात ९०० क्यूसेस तर डाव्या कालव्यात १४०० क्यूसेस विसर्ग सुरू आहे़ पैठण जलविद्युत केंद्रामधून १५८९ क्युसेस विसर्ग सुरू आहे़ ढालेगाव बंधाऱ्यापर्यंत हे पाणी मिळणार आहे़ मात्र त्यापुढे विष्णूपुरी प्रकल्पापर्यंत पाणी मिळण्याची शक्यता कमीच आहे़ गोदावरी नदीपरिक्षेत्रातील पाऊसही बंद झाला आहे़ विष्णूपुरी प्रकल्पासह जिल्ह्यातील मध्यम, लघु व मोठ्या बंधाऱ्याची स्थिती नाजूक आहे़ अर्धा पावसाळा संपला असून यापुढे जोरदार पाऊस झाला तरच प्रकल्पाचा साठा वाढण्याची शक्यता आहे़ मात्र या जर, तरच्या बाबी असून उपलब्ध साठ्यावरच पुढील चार महिने काढावे लागणार आहेत़ त्यासाठी मनपाने चार दिवसांआड पाणी सोडण्याचा निर्णय रद्द केला आहे़ प्रशासनाने पाणीपुरवठ्याच्या बाबतीत गंभीर नियोजन करावे, अशी मागणी करण्यात येत आहे़ 

सध्या शहराला सहा दिवसांआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे़ विष्णूपुरी प्रकल्पात २० टक्के साठा उपलब्ध असून या पाण्याचे योग्य नियोजन करावे लागेल़ सध्या विष्णूपुरी प्रकल्पातून ५० टक्के उपसा सुरू आहे़ सांगवी बंधाऱ्यातील पाण्यावरच पाणीपुरवठा सुरू आहे़ मराठवाड्यात कमी पाऊस झाल्यामुळे धरणांची स्थिती नाजूक आहे़ त्यामुळे इतर शहरात  १० ते १५ दिवसानंतर पाणीपुरवठा केला जात आहे़ नांदेडमध्ये चार दिवसांआड पाणी सोडण्याचे नियोजन केले होते़ मात्र वरिष्ठांच्या निर्णयानुसार तो निर्णय रद्द करण्यात आला आहे़  - सुग्रीव अंधारे,कार्यकारी अभियंता महापालिका

टॅग्स :vishnupuri damविष्णुपुरी धरणWaterपाणीNanded-Waghala Municipal Corporationनांदेड - वाघाळा महानगरपालिकाRainपाऊस