शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्व भारतीयांचा DNA एकच; हिंदू राष्ट्र म्हणजे...', RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे विधान
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
3
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
4
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
5
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
6
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!
7
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
8
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
9
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...
10
किचनमधील 'या' वस्तूंमुळे दुप्पट वाढतो कॅन्सरचा धोका; डॉक्टर म्हणाले, आताच उचला अन् बाहेर फेका
11
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!
12
बदल्याची आग! लव्ह मॅरेजनंतर पहिल्यांदा गावी आलं कपल; कुटुंब झालं हैवान, केली जावयाची हत्या
13
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
14
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
15
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख
16
झाली का गणपती पूजेची तयारी? काय राहिलं, काय घेतलं? झटपट तपासून घ्या पूजा साहित्य 
17
Nikki Murder Case : "न्यायाच्या बदल्यात न्याय, रक्ताच्या बदल्यात रक्त, आम्ही मुलगी गमावली"; निक्कीच्या आईचा टाहो
18
संधी मिळताच मोलकरणीने मारला डल्ला, घरातून ३५ लाखांचे दागिने, १० लाखांची रक्कम लंपास
19
Yavatmal: 'ती' गोष्ट लपवण्यासाठी रात्रीस 'खेळ'?; ग्रामसभेच्या आदल्या दिवशीच फोडले ग्रामपंचायत कार्यालय अन्...
20
गणपती आगमनाला पाऊस येणं हे तर शुभ लक्षण; यंदाही मुसळधार कोसळण्याची शक्यता 

नांदेडकरांना पाणीटंचाईच्या झळा कायम; सहा दिवसाआड पाणीपुरवठ्याचा निर्णय 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2019 15:28 IST

उपलब्ध पाण्याचेच करावे लागणार नियोजन

ठळक मुद्देसध्या विष्णूपुरी प्रकल्पातून ५० टक्के उपसा सुरू आहे़ जायकवाडीचे पाणी मिळण्याची शक्यता कमीच

नांदेड : महापालिकेने १६ आॅगस्टपासून चार दिवसांआड पाणी पुरवठा करण्याचा निर्णय अखेर रद्द करण्यात आला असून नांदेडकरांना पुन्हा आठ दिवसानंतरच पाणी मिळणार आहे़  दुसरीकडे जायकवाडीचे पाणी मिळण्याची शक्यताही मावळली आहे़ त्यामुळे  पाणीटंचाईचे संकट कायम आहे़महापालिकेच्या स्थायी समिती सभेत महापौर व सभापतींनी पाणी पुरवठा विभागाला १६ आॅगस्टपासून चार दिवसांआड पाणी सोडण्याचे आदेश दिले होते. मात्र त्यानंतर काही वेळातच हा निर्णय रद्द करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली़ त्यामुळे आता नांदेडकरांना चार दिवसआड नव्हे तर सहा दिवसआड पाणी मिळणार आहे़

शहरात मागील चार महिन्यांपासून आठ दिवसांआड पाणीपुरवठा केला जात आहे़ जून, जुलै महिन्यात केवळ तीन ते चार दिवसांआड पाणी सोडण्यात आले होते़ सध्या विष्णूपुरी प्रकल्पात १६़९३ दलघमी साठा उपलब्ध आहे़ त्यामुळे नागरिकांना दिलासा देण्यासाठी चार दिवसांआड पाणी सोडण्याचा निर्णय  आयुक्त लहुराज माळी यांनी जाहीर केला होता़ यासंदर्भात १५ आॅगस्ट रोजी वृत्तपत्रातून जाहिरातही प्रसिद्ध करण्यात आली होती़ मात्र त्यानंतर काही वेळातच हा निर्णय रद्द करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली़ त्यामुळे आता नांदेडकरांना चार दिवसआड नव्हे तर सहा दिवसआड पाणी मिळणार आहे़ काही भागात सातव्या, आठव्या दिवशीही पाणी सोडण्यात येत आहे़ पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक कोलमडले असून रात्री- बेरात्री नळाला पाणी सोडले जात आहे़ त्यामुळे नागरिकांना नळाचे  पाणी मिळत नाही़ भर पावसाळ्यात नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे़ काही भागात टँकरही सात, आठ दिवसानंतर येत असून त्यावर पाण्यासाठी झुंबड उडत आहे़ 

जायकवाडी धरणात १६ आॅगस्ट रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत १९९३़६८६ दलघमी जिवंत पाणीसाठा उपलब्ध असून धरणाची टक्केवारी ९१़८३  एवढी आहे़ या धरणातून उजवा कालव्यात ९०० क्यूसेस तर डाव्या कालव्यात १४०० क्यूसेस विसर्ग सुरू आहे़ पैठण जलविद्युत केंद्रामधून १५८९ क्युसेस विसर्ग सुरू आहे़ ढालेगाव बंधाऱ्यापर्यंत हे पाणी मिळणार आहे़ मात्र त्यापुढे विष्णूपुरी प्रकल्पापर्यंत पाणी मिळण्याची शक्यता कमीच आहे़ गोदावरी नदीपरिक्षेत्रातील पाऊसही बंद झाला आहे़ विष्णूपुरी प्रकल्पासह जिल्ह्यातील मध्यम, लघु व मोठ्या बंधाऱ्याची स्थिती नाजूक आहे़ अर्धा पावसाळा संपला असून यापुढे जोरदार पाऊस झाला तरच प्रकल्पाचा साठा वाढण्याची शक्यता आहे़ मात्र या जर, तरच्या बाबी असून उपलब्ध साठ्यावरच पुढील चार महिने काढावे लागणार आहेत़ त्यासाठी मनपाने चार दिवसांआड पाणी सोडण्याचा निर्णय रद्द केला आहे़ प्रशासनाने पाणीपुरवठ्याच्या बाबतीत गंभीर नियोजन करावे, अशी मागणी करण्यात येत आहे़ 

सध्या शहराला सहा दिवसांआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे़ विष्णूपुरी प्रकल्पात २० टक्के साठा उपलब्ध असून या पाण्याचे योग्य नियोजन करावे लागेल़ सध्या विष्णूपुरी प्रकल्पातून ५० टक्के उपसा सुरू आहे़ सांगवी बंधाऱ्यातील पाण्यावरच पाणीपुरवठा सुरू आहे़ मराठवाड्यात कमी पाऊस झाल्यामुळे धरणांची स्थिती नाजूक आहे़ त्यामुळे इतर शहरात  १० ते १५ दिवसानंतर पाणीपुरवठा केला जात आहे़ नांदेडमध्ये चार दिवसांआड पाणी सोडण्याचे नियोजन केले होते़ मात्र वरिष्ठांच्या निर्णयानुसार तो निर्णय रद्द करण्यात आला आहे़  - सुग्रीव अंधारे,कार्यकारी अभियंता महापालिका

टॅग्स :vishnupuri damविष्णुपुरी धरणWaterपाणीNanded-Waghala Municipal Corporationनांदेड - वाघाळा महानगरपालिकाRainपाऊस