शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

नांदेडमध्ये आरक्षित रेल्वेचे डबे रिकामेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2018 00:34 IST

भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त मुंबई येथे ६ एप्रिल रोजी आयोजित करण्यात आलेल्या महामेळाव्यासाठी नांदेड जिल्ह्यातून १४ हजार कार्यकर्ते जाणार असल्याची घोषणा भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केली होती़ परंतु घोषणेचे हे कमळ फुललेच नसल्याचे गुरुवारी रिकाम्या रेल्वे डब्यावरुन दिसले़ ११०० प्रवासी क्षमता असलेल्या या गाडीतून जवळपास ४०० ते ५०० कार्यकर्तेच मुंबईला रवाना झाले़

ठळक मुद्देभाजपचा महामेळावा : क्षमता ११०० प्रवाशांची कार्यकर्ते मात्र जेमतेमच

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त मुंबई येथे ६ एप्रिल रोजी आयोजित करण्यात आलेल्या महामेळाव्यासाठी नांदेड जिल्ह्यातून १४ हजार कार्यकर्ते जाणार असल्याची घोषणा भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केली होती़ परंतु घोषणेचे हे कमळ फुललेच नसल्याचे गुरुवारी रिकाम्या रेल्वे डब्यावरुन दिसले़ ११०० प्रवासी क्षमता असलेल्या या गाडीतून जवळपास ४०० ते ५०० कार्यकर्तेच मुंबईला रवाना झाले़नांदेड जिल्ह्यातून या मेळाव्यासाठी दोन रेल्वे आरक्षित करण्यात आल्या होत्या़ त्यातील एक रेल्वे गुरुवारी सकाळी नांदेड रेल्वेस्थानकावरुन सोडण्यात येणार असून त्यामध्ये हजारो कार्यकर्ते मुंबईला जाणार असल्याची घोषणा भाजपा पदाधिकाºयांनी बुधवारी झालेल्या पत्रपरिषदेत केली होती़ भाजपा महानगर शाखेच्या वतीने एक गाडी आरक्षित करण्यात आली होती़ निशुल्क जाण्याची व्यवस्था केल्यामुळे मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते येतील असा अंदाज होता़परंतु झाले नेमके उलटेच़ रेल्वेस्टेशनवर सकाळी ११ वाजता शंभरावर कार्यकर्ते होते़ यामध्ये महानगराध्यक्ष, जिल्हाध्यक्ष यांच्यासह इतर पदाधिकाºयांचा समावेश होता़ साडे बारा वाजेच्या सुमारास आरक्षित केलेली गाडी फलाट क्रमांक १ वर येणार असल्याची घोषणा करण्यात आली़ त्याचबरोबर ही गाडी फक्त महानगरातील कार्यकर्त्यांसाठी असून त्यामध्ये ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांनी बसू नये असेही स्पष्ट करण्यात आले़ बॅच नसलेल्या कार्यकर्त्यांना गाडीत प्रवेश देणार नसल्याचेही यावेळी सांगण्यात आले़ त्यानंतर आलेल्या १८ डब्यांच्या या विशेष गाडीतील बहुतांश डबे रिकामेच होते़ डब्यातील कार्यकर्तेही एैसपैस बसले होते़ थोड्याच वेळात गाडी मुंबईकडे रवाना झाली़ परंतु या सर्व प्रकारात पदाधिकाºयांच्या घोषणा रेल्वे इंजिनच्या धुराप्रमाणे हवेतच गेल्या़महामेळाव्यासाठी जाणाºया रेल्वेतील बहुतांश डबे रिकामे असल्याबाबत भाजपाचे महानगराध्यक्ष डॉ़संतुक हंबर्डे यांच्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता, त्यांचा फोन आऊट आॅफ रेंज होता़ त्यामुळे त्यांच्याशी संपर्क होवू शकला नाही़ तर जिल्हाध्यक्ष राम पाटील रातोळीकर यांचा भ्रमणध्वनीही बंदच होता़

टॅग्स :Railway Passengerरेल्वे प्रवासीreservationआरक्षणBJPभाजपा