शहरं
Join us  
Trending Stories
1
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
2
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
3
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
4
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
5
बँकेने गुन्हा दाखल केल्याने त्याची सटकली, साथीदारांना सोबत घेत अख्खी बँकच पेटवली
6
UPSC पास झाल्यानंतर उमेदवारांना पहिला पगार कधी आणि किती मिळतो? पाहा...
7
"मुस्लीम राजेशाही असो अथवा लोकशाही, वक्फ सर्वत्र...;" सौदीत पोहोचलेल्या PM मोदींवर ओवेसींचा निशाणा
8
Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला; पर्यटकांवर केला गोळीबार, २ जण जखमी
9
Jammu and Kashmir : दहशतवाद्यांनी पर्यटकांना आधी विचारला 'हा' प्रश्न अन् सुरू केला गोळीबार, नेमकं काय घडलं?
10
दहशतवाद्यांनी आधी धर्म विचारला, नंतर झाडल्या गोळ्या, पहलगाम हल्ल्यातील जखमींचा धक्कादायक दावा   
11
'नरेंद्र मोदी जगातील सर्वात लोकप्रिय नेते', जेडी व्हेन्स यांनी केले पंतप्रधानांचे कौतुक...
12
IPL 2025: हर्षा भोगलेंना KKRच्या मॅचमधून मुद्दाम वगळलं? खुद्द त्यांनीच दिलं स्पष्टीकरण
13
तेव्हा सलग १७ वर्षे घटत होते सोन्याचे दर, झालं होतं एवढं स्वस्त, मात्र आता...  
14
जालना: बॉयफ्रेंडकडून बदनामीच्या धमक्या, १८ वर्षीय तरुणीने संपवलं आयुष्य, मृतदेह कुठे सापडला?
15
टेबल फॅन खूपच खराब झालाय? स्वच्छ करण्यासाठी पाहा 'ही' सोपी पद्धत, पंखा दिसेल नव्यासारखा
16
नरेंद्र मोदींचं विमान सौदी अरेबियाच्या हवाई हद्दीत प्रवेश करताच घडलं असं काही, सारेच अवाक्
17
सलग सहाव्या दिवशी बाजार तेजीत बंद; 'या' बँकांच्या शेअर्सने खाल्ला भाव; कोणत्या सेक्टरमध्ये घसरण?
18
बापरे! सासू अन् जावयानंतर आता विवाहित महिला १५ वर्षाच्या मुलासोबत फरार, प्रकरण काय?
19
सोन्यानं पार केला १ लाखांचा टप्पा, शक्ती कपूरनं ३५ वर्षांपूर्वीच केलेली भविष्यवाणी; व्हिडीओ व्हायरल
20
'२३७ जागा मिळल्याचा माज करू नका, शिंदेंमुळे त्या मिळाल्या', शिवसेना आमदार कदमांचा अतुल सावेंवर पलटवार

नांदेड जिल्ह्यासाठी जलस्वराज्य अंतर्गत ५० कोटींच्या सहा पाणीपुरवठा योजना तयार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2017 18:15 IST

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या माध्यमातून जलस्वराज्य - २ कार्यक्रम राबविण्यात येत आहे़ जिल्ह्याला ५० कोटींचे उद्दिष्ट असून आजपर्यंत ४९़७५ कोटींच्या सहा योजना तयार असून चार योजनांना प्रशासकीय मान्यता मिळाली तर उर्वरित दोन योजनांची कामे अंतिम टप्प्यात आहेत.

ठळक मुद्देमहाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या माध्यमातून जलस्वराज्य - २ कार्यक्रम राबविण्यात येत आहे़ जिल्ह्याला ५० कोटींचे उद्दिष्ट असून आजपर्यंत ४९़७५ कोटींच्या सहा योजना तयार चार योजनांना प्रशासकीय मान्यता मिळाली तर उर्वरित दोन योजनांची कामे अंतिम टप्प्यात आहेत़ 

नांदेड : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या माध्यमातून जलस्वराज्य - २ कार्यक्रम राबविण्यात येत आहे़ जिल्ह्याला ५० कोटींचे उद्दिष्ट असून आजपर्यंत ४९़७५ कोटींच्या सहा योजना तयार असून चार योजनांना प्रशासकीय मान्यता मिळाली तर उर्वरित दोन योजनांची कामे अंतिम टप्प्यात आहेत़ 

ग्रामीण भागातील स्वच्छ व शुद्ध पाणीपुरवठा करण्यासाठी विविध योजनांच्या माध्यमातून पाणीपुरवठा योजना राबविण्यात येत आहेत़ यामध्ये नांदेड तालुक्यात २ योजना, बिलोली - २, उमरी- १ आणि किनवट तालुक्यात १ अशा सहा योजनांची कामे सुरू आहेत़ नांदेड तालुक्यात वाजेगाव येथे ७़७१ कोटी तर गोपाळचावडी येथे ७़७८ कोटींची योजना मंजूर झाली आहे़ या दोन्ही योजनांची कार्यवाही अंतिम टप्प्यात असून निविदेचे ईव्हालेशन प्रस्ताव मध्यवर्ती कार्यालय, मुंबईकडे पाठविण्यात आलेले आहेत़ सदर योजनेतून पाणीपुरवठ्यासाठी आमदुरा बंधारा येथून पाणीउपसा केला जाणार आहे़ तर किनवट तालुक्यातील गोकुंदा येथे राबविण्यात येणार्‍या १८़५४ कोटींच्या योजनेसाठी लोणी धरणातून पाणीपुरवठा केला जाईल,़  त्यामुळे गोकुंदा शहरातील पाणीप्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागेल़ 

बिलोली तालुक्यात अर्जापूर आणि सगरोळी येथील कामास प्रारंभ झाला असून या योजनांवर १२़७३ कोटी रूपये खर्च होणार आहे़ अर्जापूर येथील विहिरीचे खोदकाम करून बांधकाम पूर्ण झाले आहे़ तर सगरोळी येथील खोदकाम झाले असून बांधकाम प्रगतीपथावर आहे़ या दोन्ही योजनांतून जवळपास १५ हजार नागरिकांना पाणीपुरवठा केला जाऊ शकेल एवढी क्षमता आहे़  उमरी तालुक्यातील तळेगाव येथे २़९९ कोटींच्या योजनेस प्रशासकीय मान्यता मिळाली आहे़ पाणीपुरवठ्यासाठी उद्भव विहीर, पंपघर, पंपिंग मशिनरी, उद्धरण वाहिनी, पाण्याची टाकी, वितरण व्यवस्था आणि किरकोळ कामे पूर्ण केली जाणार आहेत. 

शुद्ध आणि उच्च दाबाने मिळणार पाणीच्ग्रामीण भागात स्वच्छ आणि मुबलक प्रमाणात पाणीपुरवठा करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने पुढाकार घेतला आहे़ यासाठी विविध योजना राबविल्या जात आहेत़ राज्य शासनाच्या मुख्यमंत्री पेयजल योजना, जलस्वराज्य योजना, राष्ट्रीय पेयजल योजनेअंतर्गत विविध कामे केली जात आहेत़ जलस्वराज्य - २ अंतर्गत जिल्ह्यात सहा ठिकाणी कामे होत आहेत़ या योजनेतून वर्षातील ३६५ दिवसांपैकी ३०० दिवस शाश्वत पाणीपुरवठा केला जाणार आहे़ प्रत्येक दिवशी मानसी ७० लिटर पाणी मिळणार आहे़ प्रत्येक घराला मीटर बसविण्यात येणार असून १० मीटर दाबाने पाणीपुरवठ्याची तरतूद सदर योजनेत आहे़ त्यामुळे सर्वत्र समान व उच्चदाबाने पाणीपुरवठा होईल़ 

टॅग्स :Nandedनांदेडwater transportजलवाहतूकWaterपाणी