शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
2
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
3
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
4
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
5
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
6
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
7
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
8
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
9
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
10
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
11
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
12
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
13
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
14
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
15
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
16
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
17
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
18
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
19
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
20
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी

नांदेड जिल्ह्यात अपघातांचे दुष्टचक्र थांबेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2018 00:26 IST

गेल्या दीड वर्षांच्या कालावधीत जिल्ह्यातील विविध भागात ९७२ अपघातांच्या घडल्या असून यामध्ये तब्बल ३९१ जणांनी जीव गमावला आहे. तर ५९७ गंभीर व २१६ जण किरकोळ जखमी झाली आहेत.

ठळक मुद्देदीड वर्षांत ९७२ अपघात : ३९१ जणांना गमवावा लागला जीव; ५९७ गंभीर

गोविंद सरदेशपांडे।लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : गेल्या दीड वर्षांच्या कालावधीत जिल्ह्यातील विविध भागात ९७२ अपघातांच्या घडल्या असून यामध्ये तब्बल ३९१ जणांनी जीव गमावला आहे. तर ५९७ गंभीर व २१६ जण किरकोळ जखमी झाली आहेत.देशासह राज्यात घडणाऱ्या अपघातांच्या घटनांच्या संख्येत घट व्हावी, यासाठी शासनाच्या वतीने विविध उपाययोजना केल्या जात आहेत. परंतु, अनेकवेळा रस्त्यांवरील वाहनांचा वेग यासह वाहनचालकांनी केलेल्या चुकांमुळे हे अपघात घडत असल्याची माहिती आहे.दरम्यान, जानेवारी २०१७ ते मार्च १८ या दीड वर्षांच्या कालावधीत नांदेड जिल्ह्यात अपघाताच्या एकूण ९७२ घडल्या असून यामध्ये एकूण ३९१ जण दगावले आहेत. अपघात होण्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे दिसून येत आहे.जिल्ह्यात जानेवारी २०१७ मध्ये ५५ अपघात झाले. यामध्ये २५ जण दगावले. तर फेबु्रवारीमध्ये ४९ अपघातात २०, मार्चमध्ये ७२ अपघात झाले. ज्यामध्ये ३४ जणांचा मृत्यू झाला. तसेच एप्रिल महिन्यातील ६५ अपघातांत ३०, मे महिन्यात ७५ अपघातांच्या घटनांत ३८, जून महिन्यात ७४ अपघात झाले. यात २७ जण दगावले. जुलै महिन्यात ७२ अपघात झाले. त्यात २० जण दगावले. तसेच आॅगस्ट महिन्यात ७१ अपघात झाले असून यामध्ये ३७ जणांचा मृत्यू झाला. सप्टेंबर महिन्यात ६० अपघातांत २२ तर आॅक्टोबर महिन्यात २३ जण दगावले. नोव्हेंबर महिन्यात ६४ अपघातांत ३०, डिसेंबर महिन्यात ६७ अपघातांत १२ जणांचा मृत्यू झाला. तर सन २०१८ मधील जानेवारी महिन्यातील ६४ अपघातांत २३, फेबु्रवारीमध्ये ५८ अपघातांत २१ तर मार्च महिन्यात झालेल्या ६६ अपघातांमध्ये २९ जण दगावले तर ५९७ जण गंभीर जखमी झाले आहेत. जिल्ह्यात ४९ ब्लॅक स्पॉट आहेत़ या सर्व ब्लॅक स्पॉटवर सुरक्षेच्या दृष्टीने पट्टे ओढणे, फलक लावणे यासारख्या उपाययोजना करणे आवश्यक असते़ परंतु त्याकडे सर्रासपणे दुर्लक्ष करण्यात येते़अपघातांच्या घटनांमध्ये घट व्हावी, यासाठी नागरिकांमध्ये आणखी जास्त जनजागृती होणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे वाहनचालकांनी वाहतूक नियमांचे पालन करूनच वाहने चालविल्यास निश्चितच अपघाताच्या घटनांत घट होण्यास मदत मिळणार आहे.दुचाकीस्वारांनी अशी काळजी घ्यावीदुचाकीवर दोनपेक्षा जास्त व्यक्तीने प्रवास करू नये, नेहमी हेल्मेटचा वापर करावा, दुचाकी चालविताना मोबाईलचा वापर टाळावा, ओव्हरटेक करताना नेहमी उजव्या बाजूनेच करावे, लहान मुलांना वाहनाच्या टाकीवर बसवू नका, वाहनाची कागदपत्रे नेहमी सोबत बाळगा, वाहन धोकादायक पद्धतीने किंवा वेडेवाकडे चालवून पुढे घुसण्याचा प्रयत्न करू नका, दुचाकीची वेग मर्यादा ताशी ५० किमी. असून त्याचे पालन करा.जड वाहनांसाठीचे नियमचालक व वाहनात बसणाºया इतर व्यक्तींनी सीट बेल्टचा वापर करावा, वाहनात माल भरताना योग्य बांधणी करावी, मालाच्या आकाराप्रमाणे वाहनाची निवड करावी, प्रखर किंवा रंगीत दिव्यांचा वापर करू नका, तसेच डिप्परचा वापर करा, रस्त्यावरील आखलेल्या पट्ट्यांचा अर्थ जाणून घ्या व त्याप्रमाणे त्याचे पालन करा, आवश्यकता असेल तरच हॉर्नचा उपयोग करा, अपघातग्रस्तांना त्वरित मदत करा, टायरमधील हवेचा दाब योग्य ठेवावा, इंधनाची व वंगणाची पातळी तपासावी़रस्ता सुरक्षा समित्या नावालाचरस्ता सुरक्षेसाठी राज्य परिवहन महामंडळ, पोलिस प्रशासन आणि प्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाºयांचा समावेश असलेली रस्ता सुरक्षा समिती असते़ या समितीकडून नियमितपणे अपघात प्रवण स्थळे, कारवाई याचा आढावा घेण्यात येतो़ परंतु वाढत्या अपघातांच्या घटनांबद्दल समितीकडून कुठल्याही उपाययोजना करण्यात येत नाहीत़ त्यामुळे सध्या तरी ही समिती नावालाच आहे़

टॅग्स :NandedनांदेडAccidentअपघातDeathमृत्यू